कुठेतरी वाचलेले, आपल्या आयुष्याचा एक कालखंड आपल्या ईतक्या आवडीचा असतो की तो आपल्याला पुन्हा एकदा जगावासा वाटतो.
माझ्यासाठी तो माझ्या दक्षिण मुंबईतल्या चाळ संस्कृतीत गेलेल्या बालपणाचा होता.
पैसे फार नव्हते तेव्हा. पैश्याने सारे सुखेही विकत घेता येत नाहीत म्हणा. पण आहे त्या पैश्यात मोजके फटाके विकत घेता यायचे. आणि ते मात्र अफाट सुख द्यायचे.
सध्या आपले धर्मनिरपेक्ष सुप्रीम कोर्ट फार सक्रिय झाले आहे. जागोजागी फटाकेविक्रीवर बंदी आणली आहे. हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशात भारतभरात दिवाळी हा सण फटाके फोडून साजरा केला जात असल्याने जनमाणसांत तर्हेतर्हेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
विचारसरणी क्रमांक १ -
आदिम अवस्थेत समाज होता. पाण्याच्या नदीच्या आसपास छोट्या वस्त्या पाडे करून लोक राहत. दळणवळणाची/संवादाची काहीच साधने नव्हती. त्यामुळे लोक जवळजवळ एकाच ठिकाणी आयुष्य काढत (समाज म्हणजे एक मोठ्ठे "बिग बॉस" चे घरच होते जणू). स्वाभाविकपणे सोयरिकी सुद्धा आसपासच्या भागातच जमवत आणि लग्ने उरकून घेत असत. लग्न म्हणजे बंधन. एकदा ते झाले कि बस्स. त्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर मैत्री गप्पा म्हणजे सगळीकडे "ब्रेकिंग न्यूज" व्हायची. त्यातून भांडणे तेढ युद्धाचे प्रसंग कौटुंबिक शत्रुत्व सामाजिक कटुता इत्यादी निर्माण व्हायचे.
सगळ्या सणांमध्ये
दिवाळीचा वेगाळाच थाट
सर्वांना अंधारामध्ये
दाखवी प्रकाशाची वाट ...
...
प्रकाश पसरवते
पणतीची पेटलेली वात
या दिवा़ळसणामध्ये
करा दु:खावर मात ...
...
निराशेच्या "भुईचक्राला"
लावून टाका आग
गोल गोल फिरत स्वतःमध्ये
निराशा होईल खाक ...
...
"फुलबाजीच्या" झगमगत्या
आनंदी तुषारांद्वारे
फुलवा मनामनांत
आनंदाचे "झाड"...
...
सद्वीचारांची ठीणगी लावा
रॉकेटच्या मुखात
महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या
उंचच उंच आकाशात ...
...
सुतळी "बॉम्बसारखे"
छिन्नविछिन्न होवू द्या
मनातले नकारात्मक
कीडलेले भाग ...
...