स्थळ: बाळापूर शहर
लोकसंख्या: फक्त 0 ते 6 वयोगटातील मुले.
नियम: रडण्यास सक्त मनाई आहे (जोपर्यंत दूध मिळत नाही).
बाळापूर हे जगातील एकमेव असं शहर होतं, जिथे 6 वर्षांच्या वरच्या माणसांना "नो एन्ट्री" होती. या शहराचा कारभार कडक होता. शहराचे मुख्यमंत्री 5 वर्षांचे होते, जे दुपारच्या झोपेबद्दल खूप कडक होते. म्हणजे दुपारी सर्वजण 1 ते 4 झोपलेच पाहिजे. शहरात सगळं काही होतं. मॉल, सिनेमा, हॉस्पिटल, स्कूल, आणि अर्थातच बँका!
पण इथे चलनामध्ये नोटा चालत नाही, इथे चालतात, 'कॅडबरी जेम्स' आणि 'किंडर जॉय' आणि 'ला बू बू'
एका मित्राने अर्ज भरल्याने पुण्याला जावे लागले. पठ्ठ्याने सर्वच पक्षांकडून तिकीट मागितले पण त्याला आम आदमी पक्ष सोडा मीमकडूनही तिकीट मिळाले नाही. म्हणून तो अपक्ष लढतोय. समजावून सांगण्याच्या पलिकडे गेला आहे आणि जे साथ देत नाहीत त्यांच्या नावाने चिडचीड चालू आहे. म्हणून दोन दिवस म्हणताना आता सहा दिवस झाले इथेच कैदेत आहे.
या धामधुमीत पुण्यात फिरताना प्रचाराच्या गंमती जमती पहायला मिळाल्या.
जुनी गोष्ट. फार वर्षांपूर्वीची. तेव्हा शिवाजी साटम आणि आम्ही काही जण एकत्रच युपीएससी चा अभ्यास करत होतो. आम्ही समजा तेव्हाही दळभद्री असलो तरीही त्यांच्या मेधावी बुद्धिमत्तेची रेंज तेव्हाही आमच्या लक्षात आली होती.
कारण ते होतेच तसे जिनीयस म्हणजे. आणि फोकसही एकदम क्लिअर होता. होईन तर आयपीएस च अशी जिद्द. प्लॅन-बी वगैरे काही बकवास नाही..!
मिटिंग संपली काय, यामिनी धुसफुसतच बाहेर पडली. किती अवघड होतं प्रोफेशनल मुखवटा धारण करणे आणि या ...... या मनुष्याला शांत पण स्पष्ट रितीने आपला मुद्दा पटवुन देणे. आणि हु केअर्स मुद्दा त्याला पटतो अथवा नाही. स्टेकहोल्डर्सना पटला की झाले असते की. पण नाही आपल्याला श्रीनिच्या डोक्यातच आपला मुद्दा घुसावा, त्याने हार मानावी, त्याने आपले ऐकावे ...... अरे असे काय सोने लागलेले आहे त्याच्या मताला. हु इज ही? आपल्यासारखाच प्रॉडक्ट मॅनेजर. ते ही काल परवा कंपनीत आलेला. - पहील्या मनाने टकळी लावली.
.
कोकणातल्या एका आडवळणाच्या गावात 'सावळीरामचा वाडा' नावाचा एक प्रचंड जुना आणि मोडकळीस आलेला बंगला उभा होता. हा बंगला इतका जुना होता की खुद्द पुरातत्व खात्यालाही पुरातत्वपणा प्राप्त होऊन त्याचा विसर पडला होता. बंगल्याची अवस्था अशी होती की, तिथे राहणाऱ्या वटवाघुळांनी सुद्धा 'आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करा' असा अर्ज दिला असता, पण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं.
मुंबई ते गंगोवा या मार्गावर रुळावरून सटकत सटकत धावणाऱ्या एका भरगच्च बुलेट ट्रेनमधला 420 नंबरचा एसी टू-टायर डबा.
डॉ. कवळीकर जे एक ज्येष्ठ दातांचे डॉक्टर होते, आपल्या लोअर बर्थवर बसून आपल्या बॅगेतून एक प्लास्टिकचा जबडा आ वासून साफ करत होते. त्यांच्या तोंडातून फॉस्फरस सारखा फस फस आवाज येत होता. त्यांच्या समोरच्या सीटवर सिव्हिल इंजिनियर मिस्टर खड्डेकर बसले होते, जे खिडकीबाहेर बघून "या पुलाचा पिलर किती वाकडा आहे" असे पुटपुटत होते.
५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत देशभरात ३५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले. चित्रपटगृहांतील वातावरण पाहता हा चित्रपट आणखीही अनेक विक्रम मोडेल, याचा अंदाज बांधणे कठीण नाही. मात्र या कमाईपेक्षाही अधिक महत्त्वाची कमाई म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या रूपाने या चित्रपटाला मिळत असलेली दाद. लोक प्रचंड उत्साही आहेत आणि या चित्रपटाला पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करणारा चित्रपट म्हणून संबोधत आहेत.
रविवारची दुपार होती. दुपारचे जेवण झाल्यावर घरात एक सुखद आळस भरलेला होता. चिंटूचे बाबा, सुरेशराव, हॉलमधल्या सोफ्यावर "फक्त पाच मिनिटं डोळा लावतो" असं म्हणून मागील दोन तासांपासून घोरत होते. मंद आवाजात टीव्ही सुरू होता. चिंटूची आई, सुप्रिया, बेडरूममध्ये पुस्तक वाचता वाचता केव्हा झोपी गेली, हे तिलाच कळलं नाही.
आणि घरातला सर्वात महत्त्वाचा सदस्य, अडीच वर्षांचा चिंटू, मात्र जागा होता.