देवा, कबुतरे उडवा , हत्ती पळवा
काहीच काम करू नका
पण आम्हाला मतदान करायचंय
निदान जिवंतपणी तरी मारू नका
काय नक्की चालले आहे
तेच आम्हाला कळत नाही
शेतकरी असेच उपाशी राहिलेत
नोकरी काही मिळत नाही
बेरोजगार असेच वाढत जातील
उगा खोटी स्वप्ने दाखवू नका
असेच थुंकी फिरवत राहा देवा
खुर्ची काही सोडू नका
राम राम जप अखंड चाले
भगवा काही सोडू नका
भगिनींचा बाजार मांडला
पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका
गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.
हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.
सध्या देशात सगळ्यांत जास्त गमतीजमती कोण करत असेल तर आपला निवडणूक आयोग. याची सुरुवात तशी बरीच आधी झाली आहे. पण आता त्यांचा गंमतीजमती करण्याचा वेग भलताच वाढला आहे आणि गंमतीजमतींची पातळीही अस्मानाला पोचली आहे. त्या गंमतीजमतींचा आढावा इथे घेऊयात.
मायबोलीकरांना विनंती : नुसत्याच टिप्पण्ण्या कर ण्या ऐवजी आयोगाच्या जुन्या गंमतीजमती इथे लिहा.
तसंच अशा गमतीजमती ७० वर्षांपासून होत होत्या आणि या गमतीजमती नाहीतच मुळी अशा प्रतिसादांचीही प्रतीक्षा आहेच.
तर पहिल्या तीन - चार गमतीजमती मतदानाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगबद्दल
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
आज, २५ जून २०२५. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
२५ जून १९७५ रोजी, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात "आणीबाणी" जाहीर केली. त्यापुढील दोनेक वर्षांच्या कालखंडात भारताच्या लोकशाही संस्थांना, व्यक्तिस्वातंत्र्याला आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा हादरा बसला. अनेक विरोधी नेते तुरुंगात डांबले गेले, वृत्तपत्रांवर निर्बंध आले, आणि सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रशासनाचे कठोर नियंत्रण आले.
आणीबाणीचा काळ हा काळे पर्व होता की अनुशासन पर्व यावर मतभेद आहेत.
२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.
गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.