समाज
प्रथम तुज पाहता ....
माझी मुलगी आपण होउन, परत भारतवारी करणार आहे. यावेळेस एकटीच गोवा, केरळ, मुंबई, दक्षिणेकडील काही राज्ये. तिची पहीली भारतवारी आमच्याबरोबर २०१९ मध्ये झाली. तेव्हाचा हा अनुभव, मी शब्दबद्ध करुन ठेवलेला होता कारण माझ्याकरता ते अप्रुप होते. तो परत इथे मांडते आहे.
अन्यत्र पूर्वप्रकाशित ...
------------------------------
------------------------------
मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठी नववर्ष स्वागतयात्रा
मराठी शाळा, रोजगार आणि घरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘मराठी नववर्ष स्वागतयात्रा’
महाराष्ट्रधर्म आणि मराठीकारणासाठी मराठी अभ्यास केंद्राचे नवे पाऊल, गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास आयोजन
कल्चरल बिल्चरल शॉक
आमच्या शेतात संकरित गायी आल्या त्या काळाची आठवण झाली. त्यांना आम्ही इंजेक्शनच्या गायी म्हणायचो. एकदा आईने वसुबारसेला इंजेक्शनच्या गायीचे पूजन केले. मला प्रश्न पडला की या गायी काही आपल्या भारतीय नाहीत. हे तर परदेशी प्रकरण आहे. मग या असल्या गायीची पूजा केलेली धर्माला कशी चालते? माझ्यासाठी तो सांस्कृतिक धक्का होता. पुढे पुढे बाजरी ज्वारी गहू उस सगळच संकरित बियाण सर्रास यायला लागल अन त्यानंतर तर जीवनच संकरित झाले. तसेच या मीम्सच्या म्हणजे अभिव्यक्तिच्या संकारातून निर्माण झालेल्या गोष्टी काहींसाठी सांस्कृतिक धक्का असू शकतो. हे मी स्वानुभवावरुन सांगतो.
केस नं 73
काल केस नं 73 हा चित्रपट कोथरुड सिटी प्राईडला पाहिला. पहिलाच शो. Dr मिलिंद आपटे , psychologist and counselor, यांनी या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे
मध्यंतरी मी विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत सामाजिक जाणीवा असलेल्या सायकॉलॊजिस्ट व कौन्सिलर यांनाआवाहन केले होते. त्यानिमित्ताने माझी डॉ मिलिंद आपटे यांच्याशी परिचय झाला होता. जेव्हा त्यांनी या चित्रपटाची निर्मीती केली तेव्हा मला आश्चर्य वाटले.कारण चित्रपट निर्मिती हा त्यांचा प्रांत नव्हे. पण एकदा का सामाजिक जाणिवेचा किडा चावला की माणूस अस्वस्थ होतो. हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.
कुंपण
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.
७० च्या दशकातली पिढी (रेट्रो-जनरेशन)
७० च्या दशकातल्या पिढीकडे एक तर कुत्सित नजरेने पाहिले जाते किंवा मग खूप नॉस्टॅल्जिया असतो.
लागण
लागण
मी खिडकीत उभा होतो, कारण मला बाहेर पाहायचं होतं म्हणून नाही, तर अंतर्मन आधीच सावध झालं होतं. जळगावची ती उन्हाळ्यातील संध्याकाळ नेहमीसारखीच असायला हवी होती. रस्त्यांवर पसरलेली उष्ण हवा, धुळीचा मंद वास, पिवळसर स्ट्रीटलाईट्स, दूर कुठेतरी स्कूटरचा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं. सगळं ओळखीचं. पण तरीही काहीतरी चुकत होतं.
खिडकीतून खाली पाहिलं आणि मला ते दिसलं.
लोक,
खूप लोक.
बिस्किटचा पुडा
"शाब्बास स्वराज, हस्ताक्षर स्पर्धेत तू पहिला आला आहेस. हे घे तुझे बक्षिस, मोठी कॅडबरी."
आता काय करता येईल?
ऑटोमेशन किंवा ए आय मुळे हजारोंच्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आयटी किंवा बँकिंग या ठिकाणी वेतन बऱ्याचदा चांगले असते. या चांगल्या वेतनामुळे लोकांना एक चांगली लाइफस्टाइल जगता येते पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे या नोकऱ्याच जर राहिल्या नाहीत तर मग यावर उपाय काय? या लोकांनी मॅन्युफॅक्चरिंग सारख्या तुलनेने कमी वेतन असणाऱ्या क्षेत्रात जावे का? पण मग आतापर्यंत जी चांगली लाईफ स्टाईल जगली त्या सवयीचं काय करायचं? काही व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर किमान तीन वर्षे तो व्यवसाय नेटाने चालू ठेवल्यानंतर मग फायदा व्हायला सुरुवात होते.