१० वर्षांपूर्वी एका सकाळी, सुखासनात बसून मी एक नीलविवर पाहिलं होतं.त्या ध्यानात मी एक सरोवर पाहिलं… त्याच्या पाण्यात निळे गोलक, वर सात तेजवलय, आणि पार्श्वभूमीला एक शुभ्र हिमशिखर.तो एक *"दृश्य-निदर्शनाचा"* अनुभव होता — अस्पष्ट, तरी खरा.
आज, १० वर्षांनी मी मानस सरोवराच्या काठावर उभा आहे.या दहा वर्षात आयुष्यात बरेच काही घडून गेले आणि कित्येक अनुभव येऊन गेले. काही गोड काही वाईटही. पण त्याची चर्चा पुढे कधीतरी . आज मात्र या मानस सरोवराची आणि माझी गोष्ट मी कथन करणार आहे .
आज पहाटे वेगळंच काही घडलं.मी उठलो, पण सुखासनात बसण्याआधीच मनाच्या गाभ्यात एक निर्वाणीची जाणीव झाली.जणू आता “ध्यान” ही कृती उरलीच नव्हती, ती एक स्थिती बनली होती – सहज, स्वाभाविक, आणि आपली.
मी डोळे मिटले.पण आज कसलीच दृश्यं आली नाहीत.ना सरोवर, ना गोलक, ना सावली.
फक्त एक निर्वर्ण शांत प्रकाश —
ज्यात शब्द विरघळत होते,
आवाज विरत होते,
मग विचारही.
आणि मग एकअवर्णनीय शांतता हळूच उतरली.तिच्यात शब्दांचं अस्तित्वच नव्हतं.तिथे मी होतो,पण ‘मी आहे’ याचीही जाणीव नव्हती.
हेच का निर्विकल्प होणे?
हीच का समाधी?
आज पहाटे उठताना एक विचित्र भावना मनात दाटून आली होती. कालच्या तेजस्पर्शानंतर मन एकीकडे शुद्ध शांततेने न्हाऊन निघालं होतं, पण आज एक हळवी छाया कुठूनशी मागे लागल्यासारखी वाटत होती.
मी ध्यानासाठी बसलो.सारं वातावरण पूर्वीसारखंच होतं, पण आत काही तरी वेगळं… हलकंसं, पोकळसारखं.डोळे मिटताच एक नवंच दृश्य उलगडू लागलं.
मी पुन्हा त्या आभासी सरोवराजवळ होतो. पण आज सरोवरात प्रकाश नव्हता.ते निळं सरोवर एका धूसर संध्याछायेत हरवल्यासारखं वाटत होतं.
पाणी स्थिर होतं…
गोलक नव्हते…
राजहंस नव्हता…
फक्त मी होतो – आणि माझीच सावली.
त्या सावलीकडे पाहून क्षणभर गोंधळलो.
आजच्या ध्यानात जाण्यापूर्वीच मनात कालच्या तेजोबिंदूचा प्रकाश ठाण मांडून बसला होता. ४ चिच वेळ, वातावरण कुंद उजेड खिडकीतून चंद्र प्रकाश झिरपत होता. सगळं शांत.
मी पुन्हा सुखासनात बसलो. डोळे मिटले आणि श्वास शांत करताच जाणिवेच्या कडांवर पुन्हा त्या प्रकाशाच्या लाटांनी टक्कर दिली.
माझं अस्तित्व आता थेट त्या निळसर कमळाच्या तेजोबिंदूशी जोडले गेलं. शरीराच्या मर्यादा विरून गेल्या, आणि मी पुन्हा त्या आभासी जागेत पोहोचलो, जिथे काळ, दिशा आणि भौतिकता ह्या संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या.
पुन्हा रात्र टळून ब्रम्ह मुहूर्त लागला होता.मी उठलो आणि कांबळ पसरून सुखासनात बसलो ,समोरच्या घडल्यात कालच्यासारखेच चार वाजले होते.मी डोळे मिटून घेतले. मन शांत केले. मन एका कृष्णाडोहा सारखे झाले. मनात कालचा अनुभव ताजा होता . आज ही असे काही पुन्हा घडेल का हा विचार मनाला शिवून गेला . मी त्या विचारांशी झगडलो नाही फक्त पाहत गेलो विचार कुठे चालले आहेत . बस. थोड्याच अवधीत सर्व विचार विरून गेले . मन प्रसन्न वाटत होते .मन पुन्हा एका कृष्णडोहा सारखे झाले. फक्त तरंग उठत होते पण काहीच दिसत नव्हते .थोडा वेळ तसाच गेला......
रात्र टळून ब्रम्ह मुहूर्त लागला होता.मी उठलो आणि कांबळ पसरून सुखासनात बसलो ,समोरच्या घडल्यात चार वाजले होते . सुखासनात बसलो असलो तरी पाठीचा कणा मात्र ताठ होता पण बाकी सर्व शरीर हलकं आणि शिथिल होतं. पूर्वी खूप जीवाचे रान करावं लागायचे हे जमावण्यास. नाव इट हॅज बीकम अ सेकंड नेचर ,फार कष्ट पडत नाहीत.
आठवतंय…
तू खूप लहान होतास.तुझी जिज्ञासा खूप मोठी होती.तेव्हा मी तुझ्यासाठी सुपरमॅन होतो.तुझ्यासाठी मी सूर्यसुद्धा आणू शकतो, असं तुला वाटायचं.
या जगातला सर्वात ताकदवान माणूस जर कुणी असेल,तर तो नक्कीच मीच (तुझा बाबा)आहे, असाच तुझा दृढ विश्वास होता.
तो काळ…
जेव्हा मी नुकताच बाबा झालो होतो.मी मात्र नेहमी थोडा घाबरलेलाच असायचो…
एका विचाराने —
तो दिवस आला तर काय करीन,जेव्हा तुला कळेल की
तुझे बाबा काही सुपरमॅन नाहीत, ही-मॅन नाहीत,ते तर फक्त या शहरातले,साधीशी नोकरी करणारे,अगदी साधा माणूस आहेत.
कदाचित त्या भीतीमुळेच
१) जर हे त्याचे शरीर आहे , तर ती त्या शरीराचा आत्मा आहे.
२) त्यांची आठवण मला येत नाही ! कारण आठवण्यासाठी पहिला त्यांचा विसर पडावा लागतो.
३) झाडाला काय माहीत की त्याच्या सावलीत विसावणारा माणूस एक लाकूडतोड्या आहे.
४) ते भेटत नाहीत, ते वेगळे ही होत नाहीत.त्यांच अस्तित्व आणि नातं जमीन आणि आकाशा सारखे आहे .जवळीक खूप आहे, पण नातेसंबंध नाहीत.
ते अंत्यविधी नंतरच्या आठवड्याचे दिवस होते. तिने आपल्या मेहनती शाखा व्यवस्थापक पतीचा अंत्यविधी गेल्या आठवड्यातच आटोपला होता ,तिचा प्रिय पती,ज्याने दिवस रात्र कष्ट करून साध्या लिपिकापासून बँकेच्या व्यवस्थापकापर्यंतची प्रगती केली होती, आपल्या दोन मुलांना कॉलेजमध्ये शिक्षण दिले होते,परदेशात नोकरीला पाठवले होते आणि तिला एक संपूर्ण व सुखी जीवन दिले होते.
बर्याच वर्षांनंतर त्या दिवशी कसं कोण जाणे,माझी पावलं आपोआप कॉलेजकडे वळली.
गेट तेच होतं.
भिंती त्या-त्याच.
फक्त रंग थोडे फिके पडले होते.
कॉरिडॉरमधून चालताना माझ्या चपलांचा आवाज जरा जास्तच स्पष्ट ऐकू येत होता,
जणू शांततेने प्रत्येक चाहूल मोठी करून टाकली होती.
मी माझ्या जुन्या वर्गाच्या दरवाज्यापाशी येऊन थांबलो.
काही क्षण तसाच उभा राहिलो.हात पुढे करून दरवाजा ढकलला.तो हलक्या चरचर आवाजासह उघडला—