मी जेव्हा नवा नवा कार्पोरेट जगात रूजू झालो त्यावेळी एक मौलिक अनुभव आला. तो म्हणजे वर्ष पूर्ण झाले आणि वर्षभराच्या कामगिरीचे मुल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ती प्रक्रिया अशी होती:
.
१) आपल्या कामगिरीचे अवलोकन करून स्वतःच्या कामगिरीचे आढावा आणि मुल्यमापन कंपनीच्या अंकीय नोंदवहीत नोंदवायचे
२) मॅनेजर त्यांचा अभिप्रायाची नोंद करायचे
३) तुमच्या वर्षकार्याचा आढावा आणि मुल्यांकनाचे एक गुणोत्तर तयार होऊन त्यानुसार गुणांकनाची नोंद तुमच्या नावाने कायमच्या दस्तावेजांमधे जोडली जायची.
.
मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.
सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? ही कल्पना खरी का? जंगलात खरोखरच कोणी राजा असतो का?
.
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? परंपरेने एखादे गृहितक चालत आलेले असेल तर ते तसेच स्वीकारायचे की त्यावर स्वतंत्रपणे विचार करायचा. आपण असे समजू शकतो की जे मागच्या पिढ्यांनी सांगितले ते सगळे बरोबरच आहे आणि त्यामुळे त्याला तसेच ग्रहण करायचे आणि अवलंबत जायचे.
.
आपल्या मनात बरेच वेळा गॅसलाईटींग करणाऱ्या लोकांची एक साचेबद्ध प्रतिमा असते. अमूक अमूक खलनायकाच्या भूमिकेत असलेली व्यक्ती गॅसलाईटींग करते अशी काही उदाहरणे देखील मनात असतात. आपणही तसे करत असू याची आपल्याला कधी कल्पना येत नाही किंबहुना आपण तसे कधी करूच शकत नाही याची खात्री पण काही लोकांना वाटू शकते.
.
गॅसलाईटींग म्हणजे थोडक्यात समोरच्या व्यक्तीला वाटलेल्या भावना नाकारणे किंवा ती व्यक्ती जे म्हणतेय ते झालेलेच नाहीये असे समजून ते ठासून मांडणे कबूल करून घेणे.
.
काही साधारण संवाद पाहुया:
.
मित्रांमधला एक संवाद:
अग्निशमन कवायतीचा तुमच्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी मिळाला?
.
मी पर्सिस्टंट सिस्टिम्स च्या नागपुरातल्या नव्या इमारतीमधे माझ्या निर्धारित डेस्कवर काम करत असताना २०१२ मधे म्हणजे वयाच्या सुमारे चाळिसाव्या वर्षी मला हा अनुभव पहिल्यांदा मिळाला होता. (संभाव्य घटना नियोजनाची एक संकल्पना, अग्निशमन कवायत जी जगण्याच्या अनेक पातळ्यांवर मला मदत करतेय तिची ओळख आयुष्याच्या इतक्या पुढच्या पातळीवर मिळावी ही खंत आहे.)
.
संसदेत जर एका विशिष्ठ वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती सभासद असेल तर अश्या संसदेच्या कामकाजात त्या वर्गाचे बद्दल व्यक्त केली जाणारी भावना शब्द आणि निर्णय आपोआपच तपासले जातात आणि त्यांच्या हक्कांची पायमल्ली होणे टाळता येते. ही कल्पना मला पटते, याच कल्पनेला रोजच्या आयुष्यातल्या विचार प्रक्रियेसाठी अमलात आणण्यासाठी एक वैचारिक प्रयोग मला करावासा वाटतो.
.
रोजच्या आयुष्यात न लागणाऱ्या गोष्टी अभ्यासात का शिकायच्या?
.
या प्रश्नाचे एक मला पटणारे एक उत्तर वाचायला मिळाले, ते पुढे सांगतोय.
.
मला हा प्रश्न नेहमी पडायचा की उदाहरणार्थ लॉगॅरिदम, कॅलकुलस सारखे विषय अभ्यासात का शिकवले जातात. जर रोजच्या आयुष्यात जगतांना या गोष्टी लागणारच नाहीयेत तर हे शिकण्यासाठी वेळ का वाया घालवायचा? शिक्षण पद्धती अशी बदलायला नको का की ज्यात खरेच आवश्यक असतील तेच विषय आणि कौशल्ये शिकवले जातील. तसे केल्याने वेळ आणि ऊर्जा वाचणार नाही का?
.
॥१॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तिच्या सवयीचे रेल्वेस्थानक.. सवयीची गर्दी.. आणि रेल्वेची वाट पाहाणारे लोकं देखील रोजचीच..
रेल्वेला यायला वेळ असल्यामुळे तिने वेळ मारण्यासाठी गर्दीकडे सभोवार नजर फिरवली, तेव्हा तिला दिसला तो चेहरा.. आणि तिला दचकायला झालं. वेगवेगळे ठिगळं जोडून जसं एखादं कापड शिवलेलं असतं तसा शिवल्यासारखा होता त्याचा चेहरा.. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला क्षणभर भीतीच वाटली.. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली..
त्यालाही हे जाणवले बहुतेक..
विज्ञानाचे शोध लागण्या आधी आसपासच्या गोष्टींचा मानवाने जमेल तसा तार्किक अर्थ लावून ते काय आहे आणि कसे चालत असेल याचा अंदाज आणि ठोकताळा घेतला आणि त्यावेळेस जे तर्काला पटेल आणि उपलब्ध माहितीवरून अधिक बरोबर वाटेल अशी उत्तरे तयार केली.
.
बरेचदा ही उत्तरे ज्यांना सुचली त्यांना ती कशी सुचली सांगता आले नसेल तेव्हा ती मला स्फुरली, किंवा मला स्वप्नात दिसली, किंवा सरळ मला देवाने सांगितली असे सांगणे सर्वात सोपे असेल म्हणून तसे सांगितले गेले. काही ग्रंथांमध्ये देखील ते लिहिले गेले. तेच मग सिद्धांत्त म्हणून सांगतिले जाऊ लागले शिकवले जाऊ लागले असे आपल्याला दिसते.
.
स्वतःला उपयोगी पडेल असे काही निर्माण केलेले किंवा शोधून काढलेले, पद्धती तयार केलेले आणि त्याचा उपयोग होतो आहे हे अनुभवास आलेले असले की त्या निर्मिती च्या बाबतीत दोन विचार करता येतात. पहिला असा की अश्या निर्मितीला बौद्धिक संपदा म्हणून पेटंट मिळवता येऊ शकतात ज्यानंतर त्या संपदेचा कुणी वापर केला तरी तुम्हाला त्याचा मोबदला मिळत रहावा. दुसरे असे की ती निर्मिती जगाला तशीच मुक्तपणे उपलब्ध करून देता येऊ शकते, जे जनहिताचे एक धोरण म्हटता येईल, आणि सॉफ्टवेयर क्षेत्रात असे जेव्हा सुरू झाले त्याला मुक्तस्रोत निर्मिती म्हटले जाऊ लागले.
.