नैसर्गिक शेती

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ४

Submitted by साधना on 25 April, 2024 - 09:51

मागचा भाग : https://www.maayboli.com/node/84992

गावी आल्यावर मी लगेच शेतात धाव घेतली. आधी उस पाहिला. काही ठिकाणी ऊसरोपे मरुन गेली होती पण त्या गॅप पडलेल्या जागी नविन ऊसरोपे लावली गेली नव्हती. जवळपास हजारभर उसरोपे तरी ऊरलेली जी मी जाताना सावलीत ठेवली होती. त्यांना १५ दिवस पाणी मारले नव्हते त्यामुळे ती सगळी रोपे सुकून गेली होती. आता ती लावता येणे शक्य नव्हते.

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ३

Submitted by साधना on 17 April, 2024 - 13:58

मागचा भागः https://www.maayboli.com/node/84965

शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. गावठाण वाडीतल्या म्हणजे आमच्याच वाडीतल्या बायका सगळ्या मावशीच्या मैत्रिणी. केवळ मावशीमुळे त्या माझ्या शेतावर कामाला यायला तयार झाल्या. या बायका नियमीत मजुरीवर जाणार्‍या नव्हत्या. गावी वनखात्याची नर्सरी आहे, त्यात अधुन मधुन कामाला जाणार्‍या या बायका. त्यांना शेतातल्या कामाचा तितकासा अनुभव नव्हता. पण तरीही त्या प्रेमाने यायच्या. अर्थात मी मजुरी देत होते.

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग २

Submitted by साधना on 11 April, 2024 - 07:51

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास भाग १

Submitted by साधना on 9 April, 2024 - 08:45

जीवनज्योती कृषी डायरी - भाग ५

Submitted by अनया on 17 November, 2023 - 07:46
नैसर्गिक शेती,जीवनज्योती कृषी उद्योग,शेती

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३

आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.

जीवनज्योती कृषी डायरी भाग-०४ : आमची माती, आमची शेती!

Submitted by अनया on 23 May, 2021 - 06:44

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंक बघा
जीवनज्योती कृषी डायरी भाग-३

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-३

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:52

एकेकाळी शेतकऱ्याच्या गरजा त्याच्या परिसरातच भागायच्या. बियाणं , अवजारं , खत आणि बाजारपेठही. आलेल्या पिकातील सर्वोत्तम भाग पुढच्या मोसमाच्या बियाण्यासाठी राखून ठेवला जायचा. शेताच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था मोट, बैल ह्यांच्या साहाय्याने होत असे. बैलाचं खाणं म्हणजे इंधन शेतावर तयार होत असे आणि बैलांचं शेण खत म्हणून वापरलं जायचं. मोटेची दुरुस्ती गावातला कारागीर करू शकत होता. एकूण काय की पंचक्रोशीच्या बाहेर जावं लागेल, असं काही नसायचं. पर्यावरणपूरक म्हणता येईल अशी व्यवस्था होती.

विषय: 

जीवनज्योती कृषी उद्योग डायरी-२

Submitted by अनया on 14 October, 2020 - 03:26

प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘पहाट झाली, भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडी’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.

विषय: 

जीवनज्योती कृषी उद्योग

Submitted by अनया on 26 August, 2020 - 09:26

जीवनज्योती कृषी उद्योग

IMG_20200622_103856936[1].jpg

पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.

[३] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : ’विपुलाच सृष्टी’

Submitted by दामोदरसुत on 6 July, 2012 - 04:47

सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! :[ब्लॉगचे नाव असते तसे]

’विपुलाच सृष्टी’

"प्रयोग परिवार साधतोय द्राक्षशेतीतून प्रगती:

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नैसर्गिक शेती