मनातली मूगडाळ
धरून चालूया की तुम्ही ३५ किंवा ४० वर्षांचं आयुष्य जगलेले आहात. या प्रवासात असे असंख्य प्रसंग आले असतील, जिथे तुम्ही “जाऊ दे”, “आपलीच माणसं आहेत”, “दुर्लक्ष करू” अशा विविध कारणांच्या आड अनेक अप्रिय अनुभव गिळून टाकले असतील जणू कित्येक किलो मूग गिळल्यासारखे.
पण हे सगळं कसं पचवायचं? कोणत्या मार्गाने, कोणत्या पद्धतीने?
की आयुष्यभर पोटात साठवत राहायचं…??
आणि वरून शांत असल्याचं नाटक करत राहायचं?