नमस्कार मंडळी!
बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नैतिकता, अश्लीलता आणि तत्सम मुद्दे हे कायमच जगभरात संवेदनशील विषय होऊन राहिलेले आहेत. ते शब्द बरेच सापेक्ष असून त्यांच्या व्याख्याही देशप्रांतकालागणिक काहीशा भिन्न असलेल्या आढळतात. इतिहासात आतापर्यंत अनेक साहित्यप्रकार अथवा कलाकृतींवर विविध कारणांनी सरकारी बंदी घातल्याची उदाहरणे आहेत. तसेच त्यांच्या लेखक वा कलाकारांनाही न्यायालयीन खटल्यांना सामोरे जावे लागलेले आहे. एखादे प्रौढ साहित्य जर काही लोकांच्या मते आक्षेपार्ह असेल तर ते विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी ठेवावे काय, असाही वादग्रस्त मुद्दा चर्चेत येऊ शकतो.
तुला बघताना पुन्हा ठार झालो,
तुझा न होता ही तुझाच फार झालो!
सत्वरी जाणीव आली सावरून मज गेली,
असे सावल्यांना माझे ,पाहणे पाहून गेली!
कर्दमल्या आकाशी जणू तुझेच गोंदण हे,
थांबतो चंद्र खिडकीत ,तुझेच आंदण हे!
स्मरणे विस्मरून गेलो, काय तुझी किमया ग,
मलाच आता मी दर्पणी दिसेनासा झालो!
तुला बघताना पुन्हा ठार झालो,
तुझा ना होता ही तुझाच फार झालो!
-दक्ष
आमची ओळख एका अॅपवर झालेली आणि तिथेच तीन-चार वेळा संदेशव्यवहार झालेला. आज पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार होती. गेल्या दशकात अपयशी ठरलेल्या प्रेमानुभवांमुळे आपल्याला कधीच योग्य साथीदार मिळणार नाही, या विचाराने मन त्रासलेलं. तरीही आज आशेचा उमाळा जाणवत होता. चालता चालता वाटेत सतत तिचे फोटो डोळ्यासमोर येत होते. तिचं निरागस हास्य मनात ठाम मुक्काम मांडून बसलेलं. कानात संथ झुळूकेची मंद अलगुज वाजावी, तसे ते मला मनातल्या मनात ऐकू येत होतं. आपण ओळखत नसलेल्या व्यक्तीचा फोटो बघून नकळत आपल्या मनात त्या व्यक्तीची प्रतिमा बनते, तिला एक आवाज असतो, तिचे हावभाव असतात आणि तिला एक स्वभाव असतो.
दोस्तों , उधर २००० से भी ज्यादा कमेंटा गिर गई, सो ये नया धागा निकाली मैं.
अभी इधर कु डालो जो भी लिखना है....
अज्ञाताच्या वाटेवरूनी
अवघड चढणे चढता चढता
हात भेटले अदृश्याचे
सोपा झाला सगळा रस्ता
समजत नव्हते मुळीच जेव्हा
भाव भावना शब्दही दुस्तर
हात घेऊनी हातामध्ये
शिकवत गेले अक्षर अक्षर
कधी हरवलो वाटेमध्ये
कधी दाटली मनात भीती
लढण्याचे बळ दिले तयांनी
हात ठेऊनी पाठीवरती
पार जाहली अवघड वळणे
आयुष्याला दिशा मिळाली
जगण्याचाही अर्थ गवसला
कृतज्ञतेने भरली झोळी
ऋणात आहे सदैव त्यांच्या
नतमस्तक मी त्यांच्यापुढती
अदृश्याचे हात आजही
"गुरु" होऊनी सदैव पाठी
गोठ्याची वाडी - भाग ११ : काळोखाची नाडी आणि राखेतले गूढ
पावसाचा जोर आता ओसरला होता, पण हवेतला तो कोंदट, गंधकाचा दर्प श्वास कोंडत होता. आकाशातल्या त्या अवाढव्य, काळ्या सावल्यांमधून झिरपणाऱ्या निळसर प्रकाशाने वाडीवरचा अंधार एका मृत, आजारी रंगात बदलला होता. तो घुमणारा नाद आता कानांना ऐकू येत नव्हता; तो थेट हाडांमध्ये आणि छातीच्या पिंजऱ्यात स्पंदने निर्माण करत होता.
खिडकीतून डोंगराकडे पाहताना शेखरच्या पायाखालची जमीन सरकली.
(पहिलाच प्रयत्न आहे, मतकरींच्या कथा कधी काळी वाचलेल्या असल्याने प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.)
दिगंबरपंतांना जुन्या आणि दुर्मिळ वस्तू गोळा करायचा भयंकर छंद होता.
निवृत्त बँक कॅशियर असलेले पंत तसे अत्यंत व्यवहारचतुर, पण दुर्मिळ वस्तूंच्या बाजारात मात्र ते एखाद्या लहान मुलासारखे बावळट बनायचे.