आठवतंय…
तू खूप लहान होतास.तुझी जिज्ञासा खूप मोठी होती.तेव्हा मी तुझ्यासाठी सुपरमॅन होतो.तुझ्यासाठी मी सूर्यसुद्धा आणू शकतो, असं तुला वाटायचं.
या जगातला सर्वात ताकदवान माणूस जर कुणी असेल,तर तो नक्कीच मीच (तुझा बाबा)आहे, असाच तुझा दृढ विश्वास होता.
तो काळ…
जेव्हा मी नुकताच बाबा झालो होतो.मी मात्र नेहमी थोडा घाबरलेलाच असायचो…
एका विचाराने —
तो दिवस आला तर काय करीन,जेव्हा तुला कळेल की
तुझे बाबा काही सुपरमॅन नाहीत, ही-मॅन नाहीत,ते तर फक्त या शहरातले,साधीशी नोकरी करणारे,अगदी साधा माणूस आहेत.
कदाचित त्या भीतीमुळेच
१) जर हे त्याचे शरीर आहे , तर ती त्या शरीराचा आत्मा आहे.
२) त्यांची आठवण मला येत नाही ! कारण आठवण्यासाठी पहिला त्यांचा विसर पडावा लागतो.
३) झाडाला काय माहीत की त्याच्या सावलीत विसावणारा माणूस एक लाकूडतोड्या आहे.
४) ते भेटत नाहीत, ते वेगळे ही होत नाहीत.त्यांच अस्तित्व आणि नातं जमीन आणि आकाशा सारखे आहे .जवळीक खूप आहे, पण नातेसंबंध नाहीत.
ते अंत्यविधी नंतरच्या आठवड्याचे दिवस होते. तिने आपल्या मेहनती शाखा व्यवस्थापक पतीचा अंत्यविधी गेल्या आठवड्यातच आटोपला होता ,तिचा प्रिय पती,ज्याने दिवस रात्र कष्ट करून साध्या लिपिकापासून बँकेच्या व्यवस्थापकापर्यंतची प्रगती केली होती, आपल्या दोन मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते,परदेशात नोकरीला पाठवले होते आणि तिला एक संपूर्ण व सुखी जीवन दिले होते.
दहा-अकरा वर्षांपूर्वी ऑफिसच्या कामानिमित्त माझी आमच्या मलेशियातील ऑफिसमध्ये इंटर्नल ट्रान्स्फर झाली. त्या वेळी मलेशियाला ट्रान्स्फर घेण्यामागची अनेक कारणं होती; त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मलेशियातलं अफाट फूड वैविध्य. लोकल मलेशियन, चायनीज, थाय, व्हिएटनामी, फिलिपिन्ससारख्या साऊथ-ईस्ट एशियन देशांच्या नानाविध रुचकर डिशेस, शिवाय इतरही अनेक युरोपियन, मिडल-इस्टर्न देशांच्या खाद्यसंस्कृती, कौलालंपुर ह्या मलेशियाच्या राजधानीतल्या प्रत्येक कोपऱ्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये सहज उपलब्ध आहेत.
अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ?
अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे.
आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही. चखणा खाताना अवास्तव कॅलरी पोटात जातील म्हणून तुम्ही निघतानाच एक सॅलड म्हणून काकडी टोमॅटो असे खाऊन निघता.
"पण" मेजवानी संपेस्तोवर आपण वाजवीपेक्षा "किती तरी जास्त" खाल्ले आहे हे आपल्या लक्षात आल्यामुळे आपण स्वतःवर फारच चिडलेले असता.
*अमेरिकेची नवीन दादागिरी*
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलेले अब्राहम लिंकन हे विमानवाहू युद्धनौकेचे ताफे आधीच होर्मुझ सामुद्रधुनीत आणि उत्तर अरबी समुद्रात दाखल झाले आहेत. ट्रम्प यांनी आणखी एक मोठा ताफा, त्यात दुसरे एक मोठे विमानवाहू जहाजही, त्या समुद्रभागात पाठवले आहे जिथून इराण, अबूधाबी आणि सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर प्रवाह होतो.
२८ जानेवारीला मुंबईहून बारामतीला जाणारे विमान कोसळल्याने अनेक मराठी माणसांचे पंख छाटले गेले. सकाळी लवकर उठून कामाला लागणाऱ्या अजित दादांच्या अत्यंत दुर्दैवी अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात त्या पहाटे भयाण अंधार पसरला. ज्वलंत सूर्याची उब आणि काळोखात चंद्राचा धीर देणारा तो आगळावेगळा तारा कायमचा मावळला.
खूप कडाडून भूक लागल्यावर तो येतो स्वयंपाकघरात.
उचकटतो डबे. चाचपडतो पातेली.
जे मिळेल ते खाऊन घेतो. भसाभसा.
जमेल तितकं. जमेल तसं.
अन् जातो निघून.
तेंव्हा त्याला निवड नसतेच. कारण पर्याय नसतात.
आणि अर्थात् आवडही नसते. कारण निवड नसते.
सवडही नसतेच. कारण आवड नसते.
पर्याय नसतात कारण.... धाडस नसते!
त्याचे स्वत:चेही त्यात काहीही नसते.
निव्वळ भूक!
टाळता न येणारी.
फसफसणारी.
भागली नाही तर गुणाकार होणारी.
चवींत न रेंगाळणारी.
गुणांत न अडकणारी.
मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते?
adipostat म्हणजे काय आणि वजन थोडे कमी होऊन परत का वाढते?
यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते.
आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात. हि ग्लुकोज तुम्हाला अन्नातून थेट मिळते किंवा इतर पिष्टमय पदार्थांचे( रवा मैदा आटा तांदूळ ज्वारी बाजरी बटाटा रताळे इ) विघटन करून अथवा चरबी पासून तयार करून मिळवता येते.