महाभारत

’नायिका महाभारताच्या’ व्याख्यानमाला

Submitted by वावे on 10 May, 2021 - 12:43

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या ’नायिका महाभारताच्या’ नावाच्या एका व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याची संधी मला नुकतीच मिळाली. ही व्याख्यानमाला अर्थातच ऑनलाईन होती. डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं या मालेत होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी अशा प्रकारे सत्कारणी लागल्या. या व्याख्यानमालेविषयी थोडं लिहावंसं वाटलं.

शब्दखुणा: 

लॉक डाऊन मध्ये जनतेकरिता पुनःप्रसारित करण्यात येणाऱ्या जुन्या गाजलेल्या मालिका - रामायण व महाभारत व चाणक्य

Submitted by प्राचीन on 28 March, 2020 - 01:10

आज सकाळी रामानंद सागर यांची निर्मिती असलेली रामायण मालिका डी डी नॅशनल वर पाहिली. तशी ती नेटवर उपलब्ध आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणावर लोकांना बघायला मिळेल व टीव्हीवर अधिक चांगलं वाटतं बघताना. सुखद गोष्ट म्हणजे जाहिराती नव्हत्या. शिवाय पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे, तेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडे दूरचित्रवाणी संच नसल्याने त्यांच्यापैकी काहीजण आमच्याकडे येत मालिका बघायला. दर रविवारी सकाळी प्रसारण होई. आमच्याकडे रंगीत संच नसल्याने माझ्या मनात अजूनही कृष्णधवल रामायणाचीच स्मृती आहे. आता कदाचित बदल होईल त्यामधे.

गीता जयंती

Submitted by मी मधुरा on 8 December, 2019 - 06:33

गीता जयंती निमित्त आगामी युगांतर पुस्तकातला एक भाग तुम्हा सर्वांकरता......

युगांतर-आरंभ अंताचा!

कुणाच्यातरी आगमनाची चाहूल लागली आणि भीष्मांनी डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहिले. निळा शेला आणि मोरमुगुटातले मोरपीस कृष्णाला अगदीच शोभून दिसत होते. तो भीष्मांजवळ आला तेव्हा त्याच्या रुपाचं संमोहन तिथल्या वाऱ्यावरही घडलं असावं. कुठल्याशा धुंदीत तो चक्राकार वाहू लागला.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४५

Submitted by मी मधुरा on 20 November, 2019 - 07:49

अर्जुनने लांबूनच एकदा वरती फिरणाऱ्या मत्स्याकडे नजर टाकली आणि पाण्याच्या पात्राजवळ आला. धनुष्य-बाण घेऊन गुडघ्यावर बसला. प्रतिबिंबाला न्याहाळू लागला. त्याने प्रत्यंचेवर बाण ताणला. मत्स्यावर.... मत्स्याच्या डोळ्यांवर त्याने चित्त एकाग्र केले; आणि आता त्याला मत्स्याचा डोळा सोडून बाकी काहीही दिसत नव्हते!
त्या वर फिरणाऱ्या खोट्या मत्स्याला खोटं अंधत्व बहाल करत अर्जुनाच्या हातून सुटलेल्या बाणाने पण पुर्ण करत नयनभेद अचूकपणे पार पाडला होता.
"म्हणजे? अनुज? लाक्षागृहातून अर्जुन खरचं वाचला?" बलरामाने अर्जुनाकडे पाहात विचारले.
"मी कधी तुमच्याशी असत्य बोलतो का दाऊ?"

विषय: 

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४३

Submitted by मी मधुरा on 12 October, 2019 - 05:25

फुलांच्या, सोन्याच्या माळांनी भरलेल्या चहूबाजू आणि मखमली गालिचे टाकलेले भव्य सभागृह! अत्यंत सुंदर कलाकुसरीचे सुशोभीकरण त्याला शोभून दिसत होते. मध्यभागी एक सुंदर गोलाकार पात्र होते.... नितळ पाण्याचे! कडेच्या तबकात विशाल आणि सुबक धनुष्य काही बाणांसोबत विराजमान होतं.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४२

Submitted by मी मधुरा on 10 October, 2019 - 02:13

"भीम, तुझ्या बंधुंना सांग की बाहेरून लाकडे आणू नका सध्यातरी. तू काल आणलेली चार झाडे अजून पडली आहेत पडवीत. ती पुरतील अनेक दिवस."

भीम ओसरीवर बसला होता. त्याच्या हातातल्या तृणपात्याकडे नजर लावून एकाग्रपणे बघत होता. बहुदा कुंतीचे शब्दही त्याच्या कानापर्यंत पोचले नसावेत. त्याची तंद्री भंग करायला हे पुरेसे नसावे.

कुंती मात्र दुपारच्या भोजनाची तयारी करण्यात व्यस्त होती. पुत्रांनी धान्य आणले की ते शिजवण्याकरता आणि अन्न स्वादिष्ट बनवण्याकरता बाकीची तयारी असायला हवी, म्हणून तिची लगबग सुरु होती आणि शक्तीचे काम म्हणल्यावर भीम शिवाय पान हलत नसे. तिने पुन्हा भीमला हाक मारली.

याज्ञसेनी

Submitted by मी मधुरा on 6 October, 2019 - 11:15

ज्ञात आहे याज्ञसेनी? दुर्जनांची ती सभा?
दास होत्या सोंगट्याही, ना कुठे न्याया मुभा!

फास बनला द्यूत जेव्हा आणि फासे नाचले,
संपला पुरुषार्थ तेव्हा हात वस्त्रा लागले

ज्येष्ठ ते अन् श्रेष्ठ जे, हे धर्म पंथी मूक का?
भीष्म येथे, द्रोण येथे,का तरी शोकांतिका?

अंध म्हणूनी काय झाले ? ऐक राजा ही व्यथा
वर्ज कर या मूढ लोका, रोख काळाच्या रथा!

कोरड्या चेहऱ्यावरी ना रेष, ना संतप्तता,
कौरवांच्या या कृतीला सहमती जणू दावता?

काय झाले धर्मराजा? काय झाले अर्जुना?
आठवा तुमच्या हितार्थ साहिली मी वल्गना!

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४१

Submitted by मी मधुरा on 28 September, 2019 - 00:32

युगांतर- आरंभ अंताचा
भाग ४१

"माताश्री, तुम्ही भ्राताश्रींना सांगून ठेवा, सगळी कडे शक्ती दाखवून काम करायची नाहीत म्हणून. पुन्हा सगळं नव्याने उभारावे लागते नविन ठिकाणी स्थलांतर करायचे म्हणले की."

"माताश्री, अर्जुनाला सांगा की लाकडं गोळा करण्याचे काम त्याने स्वतःच करावे. मला मदत मागितली तर मी माझ्या पद्धतीनेच काम करणार."

"पण भ्राताश्री, म्हणून अख्ख झाड उचलून आणायचं? आजूबाजूचे नगरवासी 'आ' वासून बघत होते."

"आणि जसं काय तू कधी नेम धरून फळं पाडतच नाहीस. तुझा अचूक नेम पाहून कोणालाच कळणार नाही आपल्याबद्दल असं वाटतं का तुला?"

"हे बघा भ्राताश्री....."

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४०

Submitted by मी मधुरा on 21 September, 2019 - 03:10

गुरु द्रोणांनी केलेला अपमान आणि अर्जुनाचे बाण द्रुपद राजाचे मन घायाळ करून गेले होते. जखम काही केल्या भरत नव्हती. अर्ध राज्य गेल्याचे जितके दु:ख त्याला नव्हते तितके दु:ख अपमानाचे वाटत होते. त्याने यज्ञकुंडातील लाकडांच्या काटक्यांवर आग पेटवली..... त्याच्या हृदयात आधीपासून लागलेली! आणि अखंड यज्ञ सुरू केला. अग्निच्या ज्वाळा त्याच्या अपमानाइतक्या तिव्र झाल्या.
'याच! अश्याच धगधगत्या ज्वाळांमध्ये द्रोणाला जळताना पाहायचे आहे मला.....'

Pages

Subscribe to RSS - महाभारत