शर्यत
-------------------------------------------------------------------------------------
‘आक्या, यंदा तुमचा शर्यत जिंकायचा काहीच चान्स नाही ! ‘ राक्या म्हणाला.
तसं आकाशला वाईट वाटलं. खूप वाईट वाटलं कारण त्याचे अप्पा दवाखान्यात होते.
संध्याकाळची वेळ. शाळा सुटलेली . पोरं घोळक्याने घरी चाललेली . त्यावेळची ही चर्चा. आकाश आणि राकेश दोघे एकाच वर्गात होते .आठवी तुकडी क मध्ये.
त्यांचं गाव मध्यम आकारात पसरलेलं होतं. हिरवं, निसर्गसंपन्न आणि शेत जमिनींचं. कडेगाव त्याचं नाव .त्या गावाला बैलगाडा शर्यतीची मोठी परंपरा होती.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.