सुरक्षित चौकटीत
जगणारा माझा चेहरा
वेल फेड वेल पेड
दिसणारा माझा
तजेलदार चेहरा
मला आणि माझ्या
चौकटीतले बांधवांना
आवडतो
त्याला चौकट सुरक्षितता देते
संरक्षण देते
आणि मी शिकतो
चौकटीतले शिक्षण
करतो चौकटीतलं
लग्न ,...
पण चौकटीचा तुरुंग
मला जाणवत नाही
माझ्या कुटुंबाला
कारण मी
माझ्या कुटुंबासहित
चौकटीबाहेर
कधीच उडत नाही
माझे मराठीचे मास्तर
माझ्या मराठीच्या बाई
माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. कोरड्या तोंडानेच मी ओरडलो, " क्...क्... कोण आहे तिकडे......." पण माझा आवाज दोन फुटांपर्यंतही गेला नसावा. माझ्या खिशात अजूनही मेन फ्यूज होते. मोबाईलही जवळ नव्हता. अतिशय थंड शांततेत पावसाचा तेवढा लागलेला एकसूर भयाण शांततेचा भंग करीत होता. खिडक्या सगळ्याच बंद असल्याने बाहेरची हवा आत येत नव्हती. हॉलमधलं डायनिंग टेबलही बरंच दूर होतं. तिथे पाणी असलं तर......? आत पुन्हा कोणाच्यातरी फिरण्याची खसफस ऐकू आली. मला भीती वाटू लागली. मला स्वत:च्या नेभळटपणाचा राग आला. जरा बरं वाटलं. रागाने भितीवर नियंत्रण आणलं. तात्पुरत्या निर्माण झालेल्या बळावर मी भराभर पावले टाकली.
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
कितीशी असते अशी
एखाद्या विहिरीची जागा
एका वर्तुळा भोवती
सारा खोलीचा त्रागा
उन्मादत असते पाणी
खोल खोल डोहात
काढणारा मात्र असतो
आपल्याच उंचीच्या ओघात
मस्त सिमेंट काँक्रीटवर
हात जखडून ठेवतो
मान अर्धी खोलात
विस्कटणारे प्रतिबिंब बघतो
एवढ्या पाषाणी दगडात
ओलावा असेल तरी कसा
पडणारी एक एक भेग
जसा ओलावा देईल तसा
इतके अंदाज सारे
वरूनच कसे बांधायचे
स्पर्शविना इतके सारे
असेच कसे बोलायचे
उगा तुझ्याशी भांडतो मी
वेदना तुझ्या मांडतो मी
**
लपवू नकोस आसवांना
चांदणे बघ सांडतो मी
**
अबोल तू होवू नकोस
शब्दांस कसा तांडतो मी
**
केस कर मोकळे तूझे
मोगरा कसा माळतो मी
**
होवू नको निराश तू
वंचना तुझ्या कांडतो मी
**
कोण होतो काल मी अन् कोण आहे आज मी?
मी, मला अन् माझ्यामधे गुंतलो माझाच मी.
कधी होतो कुणाच्या जीवनाचा भाग मी,
कधी होतो कुणाच्या आसवांचा थेंब मी.
कधी होतो कुणाची पेटणारी चूल मी,
कधी होतो कुणाच्या भाकरीचा घास मी.
पाऊसवेड्या या मृदेचा बहरणारा गंध मी,
कधी होतो मृदेला भिजवणारा पाऊस मी.
काल होतो हा जसा मी, आज कोठे आहे असा मी?
'मी'च जाळून 'मी'पणाला, उरलो आता राखेत मी.
----------मयुरेश परांजपे-----------
तुझ्या माझ्यात काय उरले
'मी' पणा सोडून सारेच विरले
माझेच खरे करता करता
आपलेपण कधीच हरले
घेतल्या होत्या ज्या आणाभाका
शब्द ते मंत्रातच दडले
सप्तपदीच्या पावलांचे
रक्तबंबाळ ठसेच उरले
सोबतीचे क्षण आपुले
आठवणीत एकाकी पडले
दुरावलेले मन हे आता
मार्ग वेगळा शोधून गेले
हरवले नाते साताजन्मचे
बंध प्रेमाचे तुटून गेले
अहंपणाच्या अहंकाराने
शापित जीवन मात्र उरले
- प्राजक्ता
निघालो होतो जग जिंकाया
पण स्वप्न ते अधूरेच राहिले होते
दावेल वाट विजयाची असे
सारथी तरी कोठे राहिले होते
दांभिकतेने भरलेल्या जगाने
अस्तित्वच माझे पुसले होते
विनवीत होतो ज्या दगडाला त्यात
देवत्व तरी कोठे उरले होते
ऊन सावलीच्या खेळात या
डाव सारे निसटत होते
जिंकाया साथ देणारे
हात तरी कोठे उरले होते
भूतकाळातील जखमांचे
व्रण काही जात नव्हते
वेदना शमतील असे
मलम तरी कोठे उरले होते
मायेने गोंजारणारे
स्वर निःशब्द झाले होते
जीवन मैफिल रंगवणारे
सूर निरागस कोठे राहिले होते
मज बागेत फिरता फिरता,
दिसली फळी जखमी, केविलवाणी.
ती तशीच कणखर होती,
जरी दोन ठिकाणी तुटलेली.
ती फळी मला म्हणाली,
मी थकून गेले राजा,
या टोळ्यांना देऊन थारा.
आज हीच टाळकी माझी,
गंमत पाहून गेली.
तो बाक बघ बाजूचा,
तो माझा प्राणसखा अन् साथी.
मी जी जी भोगली दु:खे,
ती त्याच्याही वाट्याला आली.
या बाकाहून प्रेमळ दुसरा,
मी कुणीच पाहीला नाही.
मी तुटून पडल्यानंतर त्याने,
दुसरी फळी शोधली नाही.
----------मयुरेश परांजपे---------