ललित लेख

एका कोळियाने

Submitted by हौशीलेखक on 20 April, 2024 - 10:22

घर घेतल्यावर थोड्याच काळात आम्हाला जाणवलं होतं की ही खरं तर एक हॉंटेड (छोटीशी) मॅन्शन आहे. चांगलं नवं कोरं घर घेतलं होतं, पण बिल्डरचा बुढाबाबा सेल्समॅन, थरथरत्या हातातला मिणमिणत्या वातीचा कंदील डचमळत वगैरे 'क्या बताऊँ बाबू! आजसे पचीस साल पहले यहाँ एक कोलीवाड़ा हुआ करता था. खेतीबाड़ीके और फिर बादमें मकान बनवानेकी लालचमें सारे कोलियोंको जमीनमें गाड़ दिया गया. तभीसे अमावसकी रातको कईं बार वे कोली जमीनसे ऊपर आनेकी कोशिश करते रहते हैं.' असलं काही बोलला नाही तेव्हा. गोरा असल्यामुळे त्याला कदाचित माझ्याएवढं चांगलं हिंदी येत नसेल.

विषय: 
शब्दखुणा: 

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

Submitted by मित्रहो on 18 August, 2019 - 00:57

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता. मी त्या मुलाच्या आईला विचारले
"मुलगा का रडतो आहे?"
"भूक लागली त्याला."
"उपमा तयार आहे द्या त्याला"

तिचा पुरस्कार

Submitted by प्रतिक सोमवंशी on 17 June, 2019 - 02:51

सभागृहाच्या भिंतींना कापरे भरतील एवढ्या टाळ्यांच्या कडकडाट आज ज्ञानपीठ जाहीर झाला. सभागृह गच्च भरलय, पुढे vip लोकांच्या रांगा, त्यांच्या मागे बसलेली रसिक मंडळी, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनायला शेकडोंच्या संख्येने भरलीय. त्या पुढच्या रांगेतून उठून एका व्यक्तीची सगळ्यांना प्रतिसाद देत हळू हळू व्यासपीठाकडे जाणारी पाठमोरी आकृती मला अंधुकशी दिसतेय. हो...तिला मिळालाय ज्ञानपीठ!

नाटक!!!

Submitted by सारंग पात्रुडकर on 24 August, 2014 - 02:52

नाटक… नाटकामधील रंजकता नेहमीच भुरळ घालते.

त्याच नाट्यजादूचा अनुभव घेण्यासाठी नाटक केले आणि बरच काही उलगड्लं…

नाटकात सगळं सरळसोट असतं उलट माणसं एरवीच जास्त नाटकीपणे वागतात, वेगवेगळे मुखवटे लावतात.
नाटकामधे सगळं कसं सरळ प्रामणिक आणि पारदर्शक असत. अगदी जे “काही” असेल ते प्रेक्षकांसमोर.
एखाद्याला वाटत असेल काय सगळं ठरवून तर घडतयं, याच्यानंतर तो प्रसंग हा संवाद हे हावभाव…

हा खरचं एवढा सरळ हिशोब आहे का? याचं उत्तर शोधताना नाटकामागची ‘नाटकं’ उलगडली.

अभिनयाची एक वेगळी कथा आहे फ़क्त अभिनय करुन चालत नाही ते ओव्हरऍक्ट वाटतं.

विषय: 

ती जाते तेंव्हा...

Submitted by मुग्धमानसी on 14 June, 2013 - 03:30

ती जाते तेंव्हा मागे काय रहातं?

ती जाते तेंव्हा... निश्चल होऊन थिजून रहातो चार भिंतींत गुदमरलेला तिचा वावर...
घुसमटलेला... तरिही दरवळणारा... चुरगाळल्यावर सुगंध देणार्‍या बकुळीच्या फुलांसारखा.
दरवाजांच्या, कपाटांच्या मुठींना चिकटून बसलेले तिचे काही ओले-सुके स्पर्श किलकिल्या केविलवाण्या नजरेने तिला शोधत रहातात.
भांड्य़ांना, डब्यांना वाट्या-चमच्यांना मिठी मारुन बसलेला तिचा तिखटामिठाचा आंबटगोड दरवळ... स्वतःलाच हूंगत माग काढत रहातो तिच्या हरवलेल्या अस्तित्वाचा.
उंबर्‍यावरल्या रांगोळीची पांढरी रेघन्-रेघ आतूरल्या नजेरेने तिच्या वाटेकडे पहात रहाते... तुळस भरल्या घरी मावळून जाते...

जेव्हा श्रध्दा अंधश्रध्दा बनते

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 15 November, 2011 - 09:32

................ रस्त्यावर शेकडो लोकांची गर्दी. दारू पिऊन तर्र झालेले अंगाला पिवळा रंग लावलेले हातातला आसूड घेऊन जमिनीवर मारत सगळ्यांना घाबरवत पळवणारे,रस्त्यावर धुड्गुस घालणारे पोतराज. काही दारू पिऊन अंगात आलेल्या बायका, माना फिरवून अंगावर लिंबाच्या फाट्याने स्वतःला मारून घेत होत्या.. केस मोकळे, कपाळ्भर कुंकू. मध्येच कुणी बायका येऊन अंगात आलेल्या बाईच्या पायावर डोकं ठेवून, मुलाला पायावर ठेवून जाताना दिसत होत्या. नारळ, फुलं, उदबत्या, देवीपुढे साड्यांचा ढीग. मुख्य म्हणजे गर्दी होती ती सुशिक्षित लोकांची.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पुणेकरांना पुण्याची एक आठवण

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 11 July, 2011 - 04:11

मी लहान असताना पहिल्यांदाच सोलापुरला माझ्या मामाकडे गेले.' श्री भगवान वासुदेव अघोर '

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

होऊ शकेल कधी निचरा सार्या वाईट गोष्टींचा ???

Submitted by Diet Consultant on 29 May, 2011 - 13:31

हे जीवन सुंदर आहे ....... ! हे स्मिता तळवलकरच किती सुंदर गाणे ! कधीतरी याच नाण्याची दुसरी बाजूपण दिसते. माणूस मोठा होतो ; घरापासून शाळेपासून ऑफिसातल्या कामात गुंततो. आजुबाजूच वातावरण बदलत , आजूबाजूचे लोक बदलतात. मित्र -मित्र म्हणणारा कधी पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याच गुपित आई ला सांगतो, कधी ऑफिसात चुगल्या करतो. कटकटी असतात ; सगळीकडेच. पण वयाबरोबर , आपल्या यशाबरोबर हि कटकटीनची तीव्रता वाढत जाते.
गम्मत आहे ! आपले आई बाबा , आप्तजन, आपल्या शाळेतल्या बी सारे जण असताना आपल्याला जपले जाते हळुवार तळहाताच्या फोडासारखे. आणि नाण्याच्या दुसर्या बाजूची सुरुवात होते ; so called " मोठ झाल्यावर " .. !

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - ललित लेख