यथावकाश महेशचं लग्न झालं. बायको मॉड होती पण थिल्लर नव्हती. त्याला हवी तशी होती. (मित्राच्या बायकोला, माजी का होईना, माल असं म्हणायला जीभ वळत नाही खरं तर) काय नाव होतं तिचं? विसरलो बघा. झाली तीसेक वर्षं आता.
(भाग २ - https://www.maayboli.com/node/87380)
एकूणच सोशल मीडियावर आणि मायबोलीवर सध्या रेस्टॉरंटमध्ये कुठे बसावे, कसे वागावे, काय घालावे याची घमासान चर्चा चालू आहे.
दूर कुठेतरी दिल्लीत एक शर्मा आडनावाची हिंदीभाषिक महिला आपली मराठमोळी कोल्हापुरी चप्पल घालते याचा अभिमान बाळगायचा सोडून...
आणि जेव्हा ती खुर्चीवर मांडी घालून बसते तेव्हा "दिल्लीचेही तख्त (पक्षी– खुर्ची) राखते कोल्हापुरी चप्पल माझी" असे गर्वाने म्हणायचे सोडून..
आपली मराठी माणसे इंडियन पीनल सेक्शन कोड घेऊन तिलाच नियम शिकवत आहेत.
त्याचवेळी परंपरा बचावपक्षाचे वकील सुद्धा एआय वापरून नवनवीन कायद्याची कलमे हुडकून आणत आहेत.
आमच्यात लग्नं लवकर होतात. त्याप्रमाणे माझं लग्न झालं. माझ्या बायकोकडे कधीही त्यानं वाईट नजरेनं बघितलं नाही. माझ्याच का, पण त्यानं जवळच्या कोणाकडेही लंपट नजरेनं पाहिलेलं मला ठाऊक नाही. पण ते सोडलं तर...
(भाग १ - https://www.maayboli.com/node/87377)
सेकंड शिफ्ट संपवून घरी पोहोचलो तर दोन वाजत आले होते. पाऊस आणि रस्त्यावरचे अपघात. तासभर वाया गेला. आमच्या मुंबैला शांततेचं वावडं आहे. इतक्या रात्रीही वाहनं धावतायत. आत्ता मुंबैबाहेर मालट्रक चाललेत. थोड्यावेळात भाजीपाला अन् दुधाचं ट्रॅफिक सुरू होईल. छत्री मिटवून झटकली. दरवाजा वाजवला. दारातच बूट उतरवायला लागलो. बायको दोन दिवस तापली होती. काल उतार पडला होता. पण ताकद जाते हो एवढ्याश्या तापानं. पण उठली. दरवाजा उघडला. खायला हवं नको विचारलं, सवयीनं. तशीच पोराला सरकवून कलंडली. खुंटीवरचे कपडे उचलले. उंबरठा ओलांडून स्वैपाकघरात गेलो. दिवा लावला, पडदा सरकवला. पिशवीतून डबा काढून घासायला टाकला.
सोशल मीडियावर गेले दोन दिवस या चर्चेने जोर धरला आहे.
एक महिला सलवार कमीज आणि कोल्हापुरी चप्पल या पेहरावात ताज हॉटेलमध्ये जेवायला गेली. तिथे एका खुर्चीत माय लाईफ माय कम्फर्ट म्हणत मांडी घालून जेवायला बसली. ते पाहून ताजच्या मॅनेजरने तिला हटकले. इतर ग्राहकांना याचा त्रास होत आहे सांगून तिला तसे बसण्यास मनाई केली. तिच्या कोल्हापुरी चप्पलवर सुद्धा कॉमेंट केली.
तिने या सगळ्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर दोन्ही बाजूने घमासान चर्चा होत आहे.
आपल्याला (आणि मला) डोळे, कान, नाक, जीभ (तोंड) व त्वचा अशी पंचेंद्रिये आहेत. जन्मापासून यांचे महत्त्व अध्यात्मात व विज्ञानात मी ऐकत आलो आहे. मात्र post internet व smartphone era, यांचे वापर कमालीचे वाढलेले मला दिसतात.
दिवाळी त्यांचीही.,.
दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली, सगळीकडे एकच उत्साह संचारलेला- दिवे, पणत्या, रोषणाईचे सामान, भरजरी, रंगीबिरंगी कपडे, नानाविविध मिठाया ह्यांनी सजेलेली दुकाने आणि त्यात करंजीत सारण दाबून भरावे तशी खचाखच भरलेली माणसे!
त्या उत्साही वातावरणातही दिवसेंदिवर हिची बेचैनी, हृदयातील धडधड वाढत चाललेली.
आज तर कळस झाला होता, पोटातला गोळा इतका मोठा झालेला, डोकं तर फुटतंय की काय असंच वाटायला लागलेलं.
कारणही तसचं होतं,
आज पगाराचा आणि (अर्थात) बोनसचा दिवस..
मात्र तिच्या नाही तर तिच्या घरातल्या सर्व मदतनिसांच्या…!
***
केबीसीमध्ये दोन तीन दिवसापूर्वी एक गुजरातचा मुलगा आला होता जो काही नकारात्मक कारणांनी वेगाने वायरल झाला आहे.
उद्धट, उर्मट, ओवरकॉन्फिडंट म्हणून ट्रोल होत आहे. आई-वडिलांनी दिलेले संस्कार काढले जात आहेत. प्रथमदर्शनी त्याचा शॉर्ट व्हिडिओ पाहिल्यावर माझेही साधारण तसेच मत झाले. पण ठीक आहे, असतात अशी मुले म्हणून पुढे निघून गेलो.
त्यानंतर मात्र दोनेक दिवसात बरेच पोस्ट पाहिल्या ज्यामध्ये तो फार वाईट पद्धतीने ट्रोल होत होता. वाईट वाटले.
वादाची पार्श्वभूमी
मनाचे श्लोक नावाने एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नावाला काही संघटनांनी विरोध केला. त्याचा शो बंद पाडला. आता तो चित्रपट येत्या आठवड्यात नाव बदलून प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे. अश्या अर्थाने चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून समर्थ रामदासांचे मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. तर यामागे केवळ कल्पकता आहे.
यावरून वाद उद्भवले आहेत ज्यात प्रामुख्याने दोन ते तीन गट तयार झाले आहेत.
माझ्यासारख्या अनेकांना हळहळ वाटेल असा दिवस. आठवणींनी हुरहुर लागेल. एकामागोमाग एक आठवणी येत राहतील. असा हा दिवस असेल!
काय होणार त्या दिवशी? कुणाच्या अध्यात ना मध्यात येणारी, कुणालाही कसलाही अडथळा न आणणारी , वर्षो न् वर्षे उन पाऊस थंडी वाऱ्यात निमुटपणे उभी असणारी ही पोस्टाची लोखंडाची किंवा बीडाची भक्कम तांबडी उभी पेटी, पोस्ट खाते काढून टाकणार आहे. तिची उचलबांगडी होणार आहे, अशी आताच WhatsApp वरून पुढे पुढे सरकत आलेली बातमी वाचली. आणि अरेरे! असं का व्हावं हा प्रश्न पडला.