दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे,
“आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”.
खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो.
पाठलाग
पाठलाग व्यर्थचि झाला त्या कस्तुरीमृगा पाठी
अत्तरही दुर्लभ झाले अन् मृगजळही नाही हाती ।।
धावला सश्याच्या मागे आंधळा खुळा शिकारी
वेगात समय निसटला सोबत कुणी ना साथी ।
तेजाचा किरण पाहण्या धुंडाळली रात्र सारी
उदयाच्या उषःकाली ज्योतीस मिळेना वाती ।
सौख्याच्या लोभापोटी वेदना मनी दडविली
भाग्याची रेषही पुसली नैराश्य रिकाम्या माथी ।
मरण्याचे कोडे सुटले पण जिंदगी अपुरी पडली
मातीतुनीच उगवलो अन् व्हायचे अखेर माती ।।
- यःकश्चित
सोबत
सारा विखूरलेला आकांत सोबतीला
मारायला मनाला एकांत सोबतीला
गर्दीत आसवांच्या उठबैस आठवांची
चित्रास हार त्यांच्या मरणांत सोबतीला
रात्रीस मेघ आले तारांगणात माझ्या
येणार चांदण्यांचा परप्रांत सोबतीला
माझ्या रणांगणी त्या गाथा विदूषकांच्या
आधार हाच खोटा धादांत सोबतीला
वारी खुशाल देते आव्हान पोचण्याचे
त्या पालखीत आता विश्रांत सोबतीला
का गूढ हासतो मी पडलीच भ्रांत आहे
हास्यात ताण माझे ते शांत सोबतीला
लेखाचा विषय तसा कटू आहे. पण तरीही हिंमत करून लिहितेय.
माझ्या आसपासचे लोक / जवळचे नातेवाईक / काही सेलिब्रिटीज इत्यादी यांच्या मृत्यूने मला काही न काही साक्षात्कार झालेला आहे. काहीतरी आयुष्यभराचा धडा दिलेला आहे.
कदाचित तुमच्याही बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असा डोळे उघडण्याचा क्षण आला असेल. तर शक्य असेल आणि काही हरकत नसेल तर कृपया इथे शेअर करावे.
बंगाली भाषेतले लेखक ' ताराशंकर बंदोपाध्याय ' यांची कादंबरी 'आरोग्य निकेतन ' मधील नायक जिबोन मोशाय नाडी वैद्य आहे. तो रुग्णांची नाडी पाहून आजार सांगत असतो. त्याला नाडीमध्ये मृत्यूचा आवाज ऐकू येतो. आपल्या स्वत:च्या मृत्यूच्या आवाजाबद्दल बोलतांना तो म्हणतो, " मृत्यूने पायात पैंजणं घातली आहेत, सध्या ती शेताच्या
बांधावरुन हळू-हळू चालत येत आहे, हळू-हळू पैंजणांचा
आवाज मोठा होत चालला आहे..... आता अचानक पैं जणांचा आवाज कमी झालाय, ती (मृत्यु) माझ्या उशाजवळ येऊन थांबली तर नाही...? मृत्यु निशब्द आहे, कदाचित ती मला आपल्या मिठीत सामावून घेणार आहे असं वाटतंय...."
सहवास हवाय ,
मलाही आज तुझा.....
कधी होशील साथीदार ,
त्याचं एका क्षणासाठी तु माझा..
देतोस आलिंगण,
जेंव्हा केंव्हा तू कोणाला .....
करतोस बंधनमुक्त म्हणे ,
प्राक्तनातून सुखःदुखःला...
भेटतोस एकदाच,
तरिही होतोस इतका जवळचा.....
देऊन जातोस अनेकांना ,
नजराण्यात काळोख आक्रोशाचा .....
बघता बघता संपवतोस ,
जणू सगळ काही....
जळतात शब्द, विरतात भावना,
उरतो एकचं प्रश्न काय आहे आणि काय नाही?.....
जमीन मुकी झालीय
शुष्क फांद्यांवर दुःखी झालेली
पाखरे गप्प सगळं ऐकताय
रात्रीच्या नग्न शरीरावर
झोपेचे उलटे प्याले सांडताय
मेलेल्या मुडद्यांचा वास
फुलांच्या बगिच्यात पसरलाय
मृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधून
समुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरून
म्हतारी खिडकीतून ओरडतेय
तिला कुठला धर्म लगाम घालेल आता?
कोणत वरदान गळा घोटेल तिचा?
त्या म्हतारीला सांगा
तिचा रोल संपलाय
आता पडदा पडेल
नाटक संपल
पण
खिडकीबाहेर मृत्यू तसाच फिरतोय!
©प्रतिक सोमवंशी
रेंगाळतो आहे..
आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस
जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस
भाग - १
लिंगायत धर्मियांना मरणे पावणे किंवा लिंगैक्य होणे उत्सवासारखे आहे. तो का उत्सव आहे याचे वर्णन करताना बसवलिंग महाराज अभंगात म्हणतात,
मरणा भीणे भीती जीव।
आम्हा मरण्याचा उत्सव ।।१।।
कधी मरु कधी मरु।
कधी देहाते विसरू ।।२।।
हेचि आमचे चिंतन।
मागू सांबापासी दान ।।३।।
बसवलिंग म्हणे मरा।
ऐशा मरणे चुके फेरा ।।४।।
मृत्यू एक सखा
मनाच्या कोपऱ्यात
दडून असतो मृत्यू
काहीच वैर नसतं
तरी भासतो शत्रू
कधीच न पाहीलेला
काळपुरुष दिसतो
शेजारचे दार ठोठावले
तरी मी टरकतो
मीच वैर जपतो
इथे तिथे लपतो
नेहमी झिडकारले
तरी तो जीव लावतो
जगणं जरी छळतं
तरी कुठं कळतं
मन याच्या भयानं
दूर दूर पळतं
देहाचा खुळखुळा
होतो जेव्हा नादहीन
वाट बघत असतो
एक मित्र नवीन
आवाज न करता
येतो मज जवळ
आश्वासक हात
घालतो कवळ