में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे
विज्ञानाचे नियम तोकडे-
ठरूनी, विपरित घडते आहे
अंतरिक्ष कक्षेत कवळुनि
कृष्णविवर हे हिंडत आहे
"नार नवेली वसुंधरा का
लट्टू विझत्या सूर्यावरती?"
कृष्णविवर वैफल्य ग्रस्तसे
उगा स्वतःला कोसत आहे
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
एमिली मेसन आणि झारा
ही गोष्ट नाही, तर एक हृद्य सत्यकथा आहे.
माझ्या इतर कथाही घडलेल्या घटनांवर, वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरच आधारीत असतात. कारण अनेकदा सत्य हे कल्पनेहून अद्भुत असते. पण ही ऐकीव कथा होती. या कथेचे किंवा घटनेचे किंवा बातमीचे म्हणा कुठेच पडसाद मिळत नव्हते . त्यामुळं खरंच घडलेली कथा आहे कि कसे हे कळत नव्हते. जे काही ऐकलेलं होतं ते ही थोडक्यात असंच ऐकलेलं. पण जिथून ऐकलं त्याने नावं सांगितलेली ती चांगली लक्षात राहिली होती. या नावांवरून अनेकदा सर्च देऊन झाला, पण काहीही हाती लागत नव्हतं.
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.
२०२४चं वर्ष आमच्यासाठी भटकंतीच्या दृष्टीने फार चांगलं गेलं. नवीन देश पाहिले, नवीन शहरं पाहिली, काही आधी पाहिलेली शहरं, ठिकाणं, पुन्हा पाहिली, नवे अनुभव घेतले. घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्याबरोबर भटकंती केली. आणि ह्या भटकंतीदरम्यान निसर्गाने काहीश्या अनपेक्षितपणे भरपूर गमती-जमती दाखवल्या.
तो माझ्या आयुष्यात अगदी लहानपणी आईचं बोट पकडून चालायचे तेव्हापासून आहे.
ऊन्ह कलायला लागली की आम्ही, आजूबाजूची मुलं, आया मंडळी, सगळं गावचं तिकडे लोटायचं म्हणा ना!
जाताना भातुकलीची खेळणी घेऊन जायचं, त्या काळी सँड किट नव्हते ना! ओल्या वाळूत खड्डे खणायचे, विहिरी खोदायच्या, डोंगर बनवायचे, कपात थोड पाणी आणून विहीर भरण्याचा निष्फळ प्रयत्न करायचा, काडीने त्या ओल्या वाळूवर नावे लिहायची, चित्र काढायची, ओल्या वाळूचे मस्त लाडू वळायचे, कधी ते एकमेकांच्या अंगावर फोडले जायचे, तर कधी ते एकमेकांवर रचून त्यांचं कासव बनवायचं..
मैलोन मैल भटकत शंख शिंपले गोळा करायचे.. अगदी पिशवी भरभरून…
कित्येक वर्षांपूर्वी अगदी ऐन पावसाळ्यात लोणावळा-खंडाळ्याला गेले होते. धुक्यात लपलेले ते हिरवेगार डोंगर, पावसात न्हाऊन पानोपानी प्रफुल्लीत झालेली ती झाडे, हिरव्यागार डोंगरामधून कोसळणारे ते पांढऱ्याशुभ्र पाण्याचे प्रपात. ह्या अशा स्वर्गीय म्हणावं अशा मनोरम निसर्गदृश्याकडे पाहतांना मला काही क्षण अक्षरश: असुरक्षित वाटलं. ह्या सगळ्या असीम सौंदर्याचा फक्त आस्वाद घेण्याची सुद्धा क्षमता आपल्याजवळ नाही. ह्या सौंदर्यांचा आस्वाद घेण्यासाठी आपली पंचेद्रियांची झोळी फाटकी आहे आहे, असे काहीसे विचार मनात येऊन गेले. आपल्या क्षुद्र असण्याची जाणीव नव्याने अस्वथ्य करुन गेली.
असोंड या दापोली जवळच्या माझ्या गावाला राहायला आले आहे. इथे असले की नेमाने रोज सकाळी फिरायला बाहेर जाते. काय करणार, व्यायाम आवडत नसला तरी गावाकडची हवा सकाळी घरी झोपून राहूच देत नाही. शहरातल्या हवेचे चटके खाल्लेले असले की मगच किंमत कळते या हवेची..! असो, तर सांगायचं म्हणजे या काही आठवड्यातले पहाटेचे क्षण "अ वि स्म र णी य" आहेत..! बा सी मर्ढेकरांची "माघामधली पहाट सुंदर" खऱ्या अर्थाने इथे जगायला मिळते. किती आनंददायी असतात आत्ता सगळ्या पहाटवेळा; प्रसन्न, विविधरंगी आणि मोहक गंधाच्या..!
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा