
पहाटे 5 वाजता आल्हाददायक वातावरणात मिट्ट काळोखात, गुलाबी थंडीमध्ये अभ्यंग स्नान करण्यासाठी उठवण्यात येते. घराघरांत केवळ खिडकीच्या कठड्यांवरच्या पणत्यांची गवताच्या पात्यांप्रमाणे लवलवणारी केशरी वात, प्रकाशाचे वेगवेगळे ताल धरून नाचणारी दिव्याची माळ आणि रंगीबेरंगी आकाशकंदील यांचा प्रकाश असतो. मातीमध्ये जागोजागी विखुरलेल्या रत्नांसारखा काळोखात उठून दिसत असतो. एरवी कर्णकर्कश्श वाटणारे आणि छातीत धडकी भरवणारे फटाके आज background music सारखे भासतात. अंधारात चमचमणाऱ्या चांदण्यांमध्ये शुक्राच्या चांदणीची भर पडते. दूर अंतरावरील मशिदीमध्ये चालू झालेली अजान पण या थंडीमध्ये आणि शांततेमध्ये कानावर पडते. पणतीच्या मंद प्रकाशात स्नान झाल्यावर परत बाल्कनीत बसकण मारून सूर्योदयाची वाट बघत आकाशाच्या बदलत्या रंगछटा न्याहाळल्या जातात. जणू पहाटे भारतातल्याच सगळ्या मंद रोषणाईचे प्रतिबिंब आकाशावर पडले आहे असे भासते. हवेच्या थंडगार झुळका हळुवार स्पर्श करून जातात. यावेळी समजते, की भारतीय सणांचे सौंदर्य अनुभवायला कायम रंगांची उधळण, जल्लोष, उत्साह, दिमाख असलाच पाहिजे असे नाही. पाच दिवसांची रंगीत, रुबाबदार, झगमगणारी, नादगुंजनमय दिवाळी आनंद देतेच, पण ही पहाटेच्या वेळेतील एका तासापुरती सीमित अशी मिणमिणत्या दिव्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने मनाला सुखावते.
वाह सुंदर छोटेखानी लेख. फोटो
वाह सुंदर छोटेखानी लेख. फोटो तर अप्रतिमच.
सुंदर
सुंदर
फोटो खूप सुंदर आहे
फोटो खूप सुंदर आहे
छान लिहिलंय .पण फारच लहान
छान लिहिलंय .पण फारच लहान झालाय लेख.अजून लिहायला हवं होतं.असो पुढील लेखनास शुभेच्छा आणि मायबोली वर स्वागत
फोटो आहे की चित्र आहे? मला
फोटो आहे की चित्र आहे? मला वाटतं चित्रच असावे.