Chinnu
| |
| Tuesday, August 28, 2007 - 2:38 am: |
| 
|
झुलेलाल कविता सहीच. ते भारावले ढग असायला हवे होते का?
|
एकटी अत्यंत गर्दीच्या रस्त्यात असते मी कधी एकटी मनांत असता आनंदी पावसांच्या धारा एकटी असूनही मलाच नसते जागा माइया आभाळा एव्हढ्या मनामध्येही......
|
Sumedhap
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:35 am: |
| 
|
तो आणी ती ती: वादळाच्या बाहेर आणली तुझी नाव किनार्यावर लावायला असेल कुणीतरी आठवण माझी आलीच तर रडुन घे थोडंसं डोळे तुझे पुसायला असेल कुणीतरी पण शक्यतो आनंदाचे क्षणच आठव मग हास्य तुझे पहायला असेल कुणीतरी कधी चांदण्यांत दिसेन मी एकटीच तुला चंद्र तुझा झाला असेल कुणीतरी मी सतत बरोबर असल्याची सवय झाली होती ना मी नसण्याचीही सवय घालुन देईल कुणीतरी मी दूर गेले असले जरी जवळ तुझ्या असेल दुसरे कुणीतरी... तो: असे नाही की तु गेल्यावर कुणीच भेटले नाही पण नाव माझी किनार्याला कधीच लागली नाही आठवण आली तुझी की जरूर रडतो मी पण अश्रुंना डोळ्यांबाहेर वाटच सापडत नाही आनंदाचे क्षण आठवुन हसतोही कधीतरी कारण आता फक्त क्षणच उरलेत, आनंद कुठेच नाही चांदण्यांत शोधत असतो तुला रात्रभर पण तु गेल्यापासुन चंद्र कधीच दिसला नाही हो, तु नाहीस माझ्या सोबत प्रत्यक्षी पण तुझे घर अजुन माझ्याच मनात आहे माझ्या जवळ कुणी आहे का ठाऊक नाही पण हे मन तुझ्याशिवाय कुणाच्याही जवळ नाही...
|
टिपूस सुध्दा दिसला नाही सुकली नव्हती आतील ओल>>. mast aahe vaibhav..
|
Mankya
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:54 am: |
| 
|
दरम्यान मनातून काय वाहते मनाकडे की म्हणूनी मन मनात वसते अस्तित्व गमवून बिंब आपले कुणाचे प्रतिबिंब होऊन हसते नेत्रमिलनातही ठाऊक नाही हे असे विशेष काही घडते मंद हसू एकाच्या नयनी जे ती स्मितरेषा दुज्याची बनते काय आठवूनी झूरते अंगण कश्याने प्राजक्तातूनी फुलते कधी बनून तरल तारांगण असे आसमंत व्यापूनी उरते तर कधी .. अनावधानाने परके बीज येऊनी अट्टाहासाने मुरते सल होऊनी रुजते आत अन शल्य बनूनी अंकुरते झडते कधी कधी पानातून हिरमुसून नकळत लवते कधी नखशिखांत बहरून ते पानापानासवे पालवते दोन डोळ्यातून .. मनातून आपापले अव्यक्त गूज वाहते नात्यास तो सुगंध अनोळखी स्वतः फूलही अनभिज्ञच राहते काय आहे दोघांच्या दरम्यान जर नात्याचा लवलेषही नाही ज्याने असे जुळले ऋणानुबंध उमगला त्याचा अवशेषही नाही ! माणिक !
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 3:05 am: |
| 
|
सुमेधा, तो आणि ती मस्तच. माणक्या, खुप सुरेख कविता... पण शेवटच्य दोन ओळी कळल्या नाहीत. समजावणार का? अवशेष उमगणे या शब्दाचा ( phrase चा) अर्थ लागत नाहीये...(माझाच बौद्धिक कमीपणा, अर्थात)उमगला अवशेष नाही ऐवजी उरला अवशेष नाही बरोबर वाटेल असे वाटतय.
|
Sumedhap
| |
| Friday, August 31, 2007 - 4:16 am: |
| 
|
धन्यवाद प्रिन्सेस......माणिक.... अतिशय सुंदर कविता आहे...शब्दरचना तर अप्रतीम...खुप आवडली मला....मस्तच..
|
Mankya
| |
| Friday, August 31, 2007 - 8:38 am: |
| 
|
खूप खूप धन्यवाद .. Princess, सुमेधा ! Princess.. तूला उत्तर मेल केलय ! माणिक !
|
अस्तित्व गमवून बिंब आपले कुणाचे प्रतिबिंब होऊन हसते >>..काय आहे दोघांच्या दरम्यान जर नात्याचा लवलेषही नाही >>. अजुन बर्याचोळी सांगता येतील. एकदम जबरदस्त कविता माणिक
|
Shyamli
| |
| Friday, August 31, 2007 - 10:40 am: |
| 
|
माणिक थीम आवडली कवितेची पण जरा लांबली का रे? थोडक्यात पण सांगता आलं असतं ना? अर्थात हे माझं मत कल्पना, खरय होतं असं ब-याच वेळा सुमेधा , लिहित रहा 
|
Vaishakh
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:15 pm: |
| 
|
वेडे मन आज पुन्हा अभाळ भरुन आले आणि मन ही भरुन आले सुर्याला ढगांनी झाकोळेले मनाला आठवणींनी हळवेकेलेले आता विजांचा होईल लखलखाट आणि आठवणीँचा होईल प्रपात आता नभ बरसतील, आणि आकाश रिकमे होईल आता डोळेही बरसतील, मन मात्र आठवणीँच्या राज्यात फिरत बसेल - वेड्यासारर्ख !!
|
Paragkan
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:26 pm: |
| 
|
मोहळ कळत नाही कशानं .. पण अचानक उठतं दिशादिशांत फेर धरत शब्दांचं मोहळ .... किती प्रयत्न करावा? किती धीर धरावा? शेवटी नाहीच लागत हाती एकही शब्द. नसेलच मिळणार तर ना सही मधाचा अंश, पण एखादा प्राणांतिक दंश तरी ...?
|
Me_anand
| |
| Saturday, September 01, 2007 - 5:33 pm: |
| 
|
टप टप टप टप वाजे पाऊस भिर भिर भिर भिर घुमतो वारा कृष्ण नभाच्या छत्रीखाली लपून बसला नाजूक तारा घरट्यामधूनी निजे पाखरू शुभ्र पिसांचा ओढून पांघर अलगद घरटे झाकून घेतो तरूवर ओढून हिरवी चादर नितळ वाहत्या जळांत फिरतो वेडा मासा गर गर गर गर नाही नशिबी भिजून गाणे मनांत त्याची एकच तडफड ओली माती द्रवून गेली खळखळ खळखळ झरून आली रंग टवटवी फुलपात्यांची हिरवी नक्शी फुलून आली अबलख अवखळ पाऊस इथला मनास माझ्या शिंपून गेला नवीन आशा, नवे धुमारे मनांत माझ्या पेरून गेला श्रावणांतल्या उन्-सरींनी न्हाऊन झालो तल्लख तल्लख गतकाळाची पुसून काजळी उजळून आलो लखलख लखलख
|
Maanus
| |
| Sunday, September 02, 2007 - 4:05 am: |
| 
|
आनंद, मस्त चालीत म्हणता येतेय कविता.. good one
|
Shyamli
| |
| Sunday, September 02, 2007 - 3:39 pm: |
| 
|
नसेलच मिळणार तर ना सही मधाचा अंश, पण एखादा प्राणांतिक दंश तरी .<<<< आहा क्या बात है!
|
Zaad
| |
| Monday, September 03, 2007 - 5:55 am: |
| 
|
बळ क्षितीजरेखा आखून त्याने मागून घेतला मेघ असा की कोसळतो जो मृगजळ केवळ निसटून जाई जांभईतुनी अन उचकीमागच्या अनामिकाचे अकारणाच्या नेत्री का'जळ' निर्मि'काचे' तसल्या पडती कवितेवरती कवडसे माझ्या; तया पाहण्या मला नसे बळ
|
Desh_ks
| |
| Monday, September 03, 2007 - 6:18 am: |
| 
|
"नसेलच मिळणार तर ना सही मधाचा अंश, पण एखादा प्राणांतिक दंश तरी ...?" वा! मस्तच!
|
Zaad
| |
| Monday, September 03, 2007 - 6:52 am: |
| 
|
परागकण, कविता आवडली... फारच सुंदर!
|
Bee
| |
| Monday, September 03, 2007 - 8:58 am: |
| 
|
praaNaantik dansh!!!!!!!!!! PK, mast aahe kawitaa... shewaT sundar kelaas..
|
Desh_ks
| |
| Monday, September 03, 2007 - 10:41 am: |
| 
|
हाय्! (मराठी) 'बी' (इंग्रजी) ने ही (मधाचा अंश न देऊ करता) कवीच्या 'प्राणांतिक दंशाच्या अपेक्षेचंच कौतुक करावं ना? बा परागकणा, आता मात्र मधाचा अंशही मिळण्याची आशा नको! ('बी आणि मध' या काँबिनेशन मधे दिसलेली ही केवळ गंमत आहे. बाकी काही नाही)
|