विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यात अग्रेसर असलेले राष्ट्र म्हणून जपानला आपण ओळखतो. प्रचंड मेहनत, वक्तशीरपणा आणि काटेकोर शिस्त हे तिथल्या नागरिकांचे गुण कौतुकास्पद आहेत. दुसऱ्या बाजूस तिथल्या औद्योगिक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेले ताणतणाव हेही प्रचंड आहेत. त्यातूनच निरनिराळ्या मानसिक समस्यांचे प्रमाण तिथे खूप आहे. या लेखात अशाच एका मानसिक समस्येचा आढावा घेत आहे.
एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो. आणि मग सर्व शरीर सुदृढ आणि निरोगी असूनही हृदयधमन्यांमध्ये किटण साठू लागते. त्या अवरुद्ध होतात. हृदयविकार होतो. असल्यास बळावतो. म्हणूनच हृदयविकार झालेल्यांना समाजात मिळून-मिसळून राहण्याचा सल्ला दिला जातो. इतरांशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने फायदाही होतो. ह्याकरिताच एकाकीपणा उद्भवतो कसा? त्याचा सामना कसा करावा?
गेले तीन महिन्यापासून मी एकटा राहत आहे.असा प्रसंग आयुष्यात फार क्वचित आला.माझे वैयक्तिक अन वैवाहिक जीवन फार आनंदात गेले आहे.लग्नाला तेहेतीस वर्षे झालीएत.
मी अनेक प्रकारे स्वतःला गुंतवून ठेवत आहे निवॄत्त झालो तरी कॉलेजात आठवड्यातील चार दिवस शिकवायला जातो.साय,न्काळी वाचतो,लिहितो,गाणे ऐकतो,तरीही एकाकी पणा खायला उठतो.घरात एकटा बसलो कि उद्विग्न होतो.आणखी काही आठवड्यानी पत्नी परदेशातून परत येयील.
कुणाशीतरी चार शब्द बोलायला जीव कासावीस होतो.आधी मी इतका हळवा कधी नव्हतो.
असे का झाले कळत नाही.लौकिक द्रुष्ट्या सर्व काही स्थिर स्थावर आहे.मग असे का?
कोणी सांगू शकेल का?