रामधारीसिंह दिनकर हिंदी साहित्यातले फार मोठे नाव आहे. त्यांच्या कविता स्वातंत्र्यलढ्याच्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्याही कठीण काळात तलवारीप्रमाणे तळपत होती. हल्ली त्यांची सुप्रसिद्ध कविता "सिंहासन खाली करो कि जनता आती है!" वारंवार आठवते. आणि असंही वाटतं रामधारीसिंहांनी कळकळीनं वर्णन केलेली ही ’जनता’ - नक्की कडेलोटाच्या कुठल्या टोकाला जाऊन पेटून उठते? किती राख होईपर्यंत थांबते? कुठवर ताणले जाऊ शकते तिला? आणि का?
आज रामधारीसिंह असते तर त्यांची लेखणी किती धाय मोकलून रडली असती?
असो. त्यांच्या या सुप्रसिद्ध कवितेचा मराठीत भवानुवाद करायचा छोटासा प्रयत्न -
शतकांपासूनची थंड राख पेटू बघते.
माती मस्तकावरी मुकुट मिरवू बघते
द्वंद्वावरल्या कालरथाची घरघर ऐका...
खाली करा हे सिंहासन.. जनता येते!
जनता?... हो त्याच मृदेच्या अबोध मूर्ती
बोचरे हिवाळे अबोल तारून नेणारी
अंगांगाला डसून शोषणारे सर्प
तरिही मुकाट्याने सगळे अनुभवणारी.
जनता? हो वरतोंडानं दिलेली तीच शपथ हो,
"जनता, खरंच मोठीच वेदना सहन करते."
"ते ठिक, पण अखेर यावर जनमत काही?"
"हा प्रश्न गूढ की जनता यावर काय बोलते?"
असे समजू की जनता म्हणजे अजाण पुष्पे
जेंव्हा मर्जी नेसा-फेडावी दोघांत
वा दूधपिती असावी ही बालिका कुणी
जंतर-मंतर पुरवावे तिस खेळरुपात
पण भूकंप होतो... इथे वादळे उठतात,
जनता जेंव्हा भुवया ताणून सशंक होते
द्वंद्वावरल्या कालरथाची घरघर ऐका...
खाली करा हे सिंहासन.. जनता येते!
इमलेही होतात ध्वस्त या नि:श्वासांनी
श्वासांच्या वादळी ताजही उडून जातो
जनतेची रोखेल वाट, इतका ना भारी
काळही तिच्या वळणांवरूनी निमूट वाहतो.
दशके, शतके, सहस्त्रकांचा अंध:कार हा
गळून गेला, खिडक्या सार्या उजळून गेला!
जनतेच्या सुखस्वप्नांचा हा प्रकाश अविजय
अंधाराची छाती चिरून पसरून राहीला!
लोकशाहीचे विराट विश्व येथे अव॒तरले
तेहतीस कोटी सिंहासन ठेवा तय्यार
अभिषिक्त सम्राट नव्हे, ही प्रजाच आहे!
तेहतीस कोटी शिरांवर मुकुटांचा भार...
मंदिर-महाला-भुयारांतून तू का नी कशाला
धरून आरती शोधत फिरतो मुर्खा त्यांना ?
खर्या देवता सडकेवर फोडतात दगडी
देव सापडे शेता-खळ्यांमधून.... ऐकना!
नांगर कावड राजदंड बनतील उद्याचे
धुलिकणांची सुवर्णलेणी त्यास सजवते
द्वंद्वावरल्या कालरथाची घरघर ऐका...
खाली करा हे सिंहासन.. जनता येते!
खाली करा हे सिंहासन.. जनता
खाली करा हे सिंहासन.. जनता येते!+१००
मूळ कविता दिली तर भावानुवाद
मूळ कविता दिली तर भावानुवाद कसा झाला आहे हे सर्वांना समजेल. खाली देत आहे.
सिंहासन खाली करो कि जनता आती है
सदियों की ठण्डी-बुझी राख सुगबुगा उठी,
मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है;
दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो,
सिंहासन खाली करो कि जनता आती है ।
जनता ? हाँ, मिट्टी की अबोध मूरतें वही,
जाड़े-पाले की कसक सदा सहने वाली,
जब अँग-अँग में लगे साँप हो चूस रहे
तब भी न कभी मुँह खोल दर्द कहने वाली ।
जनता ? हाँ, लम्बी-बडी जीभ की वही कसम,
जनता,सचमुच ही, बडी वेदना सहती है।
सो ठीक, मगर, आखिर, इस पर जनमत क्या है ?
'है प्रश्न गूढ़ जनता इस पर क्या कहती है ?"
मानो,जनता ही फूल जिसे अहसास नहीं,
जब चाहो तभी उतार सजा लो दोनों में;
अथवा कोई दूधमुँही जिसे बहलाने के
जन्तर-मन्तर सीमित हों चार खिलौनों में ।
लेकिन होता भूडोल, बवण्डर उठते हैं,
जनता जब कोपाकुल हो भृकुटि चढाती है;
दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो,
सिंहासन खाली करो कि जनता आती है ।
हुँकारों से महलों की नींव उखड़ जाती,
साँसों के बल से ताज हवा में उड़ता है,
जनता की रोके राह, समय में ताव कहाँ ?
वह जिधर चाहती, काल उधर ही मुड़ता है ।
अब्दों, शताब्दियों, सहस्त्राब्द का अन्धकार
बीता; गवाक्ष अम्बर के दहके जाते हैं;
यह और नहीं कोई, जनता के स्वप्न अजय
चीरते तिमिर का वक्ष उमड़ते जाते हैं ।
सब से विराट जनतन्त्र जगत का आ पहुँचा,
तैंतीस कोटि-हित सिंहासन तय करो
अभिषेक आज राजा का नहीं, प्रजा का है,
तैंतीस कोटि जनता के सिर पर मुकुट धरो ।
आरती लिए तू किसे ढूँढ़ता है मूरख,
मन्दिरों, राजप्रासादों में, तहखानों में ?
देवता कहीं सड़कों पर गिट्टी तोड़ रहे,
देवता मिलेंगे खेतों में, खलिहानों में ।
फावड़े और हल राजदण्ड बनने को हैं,
धूसरता सोने से शृँगार सजाती है;
दो राह, समय के रथ का घर्घर-नाद सुनो,
सिंहासन खाली करो कि जनता आती है ।
- रामधारी सिंह दिनकर
छान.
छान.
मूळ कविता तर अफाट आहेच,
मूळ कविता तर अफाट आहेच, अनुवादही चपखल जमला आहे. आवडली.
धन्यवाद आचार्य.