आज, २५ जून २०२५. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
२५ जून १९७५ रोजी, तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात "आणीबाणी" जाहीर केली. त्यापुढील दोनेक वर्षांच्या कालखंडात भारताच्या लोकशाही संस्थांना, व्यक्तिस्वातंत्र्याला आणि माध्यमांच्या स्वातंत्र्याला मोठा हादरा बसला. अनेक विरोधी नेते तुरुंगात डांबले गेले, वृत्तपत्रांवर निर्बंध आले, आणि सामान्य जनतेच्या आयुष्यावर प्रशासनाचे कठोर नियंत्रण आले.
आणीबाणीचा काळ हा काळे पर्व होता की अनुशासन पर्व यावर मतभेद आहेत.
गंगोत्रीहून सोनप्रयागच्या वाटेवर पाय मोकळे करायला बसमधून उतरलो होतो तेव्हा गप्पाष्टकांचा घोळक्यात न्यूजर्सीहून आलेली मरिया होती. तिचे आईवडील इटलीहून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत येऊन वसलेले. साहजिकच अमेरिकेत वाढलेली असली तरी मरियाच्या बोलण्यात इटालियन लहेजा होता. तिचं बोलणं ऐकताना बीबीसीची ‘माईंड युअर लँग्वेज’ मालिकेची आठवण झाली. गोरा वर्ण, भुरे केस, मध्यम बांधा आणि घरेलू, कुटुंबवत्सल लूक असलेली मरिया प्रवासाने जास्तच थकल्यासारखी वाटत होती.
# राजकीय एक्स्पर्ट ऐवजी सामान्य लोकांची मते, विचार, भावना जाणून घ्यायच्या असल्याने आणि स्वताच्या व्यक्त करायच्या असल्याने धागा मुद्दाम ललित लेखनात काढला आहे
--------------------------------+
आज ऑफिस मधून घरी परत येताना रस्त्यात प्रचाराची मिरवणूक लागली. ट्रक टेम्पो, जीप कार, वाहनांचा ताफा होता. नेता सुद्धा तितकाच मोठा होता. पक्ष कुठला ते महत्त्वाचा नाही. हल्ली मला सगळे सारखेच वाटतात. एकाच माळेचे शिरोमणी.
मोठमोठाले स्पीकर ध्वनी प्रदुषण करत होते. रस्ताभर फटाक्यांचा धूर वायू प्रदूषण करत होता. एकंदरीत शक्ती प्रदर्शन चालू होते.
"स्वत:चे ठेवायचं झाकून अन दुसर्याच बघायचं वाकून"ही म्हण आपल्याला माहित आहे. यात आपल्या त्रुटी/चुका/विसंगती झाकून ठेवायच्या व दुसर्याच्या चुका/ त्रुटी/विसंगती याबद्दलच फक्त बोलायच असाही एक अर्थ अभिप्रेत आहे.
भारतातील खास करून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थिती गढूळलेल्या अवस्थेत आहे, राजकीय, सामाजिक क्षितिजावर घडणाऱ्या अनेक विस्मयकारक घटनांचा सामान्य लोकांवर आणि लोकशाही वर परिणाम होतोच पण त्याचा जास्त परिणाम हा कार्यकर्त्यांवर होतोय. कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था निर्माण होते, खरं सांगायचं म्हणजे कार्यकर्त्यांचे अक्षरशः बारा वाजलेत. पक्ष/संघटना निष्ठा की, विचार/समाज निष्ठा? याबद्दल त्याचा सामाजिक व राजकीय कामातील उत्साह दिवसेंदिवस क्षीण होतोय. आणि जर त्याच्यातील कार्यकर्ता मरण पावला तर हे कोणत्याही पक्षाला कधीच परवडणारं नाही.
शेवटी बहुप्रतिक्षित पक्षफूट व अप साहेबांचे नवीन सरकारात जोरदार एंट्री! (मी शेवट्पर्यंत ह्याच पक्षात राहणार हेही सिद्ध करायचे आहे!)
भाकरी स्वतःहून फिरली काय?
शप साहेबांन्ना अजून किती काम करावे लागणार?
पुन्हा न्यायालय आहे का?
श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.
महाराष्ट्राच्या कुरूक्षेत्रावर
पुन्हा राजकारण घडत आहे.
आणखी एक धुर्तराष्ट्र आपल्याच पुतण्याला डावलण्यासाठी धडपडत आहे.
( ही वाक्ये चारोळीचे अनभिषीक्त सम्राट श्री रामदास फुटाणे महोदयांना समर्पित )
ही चारोळी माननीय रामदास फुटाणे यांना का समर्पित केली याचे कारण.
कै देविलाल आपल्या मुलाला मुख्यमंत्री ( ओमप्रकाश चौटाला याला ) बनविण्यासाठी धडपडत होते. या दरम्यान झालेल्या निवडणूक मधे हत्या झाल्या या पार्श्वभूमीवर श्री रामदास फुटाणे यांची चारोळी होतो.
महाभारताच्या कुरूक्षेत्रावर आणखी
एक महाभारत घडत आहे.
(सर्वात आधी एक नवीन आभासी खातं मायबोलीवर तयार केलं. उगीचच सध्या सत्तेत असलेल्या विरुद्ध दोन शब्द इकडे तिकडे व्हायचे आणि एक दोन महिने तुरुंगाची हवा खायला लागायची. रिस्क नको.)
मागील काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. प्रसार माध्यमातून दिवसभर मनोरंजनही चालू आहे. अगदी उत्कंठा शिगेला पोहोचते आणि त्या दिवशीचा एपिसोड संपतो. परत दुसऱ्या दिवशी तेच चक्र.
हा तिढा सुटणार तरी कसा? हा "बाहुबलीने कटप्पा को क्यो मारा" या प्रश्नासारखाच गहन प्रश्न तमाम मराठी बंधू भगिनींना पडला नसेल तरच नवल.
मायबोली वर राजकीय आणि सामाजिक विषयांवर उत्साहाने चर्चा होतात. त्या कधीकधी खूप माहितीपूर्ण असतात, आणि कधीकधी गोलाकार असतात, त्यांना ना सुरुवात असते ना अंत.
मला अशा चर्चांमध्यें सहभागी असलेल्या सदस्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, कधी मायबोली वरील चर्चेमुळे एखाद्या विषयावर मतपरिवर्तन झाले आहे का ?
जर मत बदलले असल्यास कोणत्या विषयावर बदलले आणि कशामुळे बदलले ?-