संस्कृती

परिशिष्ट - विजेते सूची - प्रवेशिका यादी

Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 11:33

PicsArt_09-02-01.27.17_0.jpg
.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....

मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.

शब्दखुणा: 

मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 14:50

aaras_1.gif
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.

पावसाच्या आठवणी - जुन्या माबोवरून

Submitted by फारएण्ड on 27 July, 2025 - 10:15

जवळजवळ १८ वर्षांपूर्वी जुन्या माबोवर लिहीलेला हा लेख नवीन लोकांनी वाचावा म्हणून जसाच्या तसा पुन्हा कॉपी केला आहे. ती लिंक आहे पण आता तेथे नव्याने प्रतिक्रिया देता येत नाहीत.
----
मूळ लेख १७ जुलै २००७

शब्दखुणा: 

पाऊले चालती पंढरीची वाट..

Submitted by शिवानी बलकुंदी on 8 July, 2025 - 03:44

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला..,
हाती टाळ मृदंग, चिपळ्या, झांजा घेऊन, ओठी अविरत हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांची पावले वर्षानुवर्षे पंढरीची वारी करण्यासाठी चालत आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी, असे अभिमानाने मिरवीत देखील आहेत.

शब्दखुणा: 

अयोध्या आणि मोदीभक्ती इत्यादी...

Submitted by वाट्टेल ते on 24 June, 2025 - 17:07

नवरा आणि मुलगा सध्या भारतात आहेत. नवरा आईला घेऊन अयोध्या-वाराणसीला जाणार होता पण त्यांनी प्रवास झेपणार नाही म्हणून बेत रद्द केला. पण नवरा आणि मुलाने स्वतः जायचे ठरवले. यावर अनेकांनी आडून किंवा उघडपणे तुम्ही मोदी भक्त आहात का असे विचारले. या प्रश्नाची मी अपेक्षा केली नव्हती. पण त्यामुळे या प्रश्नाच्या मानसिकतेवर आणि ते तिथे का जात आहेत यावर जरासे चिंतन झाले.

शब्दखुणा: 

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

Submitted by मार्गी on 14 June, 2025 - 12:00

✪ Too much comfort ultimately leads to much discomfort
✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक
✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का?
✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू?
✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर?
✪ आपत्ती येणारच आहेत
✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो?

शब्दखुणा: 

मैत्र जिवांचे

Submitted by शिवानी बलकुंदी on 5 June, 2025 - 06:27

पसायदान हे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्व नियंत्याला केलेली फक्त प्रार्थनाच नाही आहे तर त्यामधून त्यांनी विश्व कल्याणासाठी मागणे देखील मागितलेले आहे, हे आपण सगळेच जण जाणतो. पण आज इथे मला त्यामधील या फक्त दोनच शब्दांनी साद घातली आणि मग मला त्यांचा अर्थ नव्याने उमगला, जो मला इथे सगळ्यांना सांगावासा वाटतोय.
वरील दोनच शब्द आणि ते शब्द असलेली ओळ म्हणजे,
“भुता परस्परे जडो, मैत्र जीवांचे.”

शब्दखुणा: 

भाग ७ - दिग्विजय

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 10:02

कान्यकुब्ज, मगध, गौड व वंग देशावर राज्य करणाऱ्या यशोवर्माच्या राज्याची पश्चिम उत्तर सीमा जालंधरजवळ होती. आणि त्याचा तळ हिस्सारजवळ स्थानेश्वर येथे पडला होता. स्थानेश्वर पूर्वापार काश्मीरच्या अधिपत्याखाली होते. कदाचित या सीमांवरून वाद होऊन ललितादित्य व यशोवर्मनमध्ये वादाची ठिणगी पडली व दिग्विजयासाठी ललितादित्याने आता यशोवर्मनच्या राज्याकडे नजर वळविली.

यशोवर्मनच्या पराभवाने त्याची अंकित सर्व राज्ये ललितादित्याच्या प्रभावाखाली आली. वंग देशानंतर ललितादित्याने आपला मोर्चा कलिंग देशाकडे वळवला व तो ही अंकित करून घेतला. तत्कालीन भारतातले हे सर्वात मोठे साम्राज्य बनले.

शब्दखुणा: 

भाग ६ - उत्तर विजय व राज्य

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 09:10

सिंध परिसरातला अरबांचा उपद्रव कमी झाला असला तरी तोखारिस्तानात बुध्दविहार, बौद्ध प्रतिमा नष्ट करणे, जबरदस्तीने
धर्मांतरे करवणे इत्यादी अरबी दहशत सुरु होती. त्यामुळे ललितादित्याने तोखारिस्तानवर हल्ला करून अरबांचा पाडाव केला.

tokharistan.png
(तोखारिस्तान - आत्ताचे बल्ख, अफगाणिस्तान)

शब्दखुणा: 

भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 08:42

मुक्तापीड सत्तेवर आला तोवर हिंदू आणि बौद्ध प्रभाव असला तरी काबूल, झाबूल तुर्कांच्या सत्तेखाली गेले होते. तोखारिस्थान (बल्ख) प्रांतांवर अरबी वर्चस्व निर्माण झाले होते. बिन कासीम मेला असला तरी अरबांनी सिंधमध्ये भक्कम पाय रोवला होता.
काश्मीरच्या आश्रयाला आलेल्या जयसिंहाने परतल्यावर खलिफाचे वर्चस्व स्वीकारून धर्मांतर केले होते व तो सिंधवर राज्य करत होता. चीनपासून काबुलकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गांवर असणारी काश्मिरी सत्ता खिळखिळी झाली होती.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - संस्कृती