मी वाचलेले पुस्तक -४
आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.
आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.
आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.
आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.
तुझ्या कृपेच्या कथा ऐकल्या मी बहुत,
आज मीही अनुभवला स्पर्श तो अद्भुत।
शब्द माझे हरवले गहिवराच्या प्रवाहात,
कृतज्ञ अश्रू ओघळती शांत ह्या डोळ्यांत।
कसे फेडू दत्ता तुझ्या प्रेमाचे पांग,
करितो प्रार्थना—नित्य ठेवावा संग।
मनपटलावर निर्झरती तुझ्या कीर्तीचे उखाणे,
मन भरून येते आठवून तुझे तराणे।
तुच केली सरस्वती बहाल माझ्या शब्दांना,
केली लय प्रदान माझ्या कवितांना।
ठेव अशीच कृपा नित्य माझ्यावर,
मिळो कीर्ती नि भुक्ती मम कवितेवर।
बीज गीताचे रोवलेस तूच—तूच वृक्ष कर आता,
दत्ता, तव इच्छेविण दुज्या कुणाची काय गाथा।
निखळले आकाश तारकांचे,
मी न मोजले तुकडे त्याचे।
क्षण होता एवढाच — जगण्याचा पूर्ण,
ना प्रश्न उरले, ना क्षण उत्तरांचे।
स्तब्ध सर्व — शरीर, मन नि विचार,
फक्त स्पंदन हृदयाचे — हाच व्यवहार।
एक सणक मुळातून सळसळली वर,
थेट सहस्राराशी भिडली सरसर।
हिच का ती गायत्री, कुंडलिनी झाली जागृत,
भंगले आकाश — का हिलाच भेटण्यास मूर्त?
कळेना काहीच — ना तो विचारही उत्स्फूर्त,
स्तब्ध सर्व — मी होतो साक्षी फक्त।
हा मोह तुझा का होतो,
जरी दूर दूर मी राहतो।
नकळतच मी गुरफटतो,
प्रयत्नांनीही न मग सुटतो॥
मी दिवस तळपत्या उन्हाचा,
तू शांत तरल रात्र चंद्राची।
न कुठेही मेळ दोघांचा,
तरी भेट आपली सांजेची॥
कोणत्या धाग्यांनी बांधलं,
नातं कसं विणलं, कळतच नाही।
दूर अंतराच्या पल्याडही,
ही ओढ कमी होत नाही॥
शब्द न सापडले तरीही,
मन काहीतरी बोलतं।
तू नसतानाही नकळत,
हृदय तुझ्याशीच जुळतं॥
हे स्वप्नाळू मन बेपरवाह,
जाणे कोणत्या गगनात उडतं।
शुभ्र मेघांना घेऊन कवेत,
कोणत्या आकाशी दडतं॥
डोळ्यांत दाटते काही, कारण कधी कळेना,
मन मात्र भटकत राहे, थांबणं त्याला जमेना…
वाटेवर चालताना, वाटच नवी फुटेना,
हातात येतं काही, तरीही काही मिळेना…
कधी शांत दर्याशी बसून राहावंसं वाटे,
लाटांच्या कुजबुजीत काही ऐकू येईना…
स्वतःलाच विचारताना शब्दच हरवून जातात,
उत्तरांच्या या गर्दीतही माझे उत्तर सापडेना…
हळूच काही विरघळे, कळतही नाही केव्हा,
रिकाम्या त्या जागी मन शून्यातही रमेना…
ना शेवट या शोधाचा, अन सुरुवात ही सापडेना,
मन तूषार्त का अधांतरी— अजूनही कळेना…
मंगळवार, ३१/३/२६ , २:०५ PM
अजय सरदेसाई -मेघ
सुरवंटांतून निघतात फुलपाखरं,
सुरवंट की फुलपाखरू — काय खरं?
बंद कळींतून उमलतं फुल गोजिरं,
कळी की फुल — काय खरं?
दिवसातून रात्र येते, रात्रीतून पुन्हा दिवस,
दिवस की रात्र — आधी कोण, सांग बरं?
झऱ्याचा विस्तार नदीत, नदीचा सागरात,
अस्तित्व जाते कुठं त्यांचं, सांग बरं?
बालकातून तरुण जन्मतो, तरुणातून प्रौढ,
क्षणात बदलतं शरीर — मरतं का जन्मतं, सांग बरं… काय खरं?
सतत सगळं बदलतं, तूषार्त काय शोधतो,
कोण शांत साक्षी याचा — सांग बरं?
बदलतं स्वरूप मिथ्या, तत्त्व आतलं खरं,
उमगलं का नाही, सांग बरं?
तीन ऋतू तीन तर्हा
धर्म वेगळे,वेगळी ओळख
हिरवा, रखरखीत, पानगळ
ऊन्हाळा गरम
पावसाळा चिंब
हिवाळा थंड
ठरवलं एकदा तिघांनी
करु आपण बंड
ऊन्हाळा झाला चिंब
घामाने
पावसाळा झाला थंड
पाण्याने
हिवाळा झाला गरम
चहाने
बदलले काहीच नाही
ना धर्म ना ओळख
नावं ही नाही
शनिवार, २८/३/२६ , २:०० PM
अजय सरदेसाई -मेघ
तुझ्यासाठीच गुंफला हा भावविश्वाचा पसारा,
तुझ्यासाठीच फुलवला हा प्रेमाचा मोर पिसारा।
तुझ्या एका स्मितहास्यात विश्व सगळं उजळून गेलं,
मी मात्र सावल्यांमध्ये शोधत राहिलो निवारा।
तुझ्या स्वप्नवेलींनी बांधला मी श्वास माझा,
तुझ्या भेटीचा स्वप्नातही केला प्रत्येक क्षण साजरा।
तुझ्या आठवणींचा वारा अजूनही स्पर्शून जातो,
तो स्पर्श वाटतो जणू एखादा थंड निखारा।
‘मेघ’ अजूनही भिजतो त्या आठवांच्या क्षणांत चिंब,
अलवार पसरतो देहांत एक अनामिक शहारा।
गुरुवार, २६/३/२६ , ८:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ
विचारलंस आम्हाला—आम्ही आणखी काय राखतो,
ओठांवर शब्द आणि हातात लेखणी राखतो।
रक़ीबाचे दर्शन जेव्हा होते नकळत असे,
स्पंदनांच्या अंतरी मूक दुःखही राखतो।
तुझं प्रेमच कदाचित—माझा एखादा भ्रम असेल,
तरीही तुझा प्रत्येक घाव शिरोधार्य राखतो।
तुझ्या त्या आडमुठेपणाचा थांबत नाही सिलसिला,
जगण्यासाठी म्हणून थोडासा स्वतःचाच भ्रम राखतो।
हे प्रेमच वेडं आहे—मनास कधी न जुमाने,
तुझे प्रतिबिंब नेहमी डोळ्यांतच राखतो।
‘मेघ’ म्हणे—इतकं सोपं नाही मनाला ओळखणं,
या हृदयात दडवून अगणित गूढविश्वं राखतो।