माझ्या आजूबाजूला नुकतीच घडलेली एक घटना मला खूप अस्वस्थ करून गेली.
एक आजी-आजोबा आहेत. त्यांना दोन मुलं आणि तीन मुली आहेत. यापैकी एक मुलगा स्वर्गवासी असून उरलेली सर्व मुले-मुली आपापल्या संसारात सुखी आहेत. आजी-आजोबांनी जमीन विकून मिळालेले पैसे दोन मुलांना देऊ केले; पण जेव्हा काही अडचण येते किंवा काही करण्याची वेळ येते, तेव्हा नेहमी मुलीच पुढाकार घेऊन उभ्या राहतात.
प्रेम हवे असणाऱ्या एकाला कालपर्यंत प्रेम मिळत नाही, त्यात त्याचे प्रयत्न त्यालाच अगदी चुकीचे वाटू लागतात, आणि आजपासून तो ठरवतो की त्या प्रेमाची वाट तो आयुष्यभर बघेल.
काल
त्या डोळ्यात मी स्वतःला
पाहून घेत होतो
तो गंधित श्वास जवळी
राहून घेत होतो
चुकुनी पुन्हा पुन्हा मी
समजून घेत होतो
माझेच विश्व सारे मी
मागून घेत होतो
आता
अक्षम्य त्या गुंह्यांची
माफीचं घेत आहे
पूर्णावळीस मागे अन
आधीच घेत आहे
तुकडा अश्या मनाचा
भंगून देत आहे
हा चेहरा खरा खरा मी
रंगून घेत आहे
आघात आज आला, आधार आज आला
प्रेमात ना कधीही, हा भार आज आला
मी शोधले शब्दात अन वेळीच ना मिळाले
बंधात बांधलेला मग सार आज आला
गहिरे मनात होते जे सांगून ना कळाले
भरदाव भावनांचा सैवार आज आला
येतो अजूनही तो मंजुळ नाद कानी
बेभान अंतराचा व्यवहार आज आला
तू बोलून टाक सारे, माफी नकोस मागू
मागेच माफ झाले, दरबार आज आला
बांधून पाहिली मी प्रत्येक गाठ येथे
तुटले कधीच सारे, संसार आज आला.
- जोतिराम