भारताची ‘यूपीआय’ क्रांती
पूर्वप्रसिद्धी :- "साहित्य परिषद"(नाशिक) दिवाळी अंक २०२३
पूर्वप्रसिद्धी :- "साहित्य परिषद"(नाशिक) दिवाळी अंक २०२३
( पूर्वप्रसिद्धी - 'ठळक बातम्या' दिवाळी अंक २०२३ )
८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीच्या धोरणाचा अनेकांच्या मते देशाच्या अर्थव्यवस्थेवर भला-बुरा असा लक्षणीय परिणाम झाला, पण यामुळे भारतातील डिजिटल पेमेंटच्या वाढीलाही वेग आला. या धोरणात्मक कारवाईमुळे भारतात डिजिटल इकोसिस्टमचा आक्रमक प्रचार आणि अवलंब झाला. नोटाबंदीच्या आधी, डिजिटल पेमेंटस् भारतातील सर्व व्यवहारांपैकी केवळ १०% होते, परंतु त्यानंतरच्या वर्षांत ही संख्या २०% पेक्षा जास्त झाली आहे.
विश्वास संपादन करून फसवणुक झालेल्या केसेस आपण इथे पाहिल्यात-
https://www.maayboli.com/node/65613
ह्या धाग्यात तशी कुठली ही विश्वासाची जमवणुक नाही, पण धमकी/घायकुती ला येऊन किंवा कन्फ्युज करून केल्या गेलेल्या काही स्कॅम्स बद्दल लिहायचा विचार आहे. माझ्या मित्र/नातेवाईक मंडळींचे काही अनुभव सिंगापुरातले तर काही भारतातले आहेत.
हा गृप मला फार आवडला. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या पध्दतीने नुकसान टळेल.
जर सेव्हिंग अकाऊंट वर पैसे ठेवण्या ऐवजी मुदत ठेव करुन ठेवले तर इंटरनेट बँकिग व्यवस्थेतला त्रुटी किंवा आपण केलेल्या चुकीमुळे होणार्या अफरतफरी पासून बचाव होणे शक्य आहे का ?
समजा पैसे लागलेच तरी मुदतठेव मोडायला आजकाल बॅकेत न जाता सुध्दा हे काम करता येते.
प्रश्न मुर्खपणाचा वाटेल पण बँकिग मधल्या अनुभवी लोकांनी उत्तरे द्यावी.
अनेकदा SMS किंवा व्हाट्सच्या माध्यमातून आपल्याला खोटे संदेश आणि लिंक येतात. खाली क्लिक करून व्यवहार पूर्ण करा इत्यादी. अनेकजणांना ही लिंक संशयास्पद वाटते त्यामुळे ते सावध होतात. पण सर्वच लोकांना ती खोटी साईट आहे हे कळेलच असे नाही. मला एखादी अशी खोटी लिंक आली तर मी माझ्या ग्रुप्स वर सांगतो कि असा एखादा SMS येईल जी खोटी साईट आहे. अशा साइट्स बाबत मायबोलीकरांना सावध करण्यासाठी हा धागा.
मागे मला एका क्रेडीट कार्ड विकनार्या मुलीने सांगीतलं की क्रेडीट कार्ड फ्री आहे. मी विश्वास ठेऊन घेतलं नी १५०० रूपये पहीलं बील आलं जोईनींग फी म्हणून. त्या मुलीने नंतर फोन स्विकारणे बंद केलं, एसबीआय मधून मेल ला काहीही ऊत्तर आलं नाही. आता तीन महीन्याने ५००० रूपये मागतेय एसबीआय. मी देनार नाहीये. पण क्रेडीट स्कोर खराब केलाय त्या लोकांनी.
तुमच्या सोबत असा कधी कुठेतरी फ्राॅड झालाय का? मग त्यावेळी तुम्ही काय केले? पैसे, वस्तू परत मिळाली का?