प्रकरण दुसरे
रक्तमासांचा पोशाख
डिजिटल स्वर्गाचा त्याग करणे ही केवळ एक तांत्रिक निवड नव्हती; ती एका अनंत शांततेतून स्वतःला अशांततेच्या खाईत लोटून देण्यासारखी कृती होती. अथर्व आणि संवेद्या यांनी जेव्हा 'री-कॉन्स्टिट्युशन' (पुनर्गठन) कक्षात प्रवेश केला, तेव्हा तिथली हवाच जणू काहीतरी वेगळं सांगू पाहत होती. तिथे मानवी शरीराचे साचे उभे होते, हाडे, स्नायू आणि मज्जासंस्थेचे ते केवळ जड सांगाडे होते.
प्रस्तावना
एक लाख वर्षांचा काळ! आकड्यांच्या खेळात हा काळ सुखावह वाटत असला, तरी कल्पनेच्या पलीकडे गेलेला हा एक अथांग आणि निर्जळी प्रवास आहे. आज जेव्हा मी हे शब्दांकित करायला घेतोय, तेव्हा सभोवताली ना निसर्ग उरलाय, ना निसर्गाचं कौतुक करणारी ती रक्तामांसाची माणसं. सगळं कसं... स्वच्छ, नितळ आणि तितकंच 'भयानक' शांत!
कालच The Three-Body Problem हे पुस्तक / कादंबरी वाचून संपवली आणि लिहिल्यावाचून राहवेना. कादंबरी बरीच मोठी आहे आणि तिचा आवाका, तपशील आणि विषय तर फारच भव्य आणि सखोल आहे. मी माझ्या मगदुराप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमीजास्त झालं असेल तर समजून घ्यालच. तर .........
आजपर्यंत कित्येक लोकांनी "कालप्रवास" करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं. काहींनी प्रत्यक्षात कालप्रवास केल्याचा दावा केला. पण संशोधनांती, त्यांच्या दाव्यात खरेपणा आढळून आला नाही.
नुकताच एक जुना व्हिडिओ बघण्यात आला. त्यानुसार "माईक मार्कम" नामक इसमाने प्रत्यक्षात कालप्रवास केला. त्याच्या ह्या दाव्याला वैज्ञानिकांनी अजूनतरी खोडून काढलेले नाही.
सूर्योदय
उत्परिवर्तनशील करोना व्हायरसचा हल्ला नुकताच परतवण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजे “ सी/२०१९क्यू४ ” धुमकेतू वर जाण्यास भाग पाडले गेले होते. खंडणीची त्यांची मागणी नाकारली गेली. सैतानाने त्यांना पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी उचकवले होते. माणसे हा नेत्रदीपक पराक्रम अर्थातच क्लिंगनच्या सक्रिय मदतीने साध्य करू शकले. नाहीतर मागच्या वेळी म्हणजे २०२० साली लाखो लोकांचा बळी देऊन आणि १० टन सोन्याची खंडणी घेऊन त्यांची बोळवण करावी लागली होती. निदान ह्यावेळी आम्ही सैतानावर मात करण्यात यशस्वी झालो होतो.
आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं.
प्रा. पार्थसारथी त्यांच्या खोलीमध्ये चिंताक्रांत मुद्रेने बसले होते. रात्रीचे दहा वाजत आले तरी आज त्यांना घरी जावेसे वाटत नव्हते. त्यांचा प्रयोगशाळा मदतनीस सुहास गेले दोन दिवस आजारी होता आणि रुग्णालयात भरती होता. रोगाचे निदान काही होत नव्हते. तशी लक्षणे साधीच होती. सुरुवातीस खोकला व छातीत भरलेला कफ म्हणून त्याला रुग्णालयात आणला. दोन दिवसांपासून तापही होताच. घरच्या डॉक्टरांचे औषध झाले दोन-तीन दिवस आणि मग आराम पडेना म्हणून भरती केला. लगेच त्याला एक प्रतिजैविकांचा डोसही सुरू केला. पण प्रकृतीस उतार पडायची काही चिन्हे नव्हती. डॉक्टरांनाही कोड्यात पडल्यासारखे झाले होते.