चर्चा प्रस्ताव: १९७५-२०२५ आणीबाणीची पन्नाशी
Submitted by वामन राव on 25 June, 2025 - 08:59
आज, २५ जून २०२५. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
२५ जून १९७५ रोजी, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात "आणीबाणी" जाहीर केली. त्यापुढील दोनेक वर्षांच्या कालखंडात भारताच्या लोकशाही संस्थांना, व्यक्तिस्वातंत्र्याला आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा हादरा बसला. अनेक विरोधी नेते तुरुंगात डांबले गेले, वृत्तपत्रांवर निर्बंध आले, आणि सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रशासनाचे कठोर नियंत्रण आले.
आणीबाणीचा काळ हा काळे पर्व होता की अनुशासन पर्व यावर मतभेद आहेत.
विषय: