कथा
सत्यमेवा जयते
गेल्या महिन्यात (जुलै 2024) नारळीकरांच्या वाढदिवसानिमित्त मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा वाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात माझी एक कथा वाचण्यासाठी मला आमंत्रित केले होते. तेव्हा वाचलेल्या सत्यमेवा जयते या कथेची ही युट्युब लिंक. ही कथा एका टोप नावाने ऐसी अक्षरेमध्ये 2020 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ही कथा माझ्या घोस्ट रायटर आणि इतर विज्ञान कथा या समकालीन प्रकाशनाच्या पुस्तकात नाही.
'नोव्हेंबर म्हणजे स्थलांतर' - मूळ लेखक - हाँसदा सौभेन्द्र शेखर, अनुवाद - सुजाता देशमुख
हाँसदा सौभेन्द्र शेखर हा संथाळी आदिवासी तरुण लेखक आणि झारखंडच्या पाकुर इथल्या सरकारी इस्पितळात काम करणारा डॉक्टर. त्याच्या ‘द मिस्टिरियस एलमेन्ट ऑफ् रूपी बास्की’ या पुस्तकाला २०१५ चा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ मिळाला आहे. हाँसदाच्या ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या कथासंग्रहातल्या एका कथेमुळे ‘संथाळी स्त्रियांचं विकृत चित्रण होतं आहे’ अशा आरोपावरून त्याला झारखंड राज्य सरकारनं कोणत्याही खुलाशाविना तात्पुरतं बडतर्फ केलं आहे. त्याच्या पुस्तकावरही अर्थातच बंदी घातली आहे.
'लाल चिखल' - श्री. भास्कर चंदनशिव
महानगराबाहेरच्या वास्तव जगाशी नातं न तोडलेल्यांना रस्त्याकाठी फेकून दिलेली गाडाभर कोथिंबीर किंवा वांग्यांचा लगदा नवा नाही. मेहनतीनं पिकवलेल्या भाजीला भाव न मिळाल्यानं ती फेकून देणारा शेतकरी मग अनेकांच्या लेखी माजोरडा ठरतो.
'ग्रामीण जीवनाचे बखरकार' अशी ख्याती असलेल्या प्रा. भास्कर चंदनशिव यांची 'लाल चिखल' ही कथा -
मीच मला पाहतो
आजही अॉफिसमधून निघायला उशीरच झाला. आता घरी गेल्यावर आधी अोजसची आणि मग नलिनीची समजूत काढायला लागणार. एरवी नलिनी बायको म्हणून खूपच समजूतदार आहे पण अोजसच्या स्कूल प्रॉजेक्टमध्ये घरी गेल्यावर मदत करायचं मीच कबूल करुन बसलो होतो आणि अोजसच्या बाबतीत माझ्या हातून असं काही झालं की मग मात्र नलिनीचा समजूतदारपणा कुठे नाहीसा होतो कोणास ठाऊक! मग ती ‘अनंतकाळची माता’ असल्याचं सिद्धच करते. याच विचारांच्या नादात मी गाडी चालवत होतो. खरं तर जगजित सिंगच्या गजल ऐकत गाडी चालवली की घरी पोहोचेपर्यंत अॉफिसचा ताण मागे पडतो. पण आज का कोणास ठाऊक, तिकडे लक्ष नव्हतं. घराजवळ पोहोचलो आणि गराज उघडलं तर माझी गाडी आत!
कृष्णलीला
कृष्णलीला
लेखक: आशिष महाबळ, अदिती जोशी
रेखाटने: सोनाली फडके
मराठी विज्ञान परिषदेच्या २०१३ दिवाळी अंकात प्रकाशीत
"अहो हे पाहिलत का?", किंचित घाबरलेल्या स्वरात सौ. म्हणाल्या.
"काय?", टाईम्सच्या अंकाआडूनच शब्दकोड्यामध्ये व्यत्यय आणला जात आहे हे जाणवेल अशा सूरात श्री उत्तरले.
"अहो, पृथ्वी नष्ट होणार आहे म्हणे".
"आता निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट नष्ट होतेच", श्रीं चा अजूनच त्रासिक आवाज.
"तसे नाही हो. आपल्या हयातीतच तो दिवस येणार असे हे म्हणताहेत", अजून घाबरा आवाज.
"म्हणू दे. २०१२ मध्ये झाली का नष्ट पृथ्वी? नाही ना? आताही नाही होणार".
बबूची गोष्ट
बबू त्या दिवशी खूप आनंदात होती. तिचे आजोबा तिला छ्बूच्या घरी घेऊन जाणार होते. छबू आणि बबूची एकदम घट्ट मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. पण बबू आणि छबू पहिलीतून दुसरीत जाणार होत्या त्या वर्षी छबूची आई छबूला घेऊन तिच्या मामाच्या घरी राहायला गेली. छबू मग नव्या शाळेत जायला लागली. छबू गेली म्हणून बबूला खूप वाईट वाटलं. एकदा जिन्याखाली बसून एकटीने रडताना तिला आजोबांनी बघितलं. त्या दिवशी पासून ते जेव्हा नदीपलीकडल्या छबूच्या मामाच्या गावी जात तेव्हा बबूला सोबत घेऊन जात. तिच्या शाळेला सुट्टी असेल तरच. पण ते नेहमीच बबूला शाळा असेल अशा दिवशी जात आणि तिला त्यांच्या बरोबर जायला मिळत नसे.
मी, अन्या आणि लग्न वगैरे... - संपूर्ण
ही कथा जुन्या मायबोलीतलीच आहे. बर्याच काळाने धूळ झटकून, जरा ठाकठीक करून नवीन मायबोलीवर आणत आहे.
**************************
तो घरात ज्या पद्धतीने आला ते पाहूनच मला जाणवलं स्वारी अस्वस्थ आहे आज. पायातले फ्लोटर्स त्याने भर्रकन काढून कोपर्यात भिरकावले. डोक्यावरची कॅप काढून टीपॉयवर फेकली आणि खिडकीजवळच्या दिवाणावर धप्पकन येऊन बसत त्याने फर्मावलं, "देवू, पाणी आण गार." आणि लगेच माझ्याकडे चमकून पाहात "ओह, तू ऑलरेडी पाणी घेऊनच आलीयेस की!" म्हणून पाण्याची बाटली हिसकावून घेत घटाघटा पाणी प्यायला.
"कुठे उनाडक्या करून येतोयस?" मी त्याच्याशेजारी बसत म्हणाले.
सूड (संपूर्ण)
सुमतीबाई शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. आतल्या खोलीतून सुधीरराव बडबडतच होते. त्यांचा आवाजदेखील सुमतीबाईना आत्ता नकोसा झाला होता. तिरीमिरीत त्यांनी बाजूचा रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्हीवरती कुठलातरी साऊथचा मारधाडीचा सिनेमा चालू होता. त्याचा आवाज त्यांनी इतका वाढवत नेला की अख्ख्या फ्लॅटमधे तो धडाम धडाम आवाज दणदणायला लागला. बेडरूमममधून येणारा सुधीररावांचा आवाज ऐकू येईना झाला तरी त्या तशाच तिथे बसून राहिल्या.
निश्चल
सकाळचे साडेसहा वाजले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सूर्यनारायण नुकताच उगवला होता. खरंतर मला अजिबात उठायची इच्छा नव्हती. पण आता ड्युटीची वेळ झाली होती. सगळं आवरून मी रूमच्या बाहेर आले. हलकंसं धुकं उन्हाबरोबर लपंडाव खेळत होतं. त्यातच दवबिंदू हलकेच चमकत होते. दूरवरचा धबधबा मोत्यासारखा दिसत होता. माझ्या रूमबाहेरची दरी हिरवी शाल ओढून अजून साखरझोपेत होती. मी मात्र उठून कामाला लागले होते. अख्ख्या रीझॉर्टमधे इतक्या लवकर कुणीच उठले नसेल. इथे येणारे बहुतेक हनीमून कपल्सच. ते कशाला इतक्या पहाटे उठतील? मी आणि अभि जेव्हा गोव्याला गेलो होतो, तेव्हा काय केलं होतं? अभिच्या आठवणीसरशी अंगावर काटा आला.