नातीगोती

आपण सिलेक्टीव संवेदनशील बनत चाललो आहोत का?

Submitted by प्रेमाच्या_पन्न... on 18 March, 2026 - 06:03

निमित्त झाले आहे परवाच पार पडलेल्या एका कौटुंबिक मेळाव्याचे.
सध्याचा सगळ्यात चर्चिला जाणारा विषय म्हणजे इराण युद्ध, त्यावर सगळ्यांचे बोलणे झाले, मग गाडी वळली गॅस टंचाईकडे. आलेले लोक वेगवेगळ्या शहरातील होते, त्यामुळे तुमच्याकडे काय? आमच्याकडे काय चे बोलणे झाले. बहुतेकाांनी काही प्रॉब्लेम नाही आहे असे सांगितले.
पण पेपर मध्ये तर फोटो बातम्या येत आहेत म्हटले तर हा सगळा ऑपोझीशन चा प्लान आहे, उगाच कोणत्यातरी कोपऱ्यात घडलेल्या गोष्टी ते बोंबलून सांगतात असे एक नातेवाईक म्हणाले.

पुण्यसंचय / पूर्वसंचित

Posted
2 आठवडे ago
शेवटचा प्रतिसाद
2 आठवडे ago

मला तर पूर्वसंचित किंवा पुण्यसंचय ही गोष्ट भविष्यात आपण कधी काही करण्यास कमी पडलो तर माफी मिळावी किंवा सवलत मिळावी, या अपेक्षेने आधीच करून ठेवलेली चांगल्या कामांची तजवीज वाटते.

दहा वेळा आपण कोणासाठी तरी जीव ओतून काहीतरी करतो; आणि अकराव्या वेळेला जर थोडी कुचराई झाली, तर निदान हा माणूस मुद्दाम असे करणार नाही इतकी खातरी समोरच्याच्या मनात निर्माण होते ती फक्त आधी दहा वेळा जीव ओतून केलेल्या गोष्टींमुळे.

प्रकार: 

माझे तुझे नाते

Submitted by विद्याधीश on 10 March, 2026 - 11:55

माझे तुझे नाते असे ऊन-सावली समान
एका विना दुजा नाही, दोन जीव एक प्राण

माझे तुझे नाते जसे, सूर्य भिजे पावसात
भेट होई जेव्हा कधी, इंद्रधनू फुलतात

नाते जसे कमळात, अडकला कोणी भुंगा
हवीशी ही कैद तरी, सुटकेचा मांडी दंगा

गोकुळीची राधा तू अन्, कृष्ण मी गं द्वारकेचा
दोघांमध्ये फक्त आता आर्त स्वर बासरीचा

शापित मी यक्ष सखे, वाट पाहतो मेघाची
तुझ्यासाठी पाठवण्या, ओळ एक कवितेची

-विद्याधीश

घराघरातला मौन-संमतीचा गुन्हा

Submitted by दक्षिणा on 5 February, 2026 - 01:57

माझ्या आजूबाजूला नुकतीच घडलेली एक घटना मला खूप अस्वस्थ करून गेली.
एक आजी-आजोबा आहेत. त्यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत. यापैकी एक मुलगा स्वर्गवासी असून उरलेली सर्व मुले-मुली आपापल्या संसारात सुखी आहेत. आजी-आजोबांनी जमीन विकून मिळालेले पैसे दोन मुलांना देऊ केले; पण जेव्हा काही अडचण येते किंवा काही करण्याची वेळ येते, तेव्हा नेहमी मुलीच पुढाकार घेऊन उभ्या राहतात.

सख्खं असं काही नसतं..

Submitted by मंदार खांबेटे. on 13 December, 2025 - 16:19

वर-वर वाटलं तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..

हसतो आपण हसता हसता, रडतो आपण रडता रडता ,
जीवात जीव ओतत ओतत, उतू जातो डोह पुरता ;
शिडास वादळ भिडतं जेव्हा, आपल्या पायी जळतं तेव्हा,
सारं दिसून मनात त्यांच्या सलंत-बिलंत काही नसतं,
वर-वर वाटलं, तरी सख्खं असं काही नसतं,
ही जाणीव तेवढी सोडली, तर दुःखं असं काही नसतं..

ए आई ~~

Submitted by आईची_लेक on 14 September, 2025 - 12:43

ध्यानीमनी नसताना आई गेल्या रविवारी आई गेली
आम्ही छान गप्पा मारत चालत होतो आणि अवघ्या दहा मिनिटांत आई गेली हे जग सोडून
माझं सगळ जग माझी जिवाभावाची मैत्रीण जिच्याशिवाय आयुष्य जगणं ही कल्पनाही अशक्य वाटायची ती माझी लाडकी आई गेली
आई आणि वडील दोघांचही कर्तव्य पार पाडून मुलांच्या सुखासाठी, आनंदासाठी कायम धडपडणारी माझी आई
सगळ्या संकटांना तोंड देऊन स्वभावाने अगदी निरागस, लहान मुलांसारखी भाबडी असणारी, कुटुंबावर मुलांवर भरभरून प्रेम करणारी माझी आई
आई प्रत्येक अडचणीत पाठीशी उभी राहिलीस, प्रत्येक हौस पूर्ण केलीस

शब्दखुणा: 

शशक २ - पत्र - अni

Submitted by अni on 31 August, 2025 - 02:49

गणपतीला गावी आलेल्या आपल्या नातवाला ट्रंकेतला खजिना दाखवत आजोबा म्हणाले -
“तुझ्या आजीसाठी लिहलेलं पहिले पत्र”
इंस्टा व्हाट्सएपवाला नातू हसला, आजोबा शांत झाले.
दोन क्षणाच्या स्तब्धतेनंतर तो स्वतःच बोलला -
“आज पुन्हा एक पत्र लिहा….”

थरथरणाऱ्या हातांनी वहीच्या पानावर अर्धशतकाहुन जास्त संसाराच्या रेषा सावकाश उमटू लागल्या.
“प्रिय…”

एवढं लिहिलं तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

नातवाने आजोबांचा हात धरला आणि म्हणाला,
“मी लिहितो, तुम्ही फक्त बोला.”

सोडून दिलंय

Submitted by जोतिराम on 10 July, 2025 - 10:28

हो, मी आता रडणं सोडून दिलंय
रोज रोज मरणं सोडून दिलंय
बोलताना समोरून उत्तर अन
ऐकताना झुरणं सोडून दिलंय

मानाची इच्छा, प्रेमाची अपेक्षा,
रोजच होणारी त्या शब्दांची समीक्षा
प्रतीक्षा, शुभेच्छा, सदिच्छा साथ
स्वेच्छेने पुरवणं सोडून दिलंय

हो, मी आता रडणं सोडून दिलंय

वाद - अनुवाद, साद - संवाद,
उगाच द्यायचा म्हणून प्रतिसाद
सगळे नाद, दाद, विवाद, संवाद,
आता वापरणं सोडून दिलंय

हो, मी आता रडणं सोडून दिलंय

शब्दखुणा: 

ये हृदयीचे ते हृदयी

Submitted by धनश्री- on 5 June, 2025 - 12:31

कधी कधी मूड उगाचच नकारात्मक होउन जातो. जळी-स्थळी- काष्ठी-पाषाणी फक्त स्वतःच्या चूका आठवु लागतात. आणि त्याही १० पटींनी मॅग्निफाईड. खरे तर आपण सारे जण उन्नीस बीस त्याच किंवा तितक्याच गंभीर चूका करत असतो, जवळ जवळ चूक करता करता सावरलेलो असतो. ते काही का असेना, निखालस ईव्हिल आणि निर्दयी आपल्या इनर क्रिटिकला ते मंजूर नसते. खदाखदा हसत क्वचित कुत्सित हसत आपल्यातील प्रत्येक दोष तो १० पटींनी मॅग्निफाय करुन दाखवत असतो. कामच आहे ना ते त्याचे - उगाच तांडव करायचे.

Pages

Subscribe to RSS - नातीगोती