"सूड"
भाग ३
"आजी, त्या रिकाम्या घरात खूप कंटाळा येतो हो. अन् बाहेर तरी कितीवेळ काढणार ?" सिद्धांत म्हणाला. त्यावर, म्हातारी किंचित हसली.
"त्या दिवशी रमेश आलेला ; पण घरात आला नाही. उलट मलाच सांगू लागला, की परत जा. इथं काहीतरी आहे, म्हणे."
"अस्सं."
"हो. तुम्हीच सांगा.. मी स्वतः एकटा त्या घरात राहतोय. मला काहीतरी दिसलं असतंच की."
"तेच तर. या रमेश सारख्या शिकल्या सवरलेल्या पोरानं अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा !" म्हातारी आश्चर्याने म्हणाली."
"तेच तर. बरं.. आजी, तुम्ही याल संध्याकाळी घरी ?"
तो तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. ती बावरली, गोंधळली. मात्र त्याच्या नजरेच्या प्रभावी पाशातून स्वतःला सोडवून घेणं तिला शक्य नव्हतं. त्यानं तिला वरून खालपर्यंत नखशिखांत न्याहाळलं. त्याच्या नजरेच्या अदृश्य स्पर्शाने तिच्या शरीरावर हलकेसे रोमांच उठले.
"किती सुंदर दिसतेस तू..." खालच्या, खर्जातल्या सुरात तो म्हणाला.
अचानक बसलेला धक्का ओसरल्यावर रोहितनं स्वतःला सावरलं. तोंड जरा पुढे नेऊन तो हलक्या आवाजात म्हणाला.
" अगं रूपाली तू ? एवढ्या रात्री, इथं ?"
"अरे दरवाजा तर उघड. थंडी वाजतेय." तीही खालच्या आवाजात म्हणाली.
तो चटकन मागे वळाला. मधल्या खोलीत येऊन त्याने दरवाजा उघडला. रूपाली दरवाजात उभी होती. हसऱ्या चेहऱ्याने.
"काय गं रूपाली ?"
"ये की बाहेर ?" हाताने इशारा करत ती म्हणाली.
"बाहेर ? आणि आता ?"
"चल रे..."
"अगं चल् काय, रात्र किती झाली आहे ! घरचे सगळे झोपलेत. आता कुठे बाहेर ?"
"माझ्यासोबत चल.."
"पण कुठे ?"
"चल तर खरा."
"माझ्या मनातली शंका खरी ठरली राजाभाऊ." श्री म्हणाला.
"कोणती शंका ? काय झालं श्री ?" चटकन राजाभाऊंनी विचारलं.
वॉकला गेलेला श्री लवकरच घरी परतला होता. शांतपणे आणि स्वतःच्याच तंद्रीत. जरासा चिंतितही दिसत होता तो. ही सहजी घडणारी गोष्टच नव्हती. तेव्हा सहाजिकच राजाभाऊंना आश्चर्य वाटलं. आणि आता हे त्याचे शब्द. काहीतरी गंभीर बाब असणार हे त्यांच्या लक्षात आलं.
"वाटेत रूपाली भेटली होती." एवढं सांगून श्री थांबला.
"हं...मग ?"
"तिचे डोळे, तिचं बोलणं, हसणं यावरून माझी खात्री झाली आहे..."
"कसली ? व्यवस्थित सांगा ना ?" राजाभाऊ अधीरतेने म्हणाले.
द्वेष : एक भय गूढकथा
अंतिम भाग
रक्तपिपासू
भाग ३
" पोरांनो ही काही खोटी, रचून सांगितलेली गोष्ट न्हाई बरं का ? एकदम खरीय. अगदी आमच्या गावातच घडलेली आहे." ठकूआजीने सांगायला सुरुवात केली.
" काय ? खरंच ?? " शिवानीने चकित होऊन विचारलं.
*आज पौर्णिमा होती. टिपूर चांदण्याची झिलई गावावर पसरलेली. आज बऱ्याच दिवसांनी मुलांना आजी कडे गोष्ट ऐकायला जायचं होतं. रस्त्यात एकत्र जमून ते आजीच्या घरापुढे असलेल्या पिंपळाच्या झाडाकडे निघाले. रस्त्यावर दिव्यांचे खांब होतेच. शिवाय आजूबाजूची घरं रोषणाईने झगमगलेली. त्यामुळे त्यांना कसलीही भीती नव्हती. पण काही अंतर चालून जातात न जातात तोच एकदम मागून आवाज आला -
" ए पोरांनो ? "