आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
"12th FAIL" हा ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज झालेला आणि परवा "डिस्ने + हॉटस्टार" वर रिलीज झालेला चित्रपट, मनोज कुमार शर्मा, IPS आणि श्रद्धा जोशी- शर्मा, IRS यांच्या जीवनावर आधारित "अनुराग पाठक" यांच्या 2019 च्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. थोडेफार या चित्रपटाबद्दल मी ऐकून होतो आणि IMDB वर त्याला 10 पैकी 9 रेटिंग आहे हे बघितले आणि इंटरनेटवर वाचण्यात आले की मर्यादित चित्रपटगृहात रिलीज होऊनही माऊथ पब्लिसिटी मिळाल्याने याचे शो वाढवण्यात आले होते आणि डायरेक्टर "विधू विनोद चोप्रा" असल्याने चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढत गेली.
खरतर मला चित्रपट पाहायचा तसा फार मोह नाही. पण कधी कधी एखाद दृश्य बघताना जर त्यातील काहीतरी नवीन वाटलं तर निश्चितच मी चित्रपट बघतो. ठरवून असं मुद्दामच नाही. परवा असाच एका दाक्षिणात्य चित्रपटाचा एक सिन पाहिला. थोडं काहीतरी वेगळं वाटलं म्हणून चित्रपट पण पाहिला. अप्रतिम ..! त्याची कथा तर अप्रतिम होतीच , अभिनय हि अप्रतिम होता. अर्थात मी तो हिंदीमध्ये भाषांतरित केलेला पाहिला होता. आणि नावही माहित नव्हतं. त्यातील अभिनेते ओळखीचेवाटले पण त्यांची नावे माहित नव्हती. मला कथानक खूप आवडलं. त्यातील सुरुवात आणि शेवट मला नाही पाहता आला , पण आता तो शोधावा कसा हा मोठा प्रश्न होता.
कविता लिहायच्या, आपणच खर्च करून कवितासंग्रह काढायचा आणि पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकायला ठेवा म्हणून विचारायला गेलं तर “कवितेची पुस्तक कुणी घेत नाहीत म्हणून,” उत्तर मिळणार, मग आपली पुस्तकं आपणच लोकपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा. काही जण विकत घेतातही काही अशीच ज्यांना आपण पुस्तक देतो ते तरी वाचतात की नाही हा प्रश्न? जर लोकं आपल्या कविता वाचणार नसतील तर का लिहायच्या कविता? हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घोळत होता, त्यापेक्षा आपण गद्य लेखन केलेलं बरं. गद्य लेखन जरा बऱ्यापैकी जमायला लागलं, लोकांना आवडत ही होतं.
मैलाचे दगड कसे असतात तुम्हाला माहिती आहेच. ते नसले तर तुमचा प्रवास काही थांबत नाही. पण असलेच तर तुम्हाला गंतव्यस्थानी पोहोचायला थोडी मदत होते. रफीची गाणी उत्तम ठरण्यासाठी त्यावर कुणी चांगला अभिनय केलाच पाहिजे अशी काही गरज नव्हती. पण काही दगडांनी आपल्या न-अभिनयाने रफीच्या जीव ओतून गाण्याकडे आपले लक्ष वेधून घेतले. म्हणजे मॉडेल्सनी चेहरे कोरे ठेवले कि त्यांच्या अंगावरच्या कपडे किंवा दागिन्यांकडे आपले लक्ष जास्त जाते तसेच काहीसं…..
पहिला मानाचा दगड आहे 'प्रदीप कुमार'. गाणं - 'हम इंतज़ार करेंगे'.
ज़िहाले मस्कीन - फिल्मी बंजाऱ्यांची चार पाले पडलेली आहेत. सूर्य मावळलाही नाही पण शेकोटी पेटवलेली आहे. राजस्थानी पगडी घातलेला एक माणूस रबाब वाजवायला सुरुवात करतो. वाळवंटात काळे कपडे घातलेली एक बंजारन उठून मान आणि कंबर हलवणाऱ्या बाहुलीसारख्या स्टेप्स करत ख़ालिस उर्दूमध्ये मुखडा गाते. मध्येच ती कथ्थकच्या स्टेप्स करायला सुरुवात करते. आणि हिरॉईन लांब केस मोकळे सोडून बसच्या टपावरून प्रवास करते. नाचणारी बाई अंतरा सुरु झाल्यावर कथ्थक सोडून फ्री स्टाईल डान्स करायला लागते.
तुम्ही अंदमान बेटावर फिरायला जाण्याचा विचार करत आहात का? करत असाल तर नक्की जा, मी कोण तुम्हाला थांबवणार? पण 2027 साली तिथे जाऊ नका. मी का म्हणतोय असे? थांबा सांगतो! आधी थोडी प्रस्तावना वाचा! लेख खूप मोठा झाला आहे, पण इलाज नाही! विषयच तसा आहे.
बरेचदा एखादी विज्ञान काल्पनिक कथा लेखक लिहितो, जी भविष्यात घडत असते, परंतु खरोखर तो काळ आल्यानंतर तशाच प्रकारच्या घटना थोड्याफार फरकाने घडताना दिसतात. याला लेखकाचा दूरदृष्टीपणा किंवा भविष्याचा पूर्वभास म्हणावा?
दिगपाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक चित्रपट मालिकेची घोषणा केली तेव्हा त्यांचा पहिला चित्रपट "फर्जंद नी" होता. यात सुरुवातीला पाच मिनिटात तानाजी मालुसरे सिंहगड जिंकताना दाखवले होते आणि त्यानंतर कोंडाजी फर्जंद यांची कथा होती. सिंहगड जिंकला जातो आणि शिवराज्याभिषेक जवळ येऊन ठेपला असतो. मात्र पन्हाळा किल्ला बेशक खानच्या अजूनही ताब्यात असतो. बेशककडून नागरिकांवर आणि स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारांच्या बातम्यांनी शिवाजी महाराज अस्वस्थ होतात. नेताजी पालकर उशिरा आल्याने पूर्वी पन्हाळा हातातून निसटलेला असतो, असे शिवाजी म्हणतात.
आज, बार्बरा स्ट्रेसँडचे, तिनेच दिग्दर्शित केलेले, माझे अतिशय आवडते २ सिनेमे, एका बैठकीत परत पाहीले - कोणत्याही ओटीटी वरती उपलब्ध नाहीत. विकत अ थवा भाड्याने घेउनच पहावे लागतील. इटस वर्थ इट. आय हायली रेकमेन्ड.
------------------------------------- येन्टल--------------------------------
.
सुभेदार पाहिला. आजकाल जवळपास सर्वच चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूपच पुढे गेलेले आहेत. ती बाजू सांभाळणारे जे कोणी तंत्रज्ञ, कलाकार इत्यादी आहेत त्यांना मानलेच पाहिजे. सिनेमॅटोग्राफर, कला दिग्दर्शक, स्पेशल इफेक्ट तंत्रज्ञ, एडिटिंग करणारे इत्यादी सर्वांनी या चित्रपटात खूप मेहनत घेऊन एक भव्यदिव्य चित्रपट साकारला आहे. आजकाल सेट्स तर सगळे एकदम चकाचक फाईव्ह स्टार असतात. नितीन देसाईंच्या काळात भव्यदिव्य आणि त्याचसोबत बारकावे टिपणाऱ्या कलादिग्दर्शनाचा पायंडा पडला आहे. मानलेच पाहिजे. यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. विशेषतः मध्यंतरानंतरचा चित्रपट.