सूर्य डोंगराआड पोचला होता, तिन्हीसांज डोकावत होती, अन् तो भराभर पाय उचलत चालला होता त्याच रुळलेल्या वाटेवरून. कुठे आधार घ्यावा अन् कुठे स्वतःच्याच पावलावर पाऊल ठेवायचे हे त्याच्या हाता-पायांना देखील ठाऊक झालेले होते. चालण्याची गती अतिशय एकसारखी. एकाच तालात त्याची पावले पडत होती. साथीला वारा होताच, तंबोऱ्यावर खर्ज लावल्यासारखा. पण त्याच्या कानांनाही सवयीचे झाले होते हे. मधूनच ओळखीचा रानवेलींचा सुगंध येत होता त्याच्या तीक्ष्ण नाकाला. विचलित न होता तो चालत होता, अंधार पडण्यापूर्वी पोहचायचे होते त्याला तिथे. रातकिडे त्याच्या साथीला येण्याआधी. आज खुशीत होता मात्र तो.
अजय, बलबीर आणि कपिल हे तिघे एकमेकांचे कट्टर दुश्मन आहेत. एकदा तिघांची गाठ अचानक एका मोकळ्या मैदानात पडते. साहजिकच तिघेही आपापल्या बंदुका सरसावून सज्ज होतात पण अंदाधुंद गोळीबार करण्यापेक्षा नाणेफेक करून प्रत्येकाने पाळीपाळीने एक गोळी चालवायची असे ते ठरवतात. त्यानुसार अजय, बलबीर आणि मग शेवटी कपिल असा क्रम लागतो. एक फेरी झाल्यावर पुन्हा याच क्रमाने प्रत्येकाने (किंवा जीवित असेल त्या क्रमाने) गोळी झाडायची असे ठरते.
अजयची निशाणेबाजी ५०% बिनचूक असते. बलबीरची निशाणेबाजी ७५% तर कपिलची १००% बिनचूक असते.
"बाळा, ऊठ लवकर. अजून उशीर केलास तर सकाळचा नाश्ता नाही मिळणार आणि आज तर दुपारचं जेवण यायला सुद्धा जरा उशीरच होईल ! मग नंतर नको म्हणू - 'भूक लागली, काहीतरी खायला दे.' ...
छोट्या राघूची आई त्याला उठवत म्हणाली. आईचा आवाज ऐकून राघूनी हळूच आपले डोळे किलकिले करून बाहेर नजर फिरवली. समोरच्या बाल्कनीचं दार आज चक्क चक्क उघडं होतं- आणि तेही इतक्या सकाळी ! त्यामधून आत येणारी सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप राघूच्या मऊमऊ पिसांच्या गादीला अजूनच ऊबदार बनवत होती. राघूनी आपल्या पंखात चोच खुपसून पुन्हा एकदा डोळे मिटले. किती मस्त वाटत होतं असं कोवळ्या उन्हात लोळत पडायला !
शेवटची (मराठी) कादंबरी वाचली होती त्याला आता १३ वर्षे उलटून गेली होती. ती ग्रंथालयातून आणून आणि पान अन् पान न वाचता काहीशी उडतउडत संपवली होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मनोमन वाटू लागलं होतं की आता कादंबरी व कथावाचन नकोस वाटतंय; कल्पिताचे दीर्घवाचन हा काही आता आपला प्रांत राहिलेला नाही. पुढे 2019मध्ये ग्रंथालय कायमचे बंद केले आणि तिथून पुढे दरवर्षी मोजकी पुस्तके विकत घेऊनच वाचतोय. ग्रंथालयातून पुस्तक आणताना माणूस निवडीबाबत काहीसा शिथिल असतो. परंतु पुस्तक विकत घ्यायचे म्हटल्यानंतर तो (अति) चिकित्सक बनतो !
जेव्हा कधीही चीन बद्दल एखादी बातमी येते तेव्हा या देशाबद्दल जाणुन घ्यायची इच्छा होते. एक असा देश ज्याची दर दिवसाला आपण एक तरी बातमी वाचतोच, आज काय तर चीन एक महाप्रचंड धरण बांधतोय ज्याच्यामुळे पृथ्वीच्या प्रदक्षिनेवर परिणाम होईल, कधी साऊथ चायना सी वर आपली मक्तेदारी सिद्ध करण्याबाबत असेल, एकाच वेळेस बऱ्याच देशांशी पंगा घेण्याबाबत असेल तर कधी ऑलिंपिक मध्ये खोऱ्याने मेडल मिळवण्याबद्दल असेल. सगळीकडे चीनची चर्चा.
असं काय वेगळ केलं या देशाने की आज जगातल्या प्रत्येक देशात यांचे प्रोडक्ट्स मिळतात, अगदी सुई पासुन ते स्पेसक्राफ्ट पर्यन्त सर्व काही कसं काय बनतं या देशात?
नर्मदा माई . . . .तिच्या प्रत्येक वळणावर ती काही ना काही आपल्याला शिकवत असते . मी नर्मदा मातेच्या काठावर बसून तिचा प्रवाह तासन्तास पहात बसायचो ! ती जणू काही मला आयुष्य कसे जगायचे तेच शिकवायची !
अतिशय अल्प साठा जन्माला घेऊन आलेला आपला जीव असतो . शारीरिक बळ अल्प असते , बुद्धी अल्प असते , सारेच कमी असते . नर्मदा मातेचा उगमही असाच करंगळी भर जाडीच्या धारेतून होतो .
एक अनोळखी कॉल
मीनल आज उशिरापर्यंत लॅपटॉपवर, ऑफिसचं काम करत बसली होती. रात्रीचे साधारण अकरा वाजले होते. आसपास पूर्ण शांतता होती. मधेच बाहेर रस्त्यावरून, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता. तिने उत्सुकतेने फोन उचलला.
"हॅलो?" ती म्हणाली.
पलीकडून काही उत्तर आलं नाही. फक्त मंद श्वासोच्छ्वास ऐकू येत होता. मीनल पुन्हा "हॅलो?" म्हणाली, पण पुन्हा तेच. रॉंग नंबर समजून, तिने फोन कट केला.
पण काही क्षणातच पुन्हा कॉल आला. त्याच नंबरवरून. पुन्हा तिने कॉल रिसीव्ह केला ; पण समोरून काहीच उत्तर आलं नाही.
जय माता दी
"प्यारसे बोलो जय मातादी"
"मिलके बोलो जय मातादी"
सारा आसमंत देवीआईच्या नाम गजराने गर्जत होता. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी उत्सुक असणारे आणि तिचं दर्शन घेऊन धन्य झालेले - सगळेच भक्तगण एकमेकांना संबोधून मातेच्या नावाचा गजर करत होते.
इतकी अवघड चढण चढून आल्यामुळे काही जणांना शारीरिक थकवा जाणवत असला तरी कोणाच्याही चेहेऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नव्हता. प्रत्येक जण भक्तिरसात न्हाऊन निघाल्यासारखा प्रसन्न दिसत होता.