मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
पुस्तकं
पुस्तकयोग-२
तर बऱ्याचदा होतं असं की वाचता वाचता त्यातूनच आणखी काही पुस्तकांचा माग लागत जातो.. किंवा एखाद्या लेखकाचं एखादं गचांडी पकडणारं पुस्तक वाचता वाचता डोळे
खवळतात.. भेळ खातेवेळी तोंड खवळतं आणि अजूनच खा खा सुटते ह्याची तुम्हाला थोडीफार कल्पना असेलच, तसंच हे..!
आता ह्यावर लगेच 'पुस्तकांना भेळेच्या मापात कसं काय तोलू शकता तुम्ही? ह्याला काय अर्थ है !' वगैरे म्हणत
कपाळावर आठ्या उत्पन्न व्हायच्या आधीच हे स्पष्ट करतो की मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल ना? मग ठीक आहे की..
काय मिळतं वाचून?
'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील की
ज्यामुळे मला पुस्तकांशिवाय राहणं जमतच नाही...
म्हणजे 'मी का वाचतो ?' वगैरे
तर..
वाचन ही एकच गोष्ट अशी आहे की मी ज्यात इंटरेस्टेड आहे, म्हणून वाचतो.
पुस्तकांशिवाय मला फार पोरकं पोरकं वाटतं, म्हणून वाचतो.
मला सतत नवनवीन लेखक / लेखिकांच्या जबरदस्त प्रेमात पडायची खोड आहे म्हणून वाचतो.
एखाद्या गोष्टीबद्दल मला फारच थोडं माहिती आहे, असं मला स्वत:लाच आतून वाटावं म्हणून वाचतो.
ठेहराव..
पुस्तकपरिचय : लीळा पुस्तकांच्या (लेखक : नीतीन रिंढे)
पुस्तकांच्या दुकानात जायचं, बराच वेळ निवांत पुस्तकं चाळायची, नवनवीन लेखक, पुस्तकं माहित करून घ्यायची, हा माझा एक लाडका विरंगुळा. अशा प्रत्येक वेळी पुस्तकखरेदी होतेच असं नाही; किंवा पुस्तकखरेदी करायची असेल तेव्हाच पुस्तकांच्या दुकानात जावं, अन्यथा नाही, असंही मला वाटत नाही.
नुकतंच ‘लीळा पुस्तकांच्या’ (लेखक नीतीन रिंढे) हे books on books प्रकारातलं पुस्तक वाचलं, तेव्हा असाच पुस्तकांच्या दुकानात रमल्याचा feel आला.
२०१५ मधे प्रकाशित झालेली वाचनिय पुस्तके
आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..
आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..
आतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.
का कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.
वाचनाची आवड अशीही!!!!!!!!!!!
स्कॅन केलेली जुनी मराठी पुस्तके
मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल. बाकी इतर भाषेतील पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकं सर्वाधिक आहेत.