वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला काश्मिरात केशराचे कंद मिळाले पण ते वाटाण्या एवढे आहेत. देणार्‍याने जमिनीतुन उपटुन दिले पण मी फ्रिजमध्ये ठेवले. आता काढुन कुंडीत लावेन.

केशराचेच कंद की अजुन काही देव जाणे. पांपोरमधल्या जमिनीत होते म्हणजे केशर असायचे ५०% चांसेस आहेत.

>>>>>किती तो आशावाद!
Happy प्लुरल्स्मध्ये (घाऊक) नको बोलायला. म्हणुन गं.

Screenshot_20250909_180409_WhatsApp.jpg

नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244

सगळ्यात जास्त फवारण्या घेण्यात एक नंबरावर हापुस आंबा आहे आणि दोन नंबरावर सफरचंद.>>>>

द्राक्षे व ढोबळी मिरची वर पण प्रचंड प्रमाणात फवारणी करतात ना? मी असे ऐकले आहे.

द्राक्षांवर भरपूर फवारणी असते. खरंतर प्रत्येक पिकावर असतेच. नैसर्गिक शेती करणारे चिमुटभर लोक सोडले, तर सगळे रसायनयुक्त भाज्या, फळं, धान्य खातो.
नैसर्गिक शेती ग्रूपवर ह्या वर्षी एका दादांनी द्राक्ष आणली होती. आकाराला लहान होती. पण फार छान गोड. शिवाय टिकलीही पुष्कळ दिवस. मी त्याचे बेदाणे केले. ते अजून आहेत.

काल माझ्या एका मैत्रीणीने सगळ्यांसाठी वाटायला घरचा मध आणला होता. हे तिचे पहिले वर्ष प्रॉडक्टिव बी किपिंगचे. मैत्रीण एकंदरीतच हौशी आहे त्यामुळे छान ८ औसाची बाटली, त्याला पिटूकली डेकोरेटीव मधमाशी लावलेली आणि जोडीला एक लहान लाकडी मध वाढणं असा थाटमाट !

हल्ली पोळ्याचा तुकडा ठेवलेला मध फॅशन मध्ये आहे. इथे परवा कॉस्को मध्ये तशी बाटली दिसली तर एक आणली. पोळं चिवट लागतं. पण ते असलं की मधाचे स्फटिकीकरण होत नाही म्हणे.

बाजुलाच हनी फार्म पण होता, सुदैवाने बंद होता. नायतर पोळ्यात हात घालुन मध काढुन घेतला असता आमच्याकडुन >>> Lol

मी अ‍ॅपल पिकिंग केले नाही कधी पण चेरी, स्ट्रॉबेरी व इतर "बेरी"ज चे केले आहे. इथे जेथे ते करतात तेथे केमिकल्स नसतात - निदान असे सांगतात व आपल्याला खाताना वाटत नाही त्यावर इतर काही मारलेले असेल. फार्म मधे खाल तितकी खाऊ शकता. पण बहुतांश लोक आणखी विकत घेतात घरी आणायला. आम्हीही घ्यायचो. तेव्हा उत्साहात घेतलेली फळे सगळी संपत नाहीत.

आम्ही जायचो निदान तोपर्यंत देसी लोक इतरांसारखेच वागत. वात आणणारे देसी - वाली उदाहरणे बरीच आहेत पण मला पिकिंग फार्म्स मधे दिसलेली नाहीत अजून Happy

>>>>>>>हे तिचे पहिले वर्ष प्रॉडक्टिव बी किपिंगचे.
मस्त!!
>>>>>>सगळ्यांनी नैसर्गिक शेती करायचं ठरवलं तर आपल्याला अन्नधान्य कमी पडेल.
हम्म्म!! खरे आहे.

बिझनेस केस आणि बी आर डी - कधीकधी पॅरलल होतात. किंवा गव्हर्नन्स्करता क्रम उलटापालटाही होउ शकतो.
.
एकाला बिझनेस करण्याकरता माझी व्हेरी वेल-एलॅबोरेटेड बी आर डी, मदत म्हणुन दिली. तर त्या माणसाने सगळे पॉइन्टस बिझनेस केस मधे टाकून दिले. आता त्याच्या बिझनेस केसमुळे माझी बी आर डी रिडन्डंट बनते आहे. लेसन लर्न्ट! मदत हातचे राखून करावी.

२०१९ च्या अमेरिका वारीत आम्ही alstede farm NJ ला गेलो होतो. सप्टेंबर महिना. भोपळे होते बरेच. आणि इतर फळभाज्या. ढकल गाडी होती आणि ट्रॅक्टर ट्रॉली पण होती. पण ऊन चांगलेच होते असे आठवते. मुलगी आणि भाची एकदम घामेघुम झाल्या होत्या. फार कलकलाट नव्हता नक्कीच. मजा आली होती.

सगळ्यांनी नैसर्गिक शेती करायचं ठरवलं तर आपल्याला अन्नधान्य कमी पडेल.>>>

हे खरेतर मला पटत नाही. पण आता परिस्थितीच अशी निर्माण केली गेलीय की धान्याचा डिएनए माणुस लिहितोय. हायब्रिड बियाणे रासायनिक खताशिवाय येत नाही कारण त्याची गरजच ती आहे. जगभर विविध कारणांनी सेंद्रिय कार्बन अपुर्णांकात आलाय. अशा जमिनीत शेती करायची तर खतांशिवाय पर्याय नाही.

तणनाशके वाईट पण आज परिस्थिती अशी आहे की तणनाशक वापरले नाही तर शेतकरी मरेल. शेती करायची तर त्याला वापरावेच लागणार.

आर्च मी संयोजक नाही पण कमेन्ट समजुन घेण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही म्हणताय, ते म्हणजे लिंक स्वरुपात. क्लिक करुन त्या लिंकवरती जाउन कथा वाचायची? ते फार प्रचंड काम आहे. कॉपी-पेस्ट्/एम्बेड.

मला वाटलं की प्रत्येक स्पर्धेच्या एका फोल्डरमध्ये. म्हणजे,वरणभाताच्या सगळ्या एकत्र म्हणजे मत ठरवायला सोपं जाईल.

अशा जमिनीत शेती करायची तर खतांशिवाय पर्याय नाही....... हे जरी खरं असले तरी बरीच धान्ये,भाज्या अनैसर्गिकरीत्या पिकवली जातात हे वाईट आहे.कित्येक शेतकरी स्वतःच्या वापरासाठी वेगळे,रासायनिक फवारणीविना धान्य पिकवतात.माझी बाई तर सांगत होती की त्यांच्या गावातले तर संध्याकाळी 4.30 -5 झाले की फवारणीला जातात.रात्रीत दोडकी दुधी मोठे होतात आणि मार्केटसाठी तयार होतात.

सगळ्यांनी नैसर्गिक शेती करायचं ठरवलं तर आपल्याला अन्नधान्य कमी पडेल>>>>

जर जास्त जमीन सिंचनाखाली आणली, पाण्याचे योग्य नियोजन केले, automation/machines चा वापर वाढवला, industries ना नापीक जमिनीवरच जागा दिली तरी?

सकाळी सकाळी day dreaming चालू झाले माझे….

असो,
शक्य असेल तर स्वतःची जमीन घेऊन त्यात पिकवावे व तेच खावे.
काही श्रीमंत लोक शेत जमीन भाड्याने घेतात म्हणे. त्यात शेतकऱ्यांनी ते सांगतील तेवढेच व सांगतील तसेच पिकवायचे.

हे जे काही चालू आहे त्या बद्दल तक्रार करून काही फायदा नाही. ते बदलणे आपल्याला शक्य नाही.

रच्याकने,
फक्त भारतातच ही परिस्थिती आहे की सगळीकडे?

भारतात जी द्राक्षे पिकतात, त्यातली chemical residue free द्राक्षे सगळी निर्यात होतात म्हणे. आणि आपल्याला रिजेक्ट झालेला माल मिळतो.

अ तरंगी तुम्ही काल द्राक्षांबद्दल विचारले. द्राक्ष हा सुद्धा भयंकर खर्चिक उद्योग आहे. घोस लागले की अनुभवी हात त्यातले लहान मणी काढुन टाकुन एकसारखे वाढणारे मणी ठेवतात. सगळेच मणी ठेवले तर सगळेच लहान राहतात. झाडावर वाढताना एकेक घोस हार्मोनच्या पाण्यात, किटकनाशकाच्या पाण्यात बुडवावा लागतो. दहा एकराच्या मळ्यात हे करायला किती मनुष्यतास लागतील विचार करा. माझ्या भावाचा एक
श्रीमंत मित्र शेतीच्या विचाराने पछाडलेला. घरची नाशिकला बक्कळ जमिन होती. त्याने द्राक्षशेती सुरु केली. आणि पुढची चारपाच वर्षे द्राक्षाचा पुर्ण आयुष्यक्रम त्याला पाहायला मिळाला. इतके प्रोसेस होते हे पाहुन त्याला धक्का बसला आणि इतकी वर्षे आपण हे असे किटकनाशकात भिजलेले फळ आवडीन्र खात होतो हे समजुन तो डिप्रेशनमध्ये गेला. शेवटी त्याने बंद केली शेती. त्याला सुरु बंद करणे परवडले. ज्यांचे पोटच त्यावर आहे ते काय करणार?

एक्स्पोर्त द्राक्षामध्ये हे सगळे करावे लागतेच पण ते किती करायचे याची मानके असतात. ते पाळुन करतात. आपल्याकडे बहुतांश शेतकर्‍यांना मानके माहित नसतात. अधिकस्य अधिक फलम मानत ते आहे ते मारुन देतात पिकावर. खते जास्त वापरल्याने पिकातला नत्र वाढला की त्यावर किड्यांची संख्या वाढते. मग त्यासाठी किटकनाशक, खाली तणनाशक. हे वापरले की पिक थोडे दिवस मलुल होते, पिवळे पडते. मग परत खत असे चक्र सुरुच राहते.

मी शेतीशाळेला हजेरी लावते त्यात सांगतात की अमुक
दिवसांनंतर खते नको, किटकनाशके नको. इथे लिहिले का आठवत नाही पण एका भाजिपाल्याच्या शाळेत एक शेतकरी रोगग्रस्त भाजी दाखवत होता. काय काय फवारण्या घेतल्या हा प्रश्न आल्यावर त्याने चारपाच नावे घेतली. त्यातले एक नाव उचलुन तज्ञ म्हणाले की अरे हे का मारलेस? हे याला नकोच. तो म्हणाला सर आधीच्या सिजनचे शिल्लक होते ते संपवले. मी हे ऐकुन हादरले Happy

आता द्राक्षातही नैसर्गिक करणारे खुप आहेत. पण आधी जमिनीवर खुप काम करावे लागते तरच नैसर्गिक
यशस्वी होते.

शेतकरी प्रशिक्षण व्हायला हवे तरच आशा आहे. पाणी फाउंडेशनची शेतीशाळा लिमिटेड भागात सुरु आहे. आता महाराश्ट्र शासनाच्या कृपेने ती पुर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. याचा फायदा हा की यामुळे आंबोलीसारख्या जागीही कृषी सहाय्यकाला देखिल गावातल्या लोकांचे गट बनवुन त्यांना शेतीशाळेस हजेरी लावावयास लागणार. मी आंबोलीतुनच हजेरी लावली तरी ती वैयक्तिक आहे. गावाला फायदा शुन्य. मी सांगते गावच्या ग्रुपवर. पण कोणीही मला उलट रिप्लाय करत नाही.

मागे मी एकदा प्रश्न विचारला होता तेव्हा तिकडच्या तज्ञांना आण्बोलीसारख्या ठिकाणातुन कोणी बघतेय याचा आनंद झालेला. कोकण रायगड वगैरे भाग अजुन त्यांच्या रडारवर नाहीय जो आता येईल. याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल.

सुप्र वाडा.
धावपळ धावपळ धावपळ.

साधनाताई, तुझ्या पोस्टीतून वस्तुथितीला धरूनही का असेना, एक आशावादी चित्र निर्माण झालंय. देव करो आणि संबंधित सगळ्यांना सुबुद्धी होवो आणि आपली किंवा निदान पुढच्या पिढीची तरी या दुष्टचक्रातून सुटका होवो! __/\__

फोटो अपलोड होतात का पाहायला खालचा फोटो टाकलाय Happy हा गुलाब माझ्याकडे होता, तो यंदाच्या पावसाळ्यात गेला वर Sad

मला बंगळुरू भेटीत बोटॅनिकल गार्डनला भेट दिली त्याबद्दल लिहायचे होते पण मोबाईलवर फोटो टाकणे कठिण आणि माझ्याकडे डेस्क्/लॅप वगैरे कसलेही टॉप्स आता नाहीत. गोव्यात मुक्कामाचा सदुपयोग करायचा Happy

gulab.jpg

माझ्या वहिनीचे माहेर काळसे-धामापुर. गणपतीच्या चौथ्या दिवशी तिच्या माहेरी गेलो होतो. वर्षभर घर बंद असते, गणपतीत गजबजते आणि सगळे नातलगही येतात. तर तिच्या दारातच समोरच्या घराची भिंत आहे. त्यात दरवर्षी एक खंड्या घर बांधतो. त्याने पाडलेल्या भिंतीतल्या भोकांना कंटाळून शेजार्‍यांनी भोके बुजवली तर हा पठ्ठ्या बाजुला परत भोक पाडतो. ते शेजारीही मुंबैत राहतात. त्या परिसरात गणपती सोडला तर अन्य वेळी शांतता असते, आजुबाजुला उंच झाडे आणि पाच मिनिटांवर ओढा. खंड्याला राहायला अगदी फाईव स्टार जागा.

खाली बघा त्याने वेगवेगळ्या वर्षी पाडलेली भोके. उजव्या हाताला बुजवलेली भोके दिसताहेत. ज्या भोकाबाहेर शिट दिसतेय ते या वर्षीचे भोक. इथला खंड्या बहुतेक पाईड खंड्या आहे, काळापांढरा असतो तो. खुप वेळ वाट पाहुनही तो आला नाही पण आम्ही आत जेवायला गेल्यावर चटकन येऊन गेला. आणि पिल्ले इतकी हुशार की भोकाबाहेर बुड काढुन शिटतात आणि परत आत जातात. त्यांचे शिटणारे बुड एकदा दिसले. Happy घरात घाण करायची नाही हा आईने काढलेला वटहुकुम पाळतात. Happy

khandya.jpg

सुप्रभात वाडेकर्स!

क आ स?

खंड्याच्या बाळांची शिस्त वाचून खरोखर आश्चर्य वाटले!

https://www.downtoearth.org.in/agriculture/food-security-policy-formulat...
श्रीलंकेत सरकारने रासायनिक शेतीवर बंदी आणल्याने उभा राहिलेला प्रश्न आणि त्याच्यापासून भारताला काय शिकता येईल, ह्या संदर्भातील आर्टिकल.

नेपाळमधील बातम्या वाचून अस्वस्थता आली. तरुण मुलांवर गोळ्यांची बरसात. संसद जाळणे, अर्थमंत्र्यांना मारहाण, माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जाळणे.
आपल्या सुदैवाने आपण कोणीच असे निर्नायकी दिवस बघितले नाहीयेत. कधी बघायची वेळ येऊही नये.

हो अनया.. आपल्या दोन्ही बाजुंना हे असे घडतेय. मागे बांगलादेशात पंतप्रधानाच्या घरात घुसुन तिचे वैयक्तिक कपडे बाहेर काढले गेले. नेपाळात एका स्त्रीला ट्रॅप करुन जाळले. हे विद्यार्थ्यांच्या मागे लपुन कोणी दुसरेच करताहेत. भारतात असे न घडो अशी प्रार्थना!! हल्ली कुठली घटना काय वळण घेईल सांगता येत नाही.