भोंदू बाबा लोकांच्या निमित्ते ..…
सगळ्यांचे दुःख निवारण करण्याच्या निमित्ताने आपल्या समाजात सतत नवनवीन “बाबा” जन्माला येत असतात. लग्न होत नाही, मुलगा नीट वागत नाही, जमिनीचा वाद मिटत नाही… अशी अनेक कारणं असतात. लोक इतके हतबल होतात की, स्वतःला जन्मापासून ओळखत असूनही स्वतःची बुद्धी आणि आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या हाती सोपवतात या आशेने की तो त्यांच्या दुःखाचं निवारण करेल.