वाड्यातल्या गप्पा
हा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल. मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.
धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. 
धन्यवाद.
करा सुरू.. !
***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध
सामो लग्न वाढदिवसाच्या
सामो लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपण खातोय ते सगळं इथलं नाही.... मुळात आपण पण कुठूनतरी आलेलो च असू नं ...
मुळात आपण पण कुठूनतरी आलेलो च
मुळात आपण पण कुठूनतरी आलेलो च असू नं ....>> Exactly.
फक्त सगळ्यात आधी कोण आलं एवढा फरक असु शकतो आणि हे सगळं हजारो वर्षांपूर्वी झालं असेल तर काय फरक पडतो त्यानेही.
किल्ली
तेरा बिलियन वर्षांपूर्वी
तेरा बिलियन वर्षांपूर्वी कणाच्या स्फोटातून येताना आपण वरणभात भाजी पोळी घेऊन आलो. त्यामुळे आपणही आपले नाही आणि आपला स्वयंपाकही.
मानव, शर्मिला खूप आभार.
मानव, शर्मिला खूप आभार.
.
किल्ली प्लेलिस्ट आवडली.
बिरिझ्झा म्हणजे बिर्याणी
बिरिझ्झा म्हणजे बिर्याणी पित्झा >> होय. डॉमिनोचा होता की पिझा हटचा आठवत नाही. कुणाचाही असता तरी मी खाल्ला नसताच.
आपली स्वतंत्र अशी खाद्यसंस्कृती नव्हतीच ह्यावर माझा विश्वास नाही
>>> एक्झॅक्टली. भारतातला प्रत्येक पदार्थ चाखायचा म्हटला तर आयुष्य पुरणार एवढं वैविध्य तेही जमिनीचा कस, वातावरण वगैरेला अनुरूप असं आणि आपले बरीचसे पदीर्थ इतरांचे हे पटत नाही. काही पदार्थ आपल्याकडून तिकडे जाऊन परत आपल्याकडे नविन स्वरुपात आले अशीही शक्यता आहेच की.
त्यांना आकर्षण वाटलं सतत, म्हणजे आपल्याकडे असं काही होतं जे त्यांच्याकडे नव्हतं. खरेतर त्यामुळेच आपल्यावर परकीय आक्रमणे फार झालीत. नालंदा विद्यापीठ अक्षरशः जाळून टाकले होते. तेथे असलेले दस्तावेज कधीही कळणार नाहीत. शिवाय नैसर्गिक आपत्तीत पण बरेच काही पुरावे नष्ट झाले असतील. आपण डोक्यूमेंटेशन (पेटंटमधे) मधे कमी पडतो ही डोळ्यासमोर दिसणारी तथ्य आहेत
>>> एकदम पटलं.
सामो लग्नाच्या वाढदिवसाच्या
सामो लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. सेलिब्रेशन जोरात दिसतं आहे.
माझेमन होय. खूप आभार.
माझेमन होय. खूप आभार.
सामो लग्न वाढदिवसाच्या
सामो लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हा उभयतांना
छान साजरा केलात
किल्ली
Loved playlist
खाण्याच्या बाबतीत हे veg आहे का एवढा एक बेसिक प्रश्न असतो मला.
मग ते चवीचे असले की झाले.
खाद्यसंस्कृती ही evolve होत गेलीच आहे.
गावी मागच्या पिढीत चपाती कोणी खात नसे आधी.
सणासुदीला पुरणपोळी.
आता चपाती खातात अधेमध्ये.
शहरी लोकं चुलीवरच्या भाकरी शोधत फिरतात
मानव
आमच्या जनरेशन ने जे पाहिलंय ते बघता एलियनदेखील बघूनच जाउ बहुतेक.
कुणी सांगावं ,हल्लीचे नेते असे वागतात की त्यातला एखादा एलियन आहे असा संशय येतो.
सामो, लग्नाच्या वाढदिवसाच्या
सामो, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अस्मिता, माझेमन पोस्ट्स पटल्या आणि आवडल्या.
सामो, लग्न वाढदिवसाच्या
सामो, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा!
झकासराव, प्रज्ञा आणि स्वाती
झकासराव, प्रज्ञा आणि स्वाती आभारी आहे.
सामो सेलेब्रेशन जोरदार ! काल
सामो सेलेब्रेशन जोरदार ! काल दिल्या होत्या वाहुन गेल्या असाव्यात तेव्हा परत एकदा शुभेच्छा.
प्राजक्ता थँक्स.
प्राजक्ता थँक्स.
किल्ली महाराष्ट्र गीत आहे
किल्ली महाराष्ट्र गीत आहे मुलांना 3 आणि 4 ला मराठी पाठ्यपुस्तकात शेवटच्या पानावर. अभ्यासाला नाही पण पाठांतराला आहे.
सामो, लग्न वादिच्या हार्दिक
सामो, लग्न वादिच्या हार्दिक शुभेच्छा.
किल्ली महाराष्ट्र गीत आहे
किल्ली महाराष्ट्र गीत आहे मुलांना 3 आणि 4 ला मराठी पाठ्यपुस्तकात शेवटच्या पानावर. अभ्यासाला नाही पण पाठांतराला आहे.>>>हो का? मस्त की.
अजून काय आहे पाठांतराला?
मराठी पुस्तक मिळाले नाही अजून
बाकी सगळे अभ्यासक्रमाचा भाग
बाकी सगळे अभ्यासक्रमाचा भाग आहे, हे राज्यगीत म्हणून आहे.
सामो, लग्नाच्या
सामो, लग्नाच्या वाढ्दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नसरापूरची घटना हॉरिबल आहे. पण
नसरापूरची घटना हॉरिबल आहे. पण त्याहीपेक्षा आंधळी आहे ती आपली न्यायसंस्था जी स्वतःच्या पुतणीवर, ७५ वर्षाच्या बाईवर बलात्कार केलेल्या आणि शिक्षा भोगत असलेल्या नराधमाला पॅरोलवर बाहेर सोडते. हे निर्णय जे कुणी घेतात आणि जे कुणी पॅरोलची मागणी करतात त्यांची काही अकाऊंटेबिलिटी आहे की नाही? पॅरोल देताना गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीचा विचार केलेला असतो का नाही?
मागेही अशीच केस झाली होती. बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराला चांगल्या वर्तणुकीसाठी शिक्षा कमी करून सोडलं आणि बाहेर पडल्यावर त्याने लहान मुलीवर बलात्कार केला. चांगल्या वर्तणुकीची काय लक्षणं दिसतात न्यायसंस्थेला?
नो वंडर लोक एन्काऊंटरला समर्थन देतात. मी तर म्हणते अश्या आरोपींना पॅरोल वगैरे देणाऱ्या न्यायाधीशांवरही खटले दाखल केले पाहिजेत.
ममो, आर्च आभारी आहे.
ममो, आर्च आभारी आहे.
ओह्ह
ओह्ह

टोटली! पथेटिक आहे! दोन निरपराधी मेले तरी चालतील पण एक अपराधी सुटला नाही पाहिजे म्हणावसं वाटतं.
घृणास्पद आणि विकृत आहे ही
घृणास्पद आणि विकृत आहे ही घटना. त्या बाळाच्या आईवडीलांच्या दु:खाची कल्पनाच करवत नाही.
घृणास्पद आणि विकृत आहे ही
घृणास्पद आणि विकृत आहे ही घटना. त्या बाळाच्या आईवडीलांच्या दु:खाची कल्पनाच करवत नाही.>> +१
सामो, लग्नाच्या वाढदिवसाच्या
सामो, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपण डोक्यूमेंटेशन (पेटंटमधे) मधे कमी पडतो ही डोळ्यासमोर दिसणारी तथ्य आहेत...... अगदी बरोबर.
याआधीची चर्चा वाहून गेली.
नसरापूरची घटना दुर्दैवी आहे.
नसरापूरची घटना दुर्दैवी आहे.
नसरापूरची घटना दुर्दैवी आहे.
>>> ही घटना दूर्दैवी नाही. ही आपल्या न्यायव्यवस्थेची सपशेल हार आहे.
बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगाराला पॅरोल मिळतोच कसा? अगदी काही दिवसांसाठी तरी समाजात परत जाताना त्याला कायद्याचा धाक कसा नाही? ही जबाबदारी कुणाची?
तिकडे राजीव गांधीच्या खुनखटल्यातील आरोपी लवकर सुटून वकील होऊन प्रॅक्टीसला सज्ज होतो, प्रियदर्शिनी मट्टूचा बलात्कारी व खुनी कायद्याच्या परीक्षा देतो आहे.
गुन्हा घडल्यावरही न्याय मिळणार नसेल तर सामान्य माणसाने कायदा का पाळावा?
माझेमन +१
माझेमन +१
हॅलो वाडा
हॅलो वाडा
नसरापूरची घटना माहीत नव्हती
काल रात्री एका पत्रकार मित्राने रास्ता रोको कव्हर केलेले आणि व्हिडीओ स्टेटसला लावलेले पाहून कळालं.
फार भयानक घटना आहे.
आजच वर्तमानपत्रात चाकण मध्येही एका 3 वर्षाच्या मुलासोबत अशीच घटना घडलेली बातमी वाचली आहे.
मजूर आई.
मूळचा बिहारचा आरोपी.
पळून निघाला होता.
आधी वांझोटा संताप आणि विषण्ण होत मन.
माझेमन ने जे पॅरोल बाबत लिहिलंय त्यालाही सहमत.
इतकी history असलेला माणूस आणि त्याला पॅरोल मिळतो.
त्यांचे फक्त वागणे नव्हे तर सायकोमेट्रिक टेस्ट होउन नंतरच पॅरोल दिला पाहिजे.
अर्थात भारतात पदोपदी पैसे चारले की हवे ते कायदेशीर काम कागदोपत्री बसवून मिळते त्यामुळे ह्यात सुधारणा होणे म्हणजे दुर्मिळच.
विषण्ण करणारे प्रसंग
विषण्ण करणारे प्रसंग चहुबाजुनी अंगावर घेरुन आल्यासारखे झालेय.
अशा माणसाला पॅरोल मिळतो.. अजुन् काय बोलणार आपल्या
भ्रष्ट व्यवस्थेवर. सध्या राज्यात जे सुरु आहे ते पाहता गृहमंत्र्याच्या पार्श्वभागावर लाथ मारुन त्याला हाकलुन द्यायला
पाहिजे.
याच्या बायकोवर बलात्कार करा असे तोंडाने बोलणार्या माणसाकडेही जो दुर्लक्ष करतो तो इतरांकडे काय लक्ष देणार. लाथा घाला त्याला.