कोविड महामारीपासून, घरून कामाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ती काळाची गरज होती. पण आता परिस्थिती नसताना त्याच गोष्टीला चिकटून राहण्यात काय शहाणपण आहे? काही प्रमाणात प्रवासातील अडथळे आणि प्रवासाचा वेळ दूर होतो, कर्मचाऱ्यांची ऊर्जा वाचते. पण तुमचा प्रवासाचा त्रास वाचला म्हणून ऑफिसमधून काम करण्याचे इतर मौल्यवान फायद्यांचा त्याग करणे योग्य आहे का?
मला नेहमीच पंजाबी लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आवडतो. कधीच नशिबावर . हवाला ठेवून न जगणारे, भिक न मागता, कष्टावर अतोनात विश्वास ठेवणारे, धर्मातील सेवेसारख्या व्रताचा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर अंगीकार करणारे आणि कोणत्याही कसोटीच्या क्षणी मनासारख्या न होणाऱ्या गोष्टीला ‘ओ! कोई गल नहीं’ असं म्हणत काळजीचीच विकेट घेणारे; खाण्यापिण्यात, आदरतिथ्यात आणि वागण्यात कमालीचा मोकळेपणा राखणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्यांक (अगदी २-३%)असूनही कधीही कुठल्या आरक्षणाची मागणी न करता स्वतःच स्थान नोकरी,व्यवसाय ते देशाचं संरक्षण करण्यापर्यंतच्या क्षेत्रात निर्माण करणारे असे ते पंजाबी!
ही झोपमोड अटळ होती. कारण टाळ-मृदंगाचा आवाज आणि हरिनाम हे काही रोज-रोज ऐकू येत नाही. डोळे किलकिले करत मोबाईल बघितला - पहाटे ४ च्या आसपास. आमच्या गॅलरी मधून सोलापूर हाय-वे साफ दिसतो. इंद्रायणी काठी स्नान करून दिंड्या-पताका याचा दिशेने येत होत्या. नंतर उजाडले तेव्हाच जाग आली. तोच सौ. चा आवाज “अहो आवरा लवकर, ती लोकं यायची वेळ झालीये.” अर्धा-पाऊण तासांत जिकडं-तिकडं करून खाली पार्किंग मध्ये आलो. कमिटी मेंबर्स वारकरी वेशात घोळका करून उभी. वेष च तो. आपण वाघाची कातडी पांघरली म्हणून काय आपण वाघ होत नाही.
रणवीरसिंगने दीपिका पदुकोणचा पेटीकोट घातला. व्वा! व्वाव्वा!! व्हॉट अ फेमिनिस्ट गाय! क्यूडोस!! मिंत्राने आपल्या जाहिरातीत पुरुषाला साडी नेसवले. ओ हो! सो क्यूट! किती छान कल्पना! स्त्रीवादी कल्पनेला सलाम!
दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं. त्यानंतर मी माझ्या भाच्याबरोबर परतीसाठी मिरजेहून 12493 दर्शन एक्सप्रेसची निवड केली आणि आरक्षणही करून टाकलं.
आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणार्या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी देणारं.
त्या दिवशी नेहमीप्रमाणे तू फेबू उघडलस आणि कुणाकुणाचे फ्रेंड रिक्वेस्ट आलेत ते बघितलंस. एका रिक्वेस्टवर तुझी नजर खिळली. रामचरित मानस शर्मा. हँडसम बॉय, आय टी इंजिनिअर. सिंगल. वोव! हॉबिज बघितलेस. बॉलिवूड, शेरो शायरी, टी वी आर्टीस्ट, म्युझिक लवर, गिटार प्लेअर, त्याने लिहिले होते. एक शेर ही लिहिला होता, “मंजिल मिल ही जायेगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं.” सुभानल्ला, तू मनात म्हणालीस. तू त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीस. जरा वेळाने त्याचा मेसेज आला, थँक्यू. थँक्यू कशाला? तू विचारलं, मला तू मित्र म्हणून स्वीकारलं ना, त्यासाठी, त्याने उत्तर दिले.
रेवतीबेन, तमे जे कह्यु के ब्राह्मणांनी देवदेवतेची, क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी, वैश्यांनी संपत्तीदर्शक नावे ठेवावीत असं सांगितलं ते मला काय पटलं नाही. शिवाय शूद्र यांच्याबद्दल तुम्ही बोललाच नाहीत. त्यांनी काय पाप केलंय?
खरच की, अहो शुद्रानी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची नावं ठेवावीत की. पाप बीप काही लागत नाही.
असं कसं शक्य आहे? एका बाजूला तुम्ही म्हणता ब्राह्मणांनी देवदेवतेची , क्षत्रियांनी वीरता दिसेल अशी, वैश्यांनी संपत्ती दर्शक नावे ठेवावीत आणि दुसऱ्या बाजूला शुद्रानी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची नावं ठेवावीत. कुछ हजम नहीं हो रहा है.