डिजिटल पेमेंटस आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास
( पूर्वप्रसिद्धी - 'ठळक बातम्या' दिवाळी अंक २०२३ )
८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीच्या धोरणाचा अनेकांच्या मते देशाच्या अर्थव्यवस्थेवर भला-बुरा असा लक्षणीय परिणाम झाला, पण यामुळे भारतातील डिजिटल पेमेंटच्या वाढीलाही वेग आला. या धोरणात्मक कारवाईमुळे भारतात डिजिटल इकोसिस्टमचा आक्रमक प्रचार आणि अवलंब झाला. नोटाबंदीच्या आधी, डिजिटल पेमेंटस् भारतातील सर्व व्यवहारांपैकी केवळ १०% होते, परंतु त्यानंतरच्या वर्षांत ही संख्या २०% पेक्षा जास्त झाली आहे.