आयुष्य हे नेहमीच कुणालाही सहज जमेल तस जगता आलेलच नाहीये ते नेहमी प्रत्येक वळणावर आपल्याला अस्तित्ववा विषयी विचारत असत कधी समाजाच्या रुपात तर कधी नातेवाईकांच्या ,कधी ते आपल्याला काटयांच्या मार्गामधुन जायला सांगतात तर कधी फुले असलेला मार्ग दाखवतात , पण आपल्याला स्वत:ला ओळखता यायला हव, स्वत:चा मार्ग खुद्द स्वत निवडता यायला हवा, आपण काय करायला पाहिजे म्हणजे आपण आनंदी किंवा दुःखी होत असतो ते ओळखता यायला हवी, अशी कोणतीही गोष्ट जी आपण मनापासून करतो ती करताना आपण कोण आहोत हे विसरतो आणी पुर्ण त्या गोष्टीत हरवतो आणि ती गोष्ट आवडीने करतो ती करायलाच पाहीजे तेव्हा तुम्हाला तुमच्या मधल्या त्या ' मी कोण 'च उत्तर एक दिवस नक्कीच मिळेल आणि नाही जरी मिळाल तरी तुम्ही तुमच्या आवडीच आयुष्य जगलेले असाल फक्त कधी स्वतःला विसरुन दुसर्यांच्या विचारांच्या आहारी जाऊन, त्या सर्कसीमधल्या वाघासारखी स्वतःची अवस्था करुन नका घेऊ म्हणजे झाल!
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.