पुण्यातलं एक टिपिकल मध्यमवर्गीय घर. रविवार, सकाळी 9 वाजता.
सुमती (घर पुसते आहे): "राजेश, आज घरातलं काम करायचंय. कपाट साफ करायचंय, धूळ पुसायची, मग मला स्वयंपाक करायचाय!"
राजेश (क्रिकेट मॅच बघतोय): "सुमती, रविवार म्हणजे विश्रांती. शिवाय आज क्रिकेट मॅच आहे!"
सुमती: "तुम्ही काय मॅच बघायला माझ्याशी लग्न केलं होतं का?"
राजेश: "तू लग्नात एक करारपत्र बनवायला हवे होते आणि त्यात 'रविवारचे करार' लिहून माझी सही घ्यायला हवी होती!"
रोहन: "आई, बाबा, आपण लवासा फिरायला जाऊया ना! मी ड्रोन कॅमेरा सोबत घेईन! तिथले व्हिडिओ युट्यूबवर टाकेन."
1957 साली “ट्रान्स नॉर्दर्न एअरवेज” या कंपनीचं एक विमान, फ्लाइट KB713, शिकागोहून व्हॅनकुव्हरला जात असताना कॉलॉरडो येथे अचानक गायब झालं. म्हणजे त्यानंतर त्या विमानाचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला नाही.
कॉलॉरडो हे थोडं दक्षिणेकडे आहे, त्यामुळे बहुतेक वेळा शिकागो ते व्हॅनकुव्हर हा मार्ग कॉलॉरडोवरून जात नाही, पण काही फ्लाइट KB713 हे त्याच्या नियोजित मार्गातून भरकटले होते कारण त्याच्या पायलटस् ला समोर आकाशात काहीतरी अभद्र आकृत्या दिसल्या म्हणून त्यांनी मार्ग बदलला आणि ते कॉलॉरडोच्या हवाई क्षेत्रातून जाऊ लागले होते. पण तिथेही त्या आकृत्यांनी त्यांची पाठ सोडली नव्हती.
अमावस्येची रात्र होती. चंद्र सुट्टीवर होता. आकाश काळेकुट्ट होते आणि एकही चांदणी उपस्थित नव्हती. रात्रीचे अकरा वाजले होते.जुन्या बसचं घरघर करणारं इंजिन थरथरत थांबलं, आणि दामोदरने आपले पोते पाठीवर घेतले आणि बस मधून उतरला.
स्टॉप पासून त्याच्या गावातलं घर फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं.
एक मोठा जागतिक साथीचा रोग संपल्यानंतरचा 2021 सालचा तो नोव्हेंबर महिना होता. त्या महिन्यात, जगातील अनेक भागात अनाकलनीय घटना घडल्या होत्या.
असे म्हणतात की, त्या साथीच्या रोगाच्या विषाणूने काही परग्रहावरचे विचित्र विषाणू पृथ्वीवर आकर्षित केले होते आणि ते अजूनही पृथ्वीवरच आहेत. त्यातील काही चांगले तर काही घातक होते. पण ते इतके सूक्ष्म होते की खूप पावरफुल मायक्रोस्कोपने सुद्धा दिसत नव्हते. शास्त्रज्ञांना शंका होती की, त्या विषाणूंच्या डोक्यात माणसांपेक्षाही प्रगत मेंदू होता.
१. "आमचंच रक्त महान आहे. आमचाच वंश शुद्ध आहे. त्यामुळे आम्हीच जगावर राज्य करणार. इतरांनी दुय्यम मनुष्य म्हणून जगावं, किंवा तुम्हाला ते मान्य नसेल तुम्हाला घाऊक प्रमाणात मारून टाकण्याची सोय करता येईल, ती आम्ही करू!'' असे शाश्वत सुंदर विचार श्री. हिटलर यांनी मांडले.
१. मन जाय तो जाने दे, मत जाने दे सरीर.
मन शरीराला भविष्यातील किंवा भूतकाळातील कुठल्याशा आभासी परिस्थितीत घेऊन गेलंय की शरीर अजुनही आपल्याजवळच आहे, हे चेक करत रहायला पाहिजे वारंवार.
कारण शरीर मूर्ख असल्यामुळे ते आभासी परिस्थित्यांनाही खऱ्याखुऱ्या रिॲक्शन्स देत बसतं. त्याला काय खऱ्याखोट्यातला फरक करता येत नाही.
(ही एक हॉरर कादंबरी आहे)
भाग 1: नियोजन
माथेरानच्या घनदाट जंगलात, जिथे सूर्यप्रकाश झाडांच्या फांद्यांमधून चोरट्या पावलांनी खाली झिरपत होता, तिथे एक जुना बंगला उभा होता. हा बंगला, जणू काळाच्या पडद्याआड हरवलेला, पांढऱ्या रंगाच्या भिंतींनी आणि कोरीव लाकडी खांबांनी सजलेला होता. त्याच्या भोवती भक्कम झाडांची गर्दी होती, आणि समोर एक प्राचीन विहीर उभी होती, ज्याच्या दगडी काठावर काजळी पडली होती.
प्रकरण 1
(अनेक वर्षांपूर्वी)
संध्याकाळी भोरवाडी गावात पाऊस रिपरिपत होता, गार वारं खिडक्यांतून आत येत होतं. एका लहानशा घरात राघव आणि माधव नेहमीप्रमाणे चटईवर बसले होते, त्यांच्या समोर सापशिडीचा रंगीत फड पसरलेला होता. लहानशा घड्याळ्याच्या टिकटिक आवाजात आई त्यांच्या बाजूला बसलेली होती.
तिच्या हातात गरम वाफाळता चहा होता.
“चल माधव, माझा नंबर,” राघवने रंगीत सोंगटी पुढे सरकवली.
“अरेरे! पुन्हा सापावरून खाली आलो,” राघवने नाराज होत तोंड वाकडं केलं.
आईने हसत विचारलं, “काय झालं रे राघव?”
प्रकरण 1
प्राचीन काळात रात्रीच्या गडद पडद्याखाली, मेडिटेरनियन समुद्राच्या रोमग्रीप्टस बेटावर वसलेल्या नगरीत, राजवाड्याच्या उंच मनोऱ्यांमधून चंद्रप्रकाश खिडकीतून आत येत होता. राजकुमारी क्लिओपात्रा, तिच्या रेशमी पलंगावर बसली होती. तिच्या हातात एक प्राचीन पुस्तक होतं आणि ती पुस्तकातील पानं उलटत होती. तिचे डोळे उत्साहाने चमकत होते.
ती जेव्हा जवळच्या जंगलात जायची तेव्हा तिच्या उपस्थितीत जंगलातील प्रत्येक प्राणी आणि झाड जणू स्वागतासाठी थांबायचे. तिचे सौंदर्य एखाद्या दैवी चित्रासारखे होते: नैसर्गिक, पण रहस्यमयी!