राजकारण

देवा , आता परत जावा

Submitted by सिद्धेश्वर विला... on 31 October, 2025 - 14:31

देवा, कबुतरे उडवा , हत्ती पळवा
काहीच काम करू नका
पण आम्हाला मतदान करायचंय
निदान जिवंतपणी तरी मारू नका

काय नक्की चालले आहे
तेच आम्हाला कळत नाही
शेतकरी असेच उपाशी राहिलेत
नोकरी काही मिळत नाही

बेरोजगार असेच वाढत जातील
उगा खोटी स्वप्ने दाखवू नका
असेच थुंकी फिरवत राहा देवा
खुर्ची काही सोडू नका

राम राम जप अखंड चाले
भगवा काही सोडू नका
भगिनींचा बाजार मांडला
पण आम्हा दाजींची कंबर मोडू नका

विषय: 
शब्दखुणा: 

मुंबईत 17 मुलांचं अपहरण

Submitted by जावेद_खान on 30 October, 2025 - 10:31

रोहित आर्या नावाच्या माणसाने मुंबईत 17 लहान मुलांना ओलीस ठेवले. सरकारकडे त्याचे काही पैसे बाकी होते म्हणून त्याने असं केल्याचं बोललं जातंय.

त्याने स्वतः एक व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकलाय

https://www.indiatoday.in/india/video/any-wrong-move-and-chilling-video-...

१७ सप्टेंबर: मराठवाडा, तेलंगण व कल्याण-कर्नाटक स्वातंत्र्य दिन

Submitted by वामन राव on 17 September, 2025 - 01:07

पाकिस्तानशी "आवर्जून आणि ठरवून" क्रिकेट खेळणे गरजेचे आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2025 - 05:33

गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.

हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.

विषय: 

निवडणूक आयोगाच्या गमतीजमती

Submitted by भरत. on 17 August, 2025 - 10:00

सध्या देशात सगळ्यांत जास्त गमतीजमती कोण करत असेल तर आपला निवडणूक आयोग. याची सुरुवात तशी बरीच आधी झाली आहे. पण आता त्यांचा गंमतीजमती करण्याचा वेग भलताच वाढला आहे आणि गंमतीजमतींची पातळीही अस्मानाला पोचली आहे. त्या गंमतीजमतींचा आढावा इथे घेऊयात.

मायबोलीकरांना विनंती : नुसत्याच टिप्पण्ण्या कर ण्या ऐवजी आयोगाच्या जुन्या गंमतीजमती इथे लिहा.

तसंच अशा गमतीजमती ७० वर्षांपासून होत होत्या आणि या गमतीजमती नाहीतच मुळी अशा प्रतिसादांचीही प्रतीक्षा आहेच.

तर पहिल्या तीन - चार गमतीजमती मतदानाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगबद्दल

शब्दखुणा: 

चर्चा प्रस्ताव: १९७५-२०२५ आणीबाणीची पन्नाशी

Submitted by वामन राव on 25 June, 2025 - 08:59

आज, २५ जून २०२५. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.

२५ जून १९७५ रोजी, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात "आणीबाणी" जाहीर केली. त्यापुढील दोनेक वर्षांच्या कालखंडात भारताच्या लोकशाही संस्थांना, व्यक्तिस्वातंत्र्याला आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा हादरा बसला. अनेक विरोधी नेते तुरुंगात डांबले गेले, वृत्तपत्रांवर निर्बंध आले, आणि सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रशासनाचे कठोर नियंत्रण आले.

आणीबाणीचा काळ हा काळे पर्व होता की अनुशासन पर्व यावर मतभेद आहेत.

विषय: 

श्रीमती कविता गाडगीळ यांनी भारतीयांना उद्देशून लिहिलेलं पत्र

Submitted by चिनूक्स on 28 April, 2025 - 00:27

२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.

गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.

विषय: 
शब्दखुणा: 

पाकिस्तान आणि पाणी पुरवठ्या बद्दल माहीत मिळू शकेल ?

Submitted by स्वरुपसुमित on 26 April, 2025 - 13:39

सगळ्यात मुख्य प्रश्न
१) कारगिल ,पुलवामा ते काल प्रत्यक वेळी पाकिस्तान चा पाणी पुरवठा बंद करतात ,मग ते पाणी परत चालू कोण करते ? तेव्हा मीडिया झोपलेला असतो का ?
२) पाकिस्तान ला पाणी पुरवठा काश्मीर मधून वाहणाऱ्या नद्या सोडून अजून तिथून होत नाही का ?
३) जर चीन ने त्यांच्या नंद्याचे पाणी भारताला बंद केले तर ? तसेच दोन्ही कडे जल फुगवटा निर्माण होण्याची शकयता ?
४) कोणी सरकारी आकडेवारी माहीत करू शकते कि पाणी करार ,सोडलेले पाणी व पाणी चालू बंद करायचे निर्णय शासन स्तरावर कोण करत ?

भारतातल्या पाकिस्तान प्रेमी लोकांचे काय करायचे ?

Submitted by स्वरुपसुमित on 24 April, 2025 - 09:36

नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत

मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत

पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )

Pages

Subscribe to RSS - राजकारण