निसर्ग
भाग दुसरा: मुंबई स्पिरिट : एक मौल्यवान पैलू !
२६ जुलै २००५, मुंबई,
भाग पहिला: वीस वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी ...
२६ जुलै २००५, मुंबई.
दुपारच्या चहानंतर बातम्या येऊ लागल्या की कुठे कुठे पाणी भरतयं, लोकल्स उशिरा धावतायत (लोकल्स म्हणजे तेव्हा तरी मुंबईची जीवनवाहिनीच होती). तोवर दिवसभर आत एसीत बसून कॉम्पुटरमध्ये डोकं खुपसलेल्या आम्हाला बाहेर कोसळणाऱ्या पावसाची सुतराम कल्पना नव्हती. पटापट सगळं आवरून लॉग ऑफ करून खाली येऊन बघते तो, आज जो तो बस पकडण्याच्या घाईत होता. रस्ताभर कंपनी बसच्या मोठ्या रांगा लागलेल्या. मी ही माझी नेहेमीची बस हेरून सीट पटकावली. हां हां म्हणत काही मिनिटांतच बस भरून, निघाली सुद्धा.
दक्षिण मुंबईतील एक रम्य पहाट ! - (फोटोसह)
दक्षिण मुंबईतील एक रम्य पहाट !
श्रावण पाळत नसलो तरी गटारी पाळत असल्याने ती साजरी करायला माहेरी गेलो होतो. शनिवारी रात्रीच कार्यक्रम सुरू झाल्याने रात्रभर जागरण झाले होते. मुले उशीराच झोपली, पण मी पहाटेपर्यंत जागाच होतो. डोळ्यावर झोप नाही त्यामुळे कधी एकदा उजाडते आणि मी पावसाळ्यातील थंडगार वातावरणाचा फायदा उचलत पहाटेचे दवबिंदू टिपायला घराबाहेर पडतो असे झाले होते. दर दोन मिनिटांनी किती उजाडले आहे याचा अंदाज घ्यायला खिडकीबाहेर डोकावणे चालू होते.
साधारण पावणेसहा वाजता असे उजाडू लागले आणि....
हा पहिला फोटो टिपला.
श्रावण आला...
कविता
चिखलाच्या वलयात फुलते,चिखल कधी होत नाही
काट्यांच्या विळख्यात खिळते,निखळ कधी होत नाही
कमळ फुलाच्या पाकळ्यांवर
चंद्र होऊन साचते कविता,
पानवेलीच्या धुंद कळ्यांवर
पाऊस होऊन नाचते कविता,
आयुष्य देही कुरुक्षेत्रावर
कर्ण् होऊन गाजते कविता,
निरागस जिवाला लागल्यावरती
आई होऊन याचते कविता,
चिखलाच्या वलयात फुलुन,काट्यांच्या विळख्यात खिळुन कधीही संपत नाही कविता,
माती होऊन मातीत रुजते,पुन्हा पहाटे फुलते कविता.
शब्द जमवुनि
शब्द जमवुनि
शब्द जमवुनि दोन चार ते
अर्थालागी शोधत राही
काय करावे कधी जमेना
काव्य त्यामधे उतरत नाही
निसर्ग सारा नभा मिसळुनि
द्विजगण तेथे देतो सोडून
इंद्रधनुचे उसने तोरण
जराजरासे देतो घुसडून
तरी जमेना काय करावे
ह्रदयस्पर्शी शब्दी योजून
भाव भावना शुष्क तरीही
एकामागून एक समर्पून
नैसर्गिक ते काव्य उमटते
एक कळी ती येता उमलून
स्तब्ध जरासा चकीत होउन
काव्य देखणे घेतो निरखून
---------------------------------------
नभा.... नभ, आकाश
द्विजगण.... पक्षीगण
पाऊस पडतोय (It's Raining)
पाऊस पडतोय,
समुद्राच्याच वागणुकीने बनलेले ढग , त्याच्याच इशाऱ्यावर नाचणाऱ्या वाऱ्यांनी
भारतभूच्या उत्तुंग कड्यांवर नेऊन आदळले,
आणि सुरु झाला नवा खेळ, - मॉन्सून !
पाऊस पडतोय,
पश्चिमेचे भन्नाट वारे, अरबी,बंगालच्या जलधीकडून दोहो बाजूंनी तुफान वर्षाव
काळ्याकभिन्न सह्याद्रीवर करतायत,
साऱ्या भारतभरातल्या नद्या, कडेकपारीच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत,
कधी झरा तर कधी जलप्रपात होऊन
आजूबाजूच्या माणसाला,त्याच्या व्यस्त जीवनाला,
आपल्या कवेत घेत
अनेक आयुष्ये,शहरे ठप्प करत
वारी !!!
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.
कृष्णविवर
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे
विज्ञानाचे नियम तोकडे-
ठरूनी, विपरित घडते आहे
अंतरिक्ष कक्षेत कवळुनि
कृष्णविवर हे हिंडत आहे
"नार नवेली वसुंधरा का
लट्टू विझत्या सूर्यावरती?"
कृष्णविवर वैफल्य ग्रस्तसे
उगा स्वतःला कोसत आहे
Pages
