साहित्य

कैलास मानसरोवर – १० वर्षांनी पूर्णत्वाची भेट

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 10:35

१० वर्षांपूर्वी एका सकाळी, सुखासनात बसून मी एक नीलविवर पाहिलं होतं.त्या ध्यानात मी एक सरोवर पाहिलं… त्याच्या पाण्यात निळे गोलक, वर सात तेजवलय, आणि पार्श्वभूमीला एक शुभ्र हिमशिखर.तो एक *"दृश्य-निदर्शनाचा"* अनुभव होता — अस्पष्ट, तरी खरा.
आज, १० वर्षांनी मी मानस सरोवराच्या काठावर उभा आहे.या दहा वर्षात आयुष्यात बरेच काही घडून गेले आणि कित्येक अनुभव येऊन गेले. काही गोड काही वाईटही. पण त्याची चर्चा पुढे कधीतरी . आज मात्र या मानस सरोवराची आणि माझी गोष्ट मी कथन करणार आहे .

कैलास मानसरोवर एक अनुभव =दिवस पाचवा (शेवटचा) – निर्विकल्पता

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 10:26

आज पहाटे वेगळंच काही घडलं.मी उठलो, पण सुखासनात बसण्याआधीच मनाच्या गाभ्यात एक निर्वाणीची जाणीव झाली.जणू आता “ध्यान” ही कृती उरलीच नव्हती, ती एक स्थिती बनली होती – सहज, स्वाभाविक, आणि आपली.
मी डोळे मिटले.पण आज कसलीच दृश्यं आली नाहीत.ना सरोवर, ना गोलक, ना सावली.
फक्त एक निर्वर्ण शांत प्रकाश —
ज्यात शब्द विरघळत होते,
आवाज विरत होते,
मग विचारही.
आणि मग एकअवर्णनीय शांतता हळूच उतरली.तिच्यात शब्दांचं अस्तित्वच नव्हतं.तिथे मी होतो,पण ‘मी आहे’ याचीही जाणीव नव्हती.
हेच का निर्विकल्प होणे?
हीच का समाधी?

कैलास मानसरोवर एक अनुभव = दिवस चौथा – प्रकाशात हरवलेली सावली

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 10:20

आज पहाटे उठताना एक विचित्र भावना मनात दाटून आली होती. कालच्या तेजस्पर्शानंतर मन एकीकडे शुद्ध शांततेने न्हाऊन निघालं होतं, पण आज एक हळवी छाया कुठूनशी मागे लागल्यासारखी वाटत होती.
मी ध्यानासाठी बसलो.सारं वातावरण पूर्वीसारखंच होतं, पण आत काही तरी वेगळं… हलकंसं, पोकळसारखं.डोळे मिटताच एक नवंच दृश्य उलगडू लागलं.
मी पुन्हा त्या आभासी सरोवराजवळ होतो. पण आज सरोवरात प्रकाश नव्हता.ते निळं सरोवर एका धूसर संध्याछायेत हरवल्यासारखं वाटत होतं.
पाणी स्थिर होतं…
गोलक नव्हते…
राजहंस नव्हता…
फक्त मी होतो – आणि माझीच सावली.
त्या सावलीकडे पाहून क्षणभर गोंधळलो.

कैलास मानसरोवर एक अनुभव = दिवस तिसरा – तेजबिंदूचा स्पर्श

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 10:09

आजच्या ध्यानात जाण्यापूर्वीच मनात कालच्या तेजोबिंदूचा प्रकाश ठाण मांडून बसला होता. ४ चिच वेळ, वातावरण कुंद उजेड खिडकीतून चंद्र प्रकाश झिरपत होता. सगळं शांत.
मी पुन्हा सुखासनात बसलो. डोळे मिटले आणि श्वास शांत करताच जाणिवेच्या कडांवर पुन्हा त्या प्रकाशाच्या लाटांनी टक्कर दिली.
माझं अस्तित्व आता थेट त्या निळसर कमळाच्या तेजोबिंदूशी जोडले गेलं. शरीराच्या मर्यादा विरून गेल्या, आणि मी पुन्हा त्या आभासी जागेत पोहोचलो, जिथे काळ, दिशा आणि भौतिकता ह्या संकल्पनाच अस्तित्वात नव्हत्या.

कैलास मानसरोवर एक अनुभव = दिवस दुसरा - "नीलविवर – पुढील प्रवास"

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 10:02

पुन्हा रात्र टळून ब्रम्ह मुहूर्त लागला होता.मी उठलो आणि कांबळ पसरून सुखासनात बसलो ,समोरच्या घडल्यात कालच्यासारखेच चार वाजले होते.मी डोळे मिटून घेतले. मन शांत केले. मन एका कृष्णाडोहा सारखे झाले. मनात कालचा अनुभव ताजा होता . आज ही असे काही पुन्हा घडेल का हा विचार मनाला शिवून गेला . मी त्या विचारांशी झगडलो नाही फक्त पाहत गेलो विचार कुठे चालले आहेत . बस. थोड्याच अवधीत सर्व विचार विरून गेले . मन प्रसन्न वाटत होते .मन पुन्हा एका कृष्णडोहा सारखे झाले. फक्त तरंग उठत होते पण काहीच दिसत नव्हते .थोडा वेळ तसाच गेला......

शब्दखुणा: 

ए वॉक डाऊन द मेमरी लेन

Submitted by Meghvalli on 8 February, 2026 - 08:34

बर्‍याच वर्षांनंतर त्या दिवशी कसं कोण जाणे,माझी पावलं आपोआप कॉलेजकडे वळली.
गेट तेच होतं.
भिंती त्या-त्याच.
फक्त रंग थोडे फिके पडले होते.
कॉरिडॉरमधून चालताना माझ्या चपलांचा आवाज जरा जास्तच स्पष्ट ऐकू येत होता,
जणू शांततेने प्रत्येक चाहूल मोठी करून टाकली होती.
मी माझ्या जुन्या वर्गाच्या दरवाज्यापाशी येऊन थांबलो.
काही क्षण तसाच उभा राहिलो.हात पुढे करून दरवाजा ढकलला.तो हलक्या चरचर आवाजासह उघडला—

अमृतानुभव

Submitted by Meghvalli on 22 January, 2026 - 01:03

मुखी भगवंताचे नाम,
संगे संतांची संगती।
होई वृत्तीची निवृत्ती,
मिळे प्राणास सद्गती॥

ज्याचा विवेक जागृत,
त्यासी ज्ञानामृत।
ज्ञानमंथुनी जो स्व जाणे,
तोचि मुनी॥

न मनी ज्ञानाचा अहंकार,
न विषयाचा आसूड।
अंगस्नान त्यासी न कारण,
ज्याचे मन अभोगी॥

न शास्त्राचा गर्व येथे,
न शब्दांचा पसारा।
मौनचि येथे उपदेश,
अनुभूतीचा आधार॥

जिथे कर्ता उरेना,
न उरते कर्तव्यता।
तेथे मीपण गळोनि,
उरे केवळ पुर्णता॥

१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे

Submitted by रॉय on 20 January, 2026 - 02:41

१०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे होणार आहे.

आता साहित्य संमेलन म्हणजे अध्यक्ष आलाच.

या एका मोठ्या माइलस्टोन साठी कोण अध्यक्ष असावेत असे वाटते? मला खालील नावे सुचवावीशी वाटतात.

विषय: 
शब्दखुणा: 

किनारा

Submitted by आर्तजा. on 14 January, 2026 - 14:58

मी उभी त्या किनाऱ्यावर ज्या किनाऱ्यावरी
कोणी नाही
दिसले क्षितिज दूरचे पण तसले काही नाही
येते चाहूल कुणाच्या येण्याची परत जाताना
पण मागे वळून बघत राहते त्या जाणाऱ्या लाटाना

इसवीसन १,००,००० - अंतिम प्रकरण - शून्याचा शेवट

Submitted by यःकश्चित on 12 January, 2026 - 00:19

पहिल्या भागापासून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा आणि पुढच्या भागावर जाण्यासाठी त्या भागाच्या क्रमशः वर टिचकी मारा !

प्रकरण आठवे

शून्याचा शेवट

भुयाराच्या छतातून येणारे प्रकाशझोत आता स्थिरावले होते. तो निळा, कृत्रिम प्रकाश विरून गेला होता आणि त्या जागी एक अथांग, नैसर्गिक काळोख दाटून आला होता. भुयारातील तो अथांग काळोख आता एखाद्या गर्भाशयासारखा भासत होता, जिथे एका युगाचा अंत आणि दुसऱ्या युगाचा जन्म एकाच वेळी होत होता.

Pages

Subscribe to RSS - साहित्य