गणेश लेख

दरवर्षी असं होतं...

Submitted by हरिहर. on 16 September, 2018 - 00:48

‘नेमिच येतो पावसाळा’ असं म्हणण्यात काही अर्थ राहिला नाही आजकाल. तो कधीही येतो. कधी कधी येतही नाही. लहरी झालाय तो माणसांसारखाच. मात्र पंचांगाप्रमाणे श्रावण येतो आणि मागोमाग भाद्रपदही येतो. पण श्रावण आला की बायको वैतागते आणि भाद्रपद आला की मुलगी चिडते. निमित्त श्रावणाचं आणि भाद्रपदाचं असलं, तरी या वैताग आणि चिडचिडीला कारण असतो मी. म्हणजे श्रावण आला की मी अचानक फार काटेकोर, रूढीप्रिय वगैरे होतो. अर्थात मला फायद्याच्या असणाऱ्या रूढी आणि परंपराच मी पाळतो हा भाग वेगळा. श्रावणात मी एकही उपवास करत नाही. मला झेपतच नाही उपवास. पण बाकीच्या गोष्टी मात्र मी अगदी कसोशीने पाळतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गणेश लेख