सखे, तू
- चंद्रहास शास्त्री
मात्रा = १७
मी कुठे मागतो सर्वकाही, द्यायचे तेवढे दे सखे तू
मी कुठे देतसे सर्वकाही, घ्यायचे तेवढे घे सखे तू.
मी कुठे सांगतो सर्वकाही, तू कुठे ऐकते सर्वकाही
मी कुठे म्हणतो तुला जराही, ऐकायचे ते ऐक सखे तू.
तकरार नाही इकरार हवा, आपलासा एक मितवा हवा
प्रेमाचा असा चांदवा हवा, रहायचे तसे रहा सखे तू
इतकेच ओळखीचे
© चन्द्रहास शास्त्री
इतकेच ओळखीचे, आपुले नाते असे.
काही सारखे नसे, पण पारखेही नसे
कोणी कसे पहावे, अपुल्या हाती नसे
म्हणावे काय कोणी, अपुल्या ओठी नसे.
हसणेच गुन्हा असे, सवय हीच जात नसे
मूर्खांच्या स्वर्गी या, कधी पारिजात नसे
मोकळ्या आकाशी, ढग हे पाहती कसे
स्वच्छ चांदणे यांना, पाहताच येत नसे
रागवेल निसर्गही, जिभेला हाडच नसे
देवाच्या काठीला, म्हणे आवाजच नसे
खबरबात नाही.
© चन्द्रहास शास्त्री
क्षण असा एकही जात नाही
की, तुझी आठवण येत नाही
माझी कविता मी गात नाही
मोगऱ्याची बरसात नाही.
सूचतात काही काव्यपंक्ती
सांजवेळ टळून जात नाही
कितीदा फुलती वनात चैती
पण चांदण्यांची रात नाही.
गायिले पंचमाचे सूर जे
ते तर आता ओठांत नाही.
लय ती गेली आभाळी कुठे
मला दिसतही मेघात नाही.
मी पहाटे गेलो उद्यानी
पण तिथे तो पारिजात नाही
तिथल्या त्या बहरल्या लतांनी
दिली काही खबरबात नाही.
गीत नवे
©️ चन्द्रहास शास्त्री
शब्द वेगळे अर्थ वेगळे, सखे, बोलणे निमित्त असते,
कुणां कळते बोललेले ते, ऐकले ते बोलले नसते
लोकांस चंद्र दाखवूनही, कमळ मात्र फुललेले असते
काय करावे लोकांचे या, त्यांना काही कळतच नसते.
आपण दोघे मोहरलेले, आठवणींची सोबत असते
हृदयाच्या या राज्यात सखे, आपल्या विना कुणी नसते.
पहारे असू देत कितीही, त्यांची तमा कोण का करते
बरसणाऱ्या साऱ्या सरींना, तसे जगणे ठाऊक असते.
बदललेली ती..
बुटकी ती.. काळी ती..
कुरूप ती.. नकोशी ती..
परित्यक्ता ती.. विधवा ती..
असायचीच अशी एखादी ती..
भरलेल्या प्रत्येक कुटुंबात..|
कान्हा उदार आहे.
चंद्रहास शास्त्री
ऊन पाऊस वारा, ऋतु मजेदार आहे
बंद हे दार आहे, कान्हा उदार आहे.
चित्त हेच गाभारा, रोज माझे मागणे
मन हे मंदिर आहे, कान्हा उदार आहे.
घेतले फार काही, नाकारले नाही
जीवन उधार आहे, कान्हा उदार आहे.
तेही दिले तयाने, न होते प्राक्तनी जे
तोच दातार आहे, कान्हा उदार आहे.
मदमोहमत्सराचा, जगी अंधार आहे
मला आधार आहे, कान्हा उदार आहे.
तू येशील तेव्हा
काजळी धरलेल्या
मिणमिणत्या नंदादीपाची
पिवळसर ज्योत
भडकेल क्षणभर
विझेल अकस्मात
अन्
जळक्या वातीचा उग्र दर्प
भरून राहील चराचरात...
कोपरे धरून असलेले
सुजलेले डोळे
पेंगणारे चेहरे, सोडतील
सुटकेचा दीर्घ नि:श्वास
लगेचच चालवू लागतील
पुढच्या ‘ क्रिया - कर्माचे ’
व्यावहारिक व्याकरण...
कोंदण
हिरा तर देणारच नाहीस कधी
मग कोंदण तरी कशाला...?
माझी चिडचिड अन माझीच तक्रार...
कधीतरी आठवलं तटकन
दुःख कपड्यातलं चांगल्या
ही तर माझीच
कधीकाळची प्रार्थना
मागितल्यावर मिळतं ह्यावर
विश्वास होता बहुतेक अपार
पण ओंजळीत तर
होती ढीगभर लाज
सुख अन रेशमी कपडे
दोन्ही मागणं जमलंच नाही
फाटक्या आयुष्यात सुख असतं
हेही कधी पटलंच नाही.
आता सांभाळतेय मी
माझं भकास सोनेरी कोंदण
कुणाला कळू नं देता
त्याचं रिकामपण ||
निवाल्या सर्व वृत्ती ,ईच्छांचा पाचोळा झाला
पेटवला अग्नी मनांत आणि तो कचरा राख केला
आत्म सुखात नग्न न्हाऊन मी लूटला स्वानंद
नको नको ते जोपासले वृत्तींनी माझ्या छंद
पुळणीवरून चालतांना मागे वळुन पाहिले
पाऊल खुणा पाहुन माझ्या, मनी वैराग्य दाटले
मेघ गर्जना आसमंती,मग अश्रू डोळ्यांत माझ्या का दाटले
अलवार आनंद-स्मित मी हळुच, का सर्व सद जनांत वाटले
आयुष्याच्या या वळणावर नको अहिकाचा बडिवार आता
चरणांशी तुझ्या आलो नाथा, नोको लोटूस मज तू दूर आता
शुक्रवार १९/०४/२०२४ ०३:३० PM
अजय सरदेसाई (मेघ )
घराघरातून चिवचिवणाऱ्या
प्रत्येक शहाण्या मुलाला
आखीवरेखीव चाकोरीत ढकलून
बोन्सायगत वाढवण्यालाच
आपण संस्कारा-बिंस्काराचे
बिरूद चिकटवून देतो,
अवास्तव अपेक्षांचे वेताळओझे
कोवळ्या खांद्यांवर लादून
समजुतीच्या (त्याच त्या!) गोष्टी सांगत
त्यांना जन्मभर हाकारत जातो
आई म्हणते:
शहाणा मुलगा नेहमी
स्वत:च्या हाताने जेवतो
टाकत नाही उष्टेबिष्टे
करत नाही पसारा घरभर,
- आम्हाला असते एवढे स्वातंत्र्य
सुख सुविधा तर
आज कुठच्या कुठे असतो!
करवादल्या बाबांची टकळी
चालूच असते दिवसभर