राजकारण

भारतात अनागोंदी माजू शकते का?

Submitted by शाम भागवत on 14 January, 2026 - 07:29

https://youtu.be/iMSlfNNhYcc?si=FxwPDV18AKiKCfX4&t=1
काल वरचा व्हिडीओ पाहिला. विचार करण्यासारखा वाटला. मग मी सारांश लिहून काढून मग तो मिसळपाववर टाकावा असे ठरवले. अर्घ्यातासाचा व्हिडीओ पहायला फारसा लोकांना वेळ नसतो. पण थोडक्यात कोणी सांगत असेल तर मात्र लोकं ऐकायला/ वाचायला तयार असतात. हाच विचार करून हा प्रयोग करून पाहातो आहे. Happy

विषय: 

लापता

Submitted by Jawale chetan on 13 January, 2026 - 02:07
लापता

तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता.
सकाळची उन्हं, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपरीवरचा उकळता किटलीचा आवाज, आणि गावाच्या मध्यभागी असलेला तो जुना वड—ज्याच्या सावलीखाली पिढ्यानपिढ्या चर्चा होत आल्या होत्या. फरक इतकाच होता, की त्या दिवशी चर्चेचा विषय माणसं नव्हती, तर हरवलेली मूल्यं होती.
खेडं समृद्ध होतं.
किमान कागदावर तरी.
रस्ते होते, पाट्या होत्या, योजनांची नावं होती, उद्घाटनांचे फोटो होते. पण तरीही त्या दिवशी, वर्तमानपत्राच्या चौकटीत छापलेली बातमी गावाला अस्वस्थ करून गेली—
“एक तरुण बेपत्ता. नाव – विकास.”

जग महाविनाशकारी तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ? - उत्तरार्ध

Submitted by राज अज्ञानी on 10 January, 2026 - 05:38

अमेरिकेत बौद्ध भिक्खूंचा एक चमू आलोक नावाच्या कुत्र्यासोबत शांतीचा संदेश घेऊन पदयात्रा करत आहे. हा कुत्रा जागतिक शांतीचं प्रतिक बनला आहे. हे बौद्ध भिक्खू आणि तो कुत्रा बातम्यांचा विषय आहे. भारतात एका रस्ते अपघातात हा कुत्रा जखमी झाला होता. तेव्हां या दरम्यान भारतात पदयात्रा करत असलेल्या भिक्खूंना हा कुत्रा जखमी अवस्थेत सापडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला पूर्ण बरा केला. आता तो कुत्रा या भिक्खूंना सोडायला तयार नाही. ते जिथे जातील तिथे तो त्यांच्या सोबतच असतो. अमेरिकेत ठिकठिकाणी या भिक्खूंचे स्वागत होते, कौतुक होते आणि आलोकसोबत सेल्फी काढून घेतल्या जातात.

विषय: 
शब्दखुणा: 

जग महाविनाशकारी तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ? - पूर्वार्ध

Submitted by राज अज्ञानी on 10 January, 2026 - 03:37

असे म्हणतात कि जर तिसरे महायुद्ध झाले तर ते शेवटचे असेल.
कारण त्यानंतर जो काही विध्वंस होईल तो महाविनाशकारी असेल. या युद्धात सहभागी असलेल्या आणि नसलेल्याही देशांचे एव्हढे नुकसान होईल कि पुढची दोन तीनशे वर्षे युद्धाचा विचारही मनात येणार नाही. या महायुद्धापासून "तटस्थ" राहणे ही कल्पना भाबडी असेल. कारण त्या महायुद्धात कोणतेही नियम पाळले जाणार नाहीत.

विषय: 
शब्दखुणा: 

धुरंधर हा राजकीय चित्रपट आहे का ?

Submitted by राज अज्ञानी on 22 December, 2025 - 01:42

धुरंधर बद्दल अनुपम चोप्रा यांनी संतुलित मत व्यक्त केलं आहे. माझ्या मते त्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. तसेच त्यांचे वय आणि अनुभव बघता दोन गोष्टी त्या सांगू शकतात. पण त्यांचा रिव्ह्यू आल्याबरोबर त्यांना गलिच्छ भाषेत ट्रोल केले गेले. ही गोष्टच पुरेशी आहे कि धुरंधर हा पॉलिटिकल अजेण्डा रेटण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.

शब्दखुणा: 

१९७१ च्या युद्धविराम करारात भारताने पीओके का मागितले नाही ?

Submitted by राज अज्ञानी on 16 December, 2025 - 00:50

या आधीच्या दोन धाग्यांवर शून्य प्रतिसाद आले आहेत. याने हुरूप आणखी वाढला आहे. कदाचित बायनरी खेळातले नियम धुडकावून लावल्यास दोन्हीकडून इग्नोर करण्याचे आदेश आले असतील. लेखात काही चुकीचे असेल तर कळवा असे म्हटले होते. पण तशा चुका कुणी दाखवल्या नाहीत. प्रतिसाद नाहीत म्हणून लेखन थांबणार नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !
सहन न होऊन लेख उडवणे होणार नाही ही अपेक्षा आहे.

आज लेख लिहीत नाही. प्रश्न उपस्थित करत आहे. हा प्रश्न अनेक जण विचारत असतात. याची वस्तुनिष्ठ उत्तरे समोर येणे गरजेचे आहे..

विषय: 

दंगलींचे घाणेरडे राजकारण

Submitted by राज अज्ञानी on 13 December, 2025 - 08:42

या आधीचा धागा खालील लिंकवर पाहू शकता.
https://www.maayboli.com/node/87501

१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या सुरुवातीला भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण बदल घडला: उच्चवर्णियांच्या राजकारणातील वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी जातीय (मंडल) तर बहुजनांच्या राजकीय आकांक्षांना आव्हान देण्यासाठी धार्मिक (कमंडल) ध्रुवीकरणाची रणनीती अवलंबली गेली.

विषय: 
शब्दखुणा: 

बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Submitted by जावेद_खान on 9 November, 2025 - 00:05

बिहार विधानसभेच्या 243 सदस्यांची निवड करण्यासाठी सध्या निवडणूक सुरू असून पहिला टप्प्याचे मतदान सहा नोव्हेंबरला झाले तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला आहे. निकाल 14 तारखेला जाहीर होतील.
स्पेशल इंटेन्सीव रिविजन SIR अशा गोंडस नावाखाली मतदार याद्या बदलण्याचं सध्या जे काम चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.

अंदाज

भाजप आघाडी: १८८
राजद+काँग्रेस आघाडी: ५३
इतर: 2

राजद आघाडीच्या जागा अजून कमी होतील बहुतेक.

देवा , आता परत जावा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 October, 2025 - 14:31

देवा, कबुतरे उडवा , हत्ती पळवा
काहीच काम करू नका
पण आम्हाला मतदान करायचंय
निदान जिवंतपणी तरी मारू नका

काय नक्की चालले आहे
तेच आम्हाला कळत नाही
शेतकरी असेच उपाशी राहिलेत
नोकरी काही मिळत नाही

बेरोजगार असेच वाढत जातील
उगा खोटी स्वप्ने दाखवू नका
असेच थुंकी फिरवत राहा देवा
खुर्ची काही सोडू नका

राम राम जप अखंड चाले
भगवा काही सोडू नका
भगिनींचा बाजार मांडला
पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका

विषय: 
शब्दखुणा: 

मुंबईत 17 मुलांचं अपहरण

Submitted by जावेद_खान on 30 October, 2025 - 10:31

रोहित आर्या नावाच्या माणसाने मुंबईत 17 लहान मुलांना ओलीस ठेवले. सरकारकडे त्याचे काही पैसे बाकी होते म्हणून त्याने असं केल्याचं बोललं जातंय.

त्याने स्वतः एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलाय

https://www.indiatoday.in/india/video/any-wrong-move-and-chilling-video-...

Pages

Subscribe to RSS - राजकारण