“मम्मा, अगं हा आत्ताच myntra वरूंन मागवलेला टॉप कसला cool दिसतोय आणि ही जीन्स बघ ना किती elegant दिसतेय !,
“अगं पण तुला मूला कडचे बघायला येणार आहेत.. “, इति आई
“ ओय, मग काय झालं, मी काय काकू बाई सारखी साडी बिडी नाही हं नेसणार, “ त्यांना पण कळायला हवे ना मुलगी किती स्मार्ट आहे ते. “
“ अगं, फक्त कंपड्यांवरूनच आपण आपली आधुनिकता दाखवायला हवी आहे का?”
आमचा नातू लहान होता तेव्हां सारखा त्याच्या मम्मीच्या मागे मागे असायचा. सूनबाई त्यामुळं वैतागायची. माझा मुलगा कसा होता हे आता आठवत नाही. पण इतका मागं लागत नव्हता. मागे लागला लागला आणि मग जे बाहेर जायला लागला कि दरवाजाला फळी लावावी लागली. थोडा धरून चालायला लागल्यानंतर मग सतत बाहेरच असायचा.
पण त्या दिवसात त्याने सूनबाईंना नको नको केलं होतं. नंतर मुलगा म्हणजे त्याचा बाबा आला कि त्यालाही तसंच करायचा. माझ्याही मागे मागे असायचा. सगळे घाबरायचे त्याला. हाहा.
आकाशात उडणारे जेव्हां जमीनीवर चालू लागतात
आणी चक्क् माणसांशी बोलू लागतात...
खरं म्हणजे अशात् इतरांनाच आश्च्रर्य व्हावं
ह्यांना धरतीवर बघुन माणसांनीच घाबरावं
पण वर हेच उलट शिमगा करतात
म्हणे, हि माणसं आम्हाला घाबरवतात
आकाशी उडतांना तर सर्वच् जवळ होते
चंद्र, सुर्य, तारे नेहेमीच आटोक्यात होते
मग आता, आकाश सोडुन इथे काय भावलं?
हे पाखरु आज् जमीनीकडे कसं काय धावलं?
म्हणे, सुर्य लांबूनच गुलाबी वाटतो
जवळ जाता नुसताच् जाळतो
तारे आहेत लांबच-लांब रे सारे
चंद्र् ही एकच् आणी कितीतरी झुरणारे
निमित्त झाले आहे परवाच पार पडलेल्या एका कौटुंबिक मेळाव्याचे.
सध्याचा सगळ्यात चर्चिला जाणारा विषय म्हणजे इराण युद्ध, त्यावर सगळ्यांचे बोलणे झाले, मग गाडी वळली गॅस टंचाईकडे. आलेले लोक वेगवेगळ्या शहरातील होते, त्यामुळे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काय चे बोलणे झाले. बहुतेकाांनी काही प्रॉब्लेम नाही आहे असे सांगितले.
पण पेपर मध्ये तर फोटो बातम्या येत आहेत म्हटले तर हा सगळा ऑपोझीशन चा प्लान आहे, उगाच कोणत्यातरी कोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ते बोंबलून सांगतात असे एक नातेवाईक म्हणाले.
माझे तुझे नाते असे ऊन-सावली समान
एका विना दुजा नाही, दोन जीव एक प्राण
माझे तुझे नाते जसे, सूर्य भिजे पावसात
भेट होई जेव्हा कधी, इंद्रधनू फुलतात
नाते जसे कमळात, अडकला कोणी भुंगा
हवीशी ही कैद तरी, सुटकेचा मांडी दंगा
गोकुळीची राधा तू अन्, कृष्ण मी गं द्वारकेचा
दोघांमध्ये फक्त आता आर्त स्वर बासरीचा
शापित मी यक्ष सखे, वाट पाहतो मेघाची
तुझ्यासाठी पाठवण्या, ओळ एक कवितेची
-विद्याधीश
माझ्या आजूबाजूला नुकतीच घडलेली एक घटना मला खूप अस्वस्थ करून गेली.
एक आजी-आजोबा आहेत. त्यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत. यापैकी एक मुलगा स्वर्गवासी असून उरलेली सर्व मुले-मुली आपापल्या संसारात सुखी आहेत. आजी-आजोबांनी जमीन विकून मिळालेले पैसे दोन मुलांना देऊ केले; पण जेव्हा काही अडचण येते किंवा काही करण्याची वेळ येते, तेव्हा नेहमी मुलीच पुढाकार घेऊन उभ्या राहतात.
वर-वर वाटलं तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
हसतो आपण हसता हसता, रडतो आपण रडता रडता ,
जीवात जीव ओतत ओतत, उतू जातो डोह पुरता ;
शिडास वादळ भिडतं जेव्हा, आपल्या पायी जळतं तेव्हा,
सारं दिसून मनात त्यांच्या सलंत-बिलंत काही नसतं,
वर-वर वाटलं, तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..
ध्यानीमनी नसताना आई गेल्या रविवारी आई गेली
आम्ही छान गप्पा मारत चालत होतो आणि अवघ्या दहा मिनिटांत आई गेली हे जग सोडून
माझं सगळ जग माझी जिवाभावाची मैत्रीण जिच्याशिवाय आयुष्य जगणं ही कल्पनाही अशक्य वाटायची ती माझी लाडकी आई गेली
आई आणि वडील दोघांचही कर्तव्य पार पाडून मुलांच्या सुखासाठी, आनंदासाठी कायम धडपडणारी माझी आई
सगळ्या संकटांना तोंड देऊन स्वभावाने अगदी निरागस, लहान मुलांसारखी भाबडी असणारी, कुटुंबावर मुलांवर भरभरून प्रेम करणारी माझी आई
आई प्रत्येक अडचणीत पाठीशी उभी राहिलीस, प्रत्येक हौस पूर्ण केलीस