गावातली लोकशाही
Submitted by राज अज्ञानी on 3 April, 2026 - 03:19
गावं बदलत आहेत.
पूर्वीचं संथ वातावरण राहिलं नाही असं म्हणतात. लोक गावच्या पूर्वीच्या रूपाची चर्चा करतात. सगळे गुण्यागोविंदाने रहायचे असे म्हणतात.
पण खरंच असं आहे का?
सध्या गावागावात विविध पक्षात तरूण भरती होत आहेत. पूर्वी एकच पक्ष असायचा. त्यामुळं एक नेता असे. त्याचं घराणं असे. हे घराणं संस्थानिकाप्रमाणे असायचं. काही गावात पाटील आणि देशमुख असे प्रबळ गट असत. काही गावात तणाव असे. पण निवडणुका वगळता गावचं जीवन एरव्ही शांत असे.
विषय:
शब्दखुणा: