|
Chetnaa
| |
| Saturday, July 21, 2007 - 6:26 am: |
| 
|
" मला किती अभिमान वाटत होता तुझा. माझ्या बाबतीत जे घडले त्यातनं तू मला सावरलेस. तुझ्यासारखा नवरा मिळाला म्हणून देवाचे आभारच मानले मी. कारण कितीतरी स्त्रियांवर हा प्रसंग ओढवतो. आणि त्यांना कुणाची साथही मिळत नाही. नवरे आपल्या पुरुषी अहंकारात घराबाहेर काढायलाही कमी करत नाहीत. त्या नराधमांना धडा शिकवायचे सोडुन आपल्या बायकांना घरा बाहेर काढण्याचा सोईस्कर पुरुषार्थ तेवढा दाखवतात असे नवरे. आणि मग अशा स्त्रीची बदनामीची सुरु झालेली यात्रा बदनाम गल्ली परयंतच जाउन संपते. नाईलाजाने पुरुषांनी जिवनातुन उठवल्यावर परत त्यांच्याच मनोरंजना करिता पोहचल्या जातात घाणेरड्या वस्तीत. कारण कुणीच आधारा साठी हात दिलेला नसतो त्यांना. " " त्यावेळी मलाही माझा हा सुखी संसार इतरां सारखा उधळेल की काय? याची भिती वाटत होती. आपल्या दोघांचं हे जग हातातुन निसततय की काय? असं वाटत होतं. अस्वस्थ करणारा असुरक्षित भविष्यकाळ, मनाला शेकडो इंगळ्या एकाच वेळी डसाव्यात असा तो घाणेरडा भुतकाळ आणि या दोघांच्या मधे कसरत करणारा दोन्ही काळांची पिडा सोसणारा वर्तमान काळ. ह्रुदयात कळा सोसत काढत होते मी,फ़क्त तुझ्या प्रेमाच्या बळावर. तुला मी हवी आहे या एकाच प्रेरणेने जगायचे ठरवले मी. " "
|
Chetnaa
| |
| Saturday, July 21, 2007 - 6:47 am: |
| 
|
" तुझ्या सोबतीने या नवीन जिवनाला सुरुवात केली मी. ज्या स्त्रीयांना तुझ्या सारखे समजुन घेणारे कुनी नसतं किंवा कोणत्याही कारणाने बरबाद व्हायची वेळ येते त्यांच्या साठी काहीतरी करावेसे वाटत होते, तुझ्या सहकार्याने आनि आपल्या मित्र मंडळींच्या मदतीने, त्यांना पुनर्वसना साठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करावसं वाटत होतं. तू इतरां पेक्षा श्रेष्ठ वाटत होतास. तुझ्यावर खुप विश्वास होता. पण तुझ्या या शेवटच्या पुरुषी दंशाने माझा सारा आदर्शच कोलमडुन पडलाय. शेवटी तुही एक पुरुषच निघालास. इतरां पेक्षा चांगला पण शेवटी पुरुषच. तुझ्या सारख्या उच्च शिक्षीत आणि चांगल्या मनाच्या माणसाला देखिल हा पुरुषी अहंकार नाही झिडकारता आला. " " आणि एवढा पुरुषी अहंकार तुझ्यातही होता तर दाखवायचा होतास त्या गुंडांना हा पुरुषार्थ. तुझ्या प्रतिकाराने मलाही बळ आलं असतं. काय झाले असते जास्तीत जास्त? आपण मेलो असतो,नाहीतरी जिवंत असुन्ही मनाने मेलेलोच आहोत आपण आज. पण त्यातल्या एखाद्याला तरी मारुन मेलो असतो. समाजातील एक घाण तरी कमी झाली असती. इतरांनाही घडा मिळाला असता. का नाही दाखवलास तू तेव्हा हा तुझा पुरुषार्थ? " " ठिक आहे,तू माझ्यासाठी जे काही केलेस ते नेहमीच आधाराचे वातेल मला. पण तुझ्या मनात माझ्या शरिरा बद्दल अशी भावना असताना मी नाही तुझ्या बरोबर राहू शकणार. तुझी ती भावना झेलत आणखी विटंबना नाही करायची मला या शरिराची. त्यावरचे घाणेरडे स्पर्श तर मी धुवुन काढले पण तुझ्या मनातली ही भावना धुवुन काढणे माझ्या हातात नाही. आपला संसार असाच सुरु ठेवण्यात काही अर्थ नाही. माझ्या सारख्या स्त्रियांना आता एकमेकींनाच आधार द्यायला हवा. मी तरी माझा खारिचा वाटा उचलणार आहे. आता या पुढे तुला मझ्या साठी कसलीही तडजोड करण्याची गरज नाही. सकाळीच मी निघुन जाईल. " क्रमश्:
|
Gobu
| |
| Saturday, July 21, 2007 - 8:25 am: |
| 
|
चेतना, अभिनन्दन! खुप वेगळा, गहन आणि नाजुक विषय निवडल्याबद्दल पहीली कथा आणि तिही या complicated विषयावर, कौतुकास्पद आहे ह कथा छान आहे शेवट कसा करणार ही उत्सुकता लागलीय लवकर लिही
|
Chetnaa
| |
| Monday, July 23, 2007 - 5:27 am: |
| 
|
" थांब रिचा, असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. " " आपण असं किती काळ लटकत रहाणार सुदेश? त्यापेक्शा कुठल्यातरी टोकालाच पोहचलेलं बरं नाही का? आपण एकत्र राहू शकत नसू तर मग दोघांनाही दोन टोकांनाच जावे लागणार. " त्याने तिला पकडुन बसवले तिच्या मांडीवर डोके ठेवले व म्हणाला, " रिचा, दोन टोकांना तर आपण गेलोच होतो. आता वेळ आहे परत एक होण्याची. माझ्या मनावर पडलेला अहंकाराचा पडदा दूर झालाय. तू डोळे उघडलेस माझे. माझी चूक मला कबुल आहे. पण त्या बरोबर माझ्याही मनाच्या यतना बघ रिचा. मलाही थोडा वेळ लागेल सावरायला. त्यामुळे माझ्या कडुन तुझा अपमान झाला असेल तरी मला माफ़ी मिळण्याचा हक्क नक्किच आहे. आणि तुझ्या बरोबर हा खारीचा वाटा मीही उचलणार आहे, प्रायश्चित्त म्हणून. " " तिच्याकडे नजर उचलुन पहात तो म्हणाला, " करणार ना मला माफ़? " आता मात्र तिच्या डोळ्यंतुन धारा वाहु लगल्या. हुंदके देतच तिने मान हलवली. तसा तो म्हणाला, " अशी नुसती मान हलवुन नाही चालणार. मला तुझ्या तोंडुन ऐकायचय. " तशी ती म्हणाली, " हो रे बाबा ! " " थॅंक्यु " म्हणत त्याने तिला मिठी मारली. तशी तीही हसत म्हणाली, " असलं थॅंक्यु नाही हं चालणार. " आणि दोघेही हसली. रात्रभर त्यांची कुजबुज चालली होती. अगदी पहाट होईपर्यंत. त्यांच्या जीवनात परत एकदा सुखी संसाराची नवी पहाट उगवली होती. समाप्त? उं हुं, ही तर सुरुवात
|
Sneha21
| |
| Monday, July 23, 2007 - 6:05 am: |
| 
|
एक्दम जबरदस्त कथा..पुढिल लेखनसाठी शुभेछा
|
Manogat
| |
| Monday, July 23, 2007 - 6:17 am: |
| 
|
चेतना, छान...शेवट खुप आवडला.. keep it up
|
Ladaki
| |
| Monday, July 23, 2007 - 6:28 am: |
| 
|
शोभा छान आहे कथा... तुझ्या सगळ्या कथा लवकर लवकर मायबोलीवर टाक...
|
Daad
| |
| Monday, July 23, 2007 - 6:29 am: |
| 
|
(छ्छे! मलाच काळजी लागली होती, आता काय होतय नी काय नाही. ) गोबूला मोदक्- नाजुक विषय, पण हाताळलास अगदी संयमाने आणि balance ने ही. शेवटच्या भागात 'पुरुषी अहंकाराला' आव्हान करणारी नायिका अगदी भावली मनाला अन त्याहूनही आवडला आपली चूक प्रांजळपणे कबूल करणारा तुझा नायक. असं होत नाही खर्या अयुष्यात पण व्हावं असं आपल्यापैकी चांगल्या मनाच्या प्रत्येकालाच वाटतं. आणि तेच नेमकं अतिशय छान पकडलयस. चेतना, एक छान कथा! तुझ्या पुढच्या लेखनासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
|
Swa_26
| |
| Monday, July 23, 2007 - 6:45 am: |
| 
|
छान कथा!! त्यातुन शेवट predictable नसल्याने उत्सुकता वाढली होती. keep writing
|
Manjud
| |
| Monday, July 23, 2007 - 7:44 am: |
| 
|
चेतना, मस्तच गं. उत्सुकता एवढीच होती की नायक चूक कबूल करतो की नाही..... शेवट आवडला. इथे संवाद खुपच महत्त्वाचे होते ते तू छान फुलवलेस. हा विषयच असा आहे की त्यावर लिहायला अनेकाना हवं असतं. तुझी कथा आवडली.
|
दाद, एकदम बरोबर. मला काळई. काय होतय नी काय नाही. पण सुखांत शेवट वाचून बरं वाटलं.
|
दाद, एकदम बरोबर. मला काळजी. काय होतय नी काय नाही. पण सुखांत शेवट वाचून बरं वाटलं.
|
चेतना "सुरवात' छान आहे...
|
Manutai
| |
| Monday, July 23, 2007 - 9:26 am: |
| 
|
अभिनंदन चेतना! एक आशादायी शेवट... शेवटचे "ती" चे संवाद खुप प्रभावी आणि मनाला भिडणारे लिहिले आहेस. पुढच्या लेखनाला शुभेच्छा..
|
Amruta
| |
| Monday, July 23, 2007 - 3:30 pm: |
| 
|
छान शेवट केलास. आवडली कथा.
|
कथा छानच मांडली आहेस. असा प्रंसंग तर वैर्यावर पण येऊ नये. नुसता वाचूनसुध्दा अंगावर शहारा येतो. शेवटचे संवाद खूप आवडले.
|
Chetnaa
| |
| Tuesday, July 24, 2007 - 4:58 am: |
| 
|
दाद,स्नेहा,मनोगत,मंजिरी,नंदीनी,लाडके,स्वाती,लोपा,अम्रुता,रानी,मनुताई..थॅंक्स सर्वान्ना. तुम्ही माझी कथा वाचुन अभिप्राय दिलेत... त्यात छान छान लिहिणार्यांचे, वाचणार्यांचे इतके उत्तेजन देणारे अभिप्राय वाचुन खुप आनंद झाला. आणि प्रोत्साहन मिळाले. अशीच साथ लाभु द्या. परत एकदा सर्वांचे आभार.
|
Disha013
| |
| Tuesday, July 24, 2007 - 7:18 pm: |
| 
|
चेतना,छान आहे कथा. क्म्क न्न्ब्ज न्ब्न्क न्म
|
Vijay3845
| |
| Wednesday, July 25, 2007 - 5:56 am: |
| 
|
तुझी कथा मी आज वाचली. छान लिहितेस लिहीत राहा. तुझ्या कथेतला पुरुष शेवटी समंजसपणा दाखवतो. प्रत्यक्षात तसा तो किती दाखवत असतील? बलात्कारात स्रीचा काहीही दोष नसतो. पण पुरुषप्रधान समाजात योनिशुचितेला अवास्तव महत्त्व दिले जाते. त्यामुळे बलात्कार झाल्यावर स्रीलाही आपण अपवित्र झालो, आपल्या जगण्याला आता अर्थ उरला नाही असे वाटू लागते. कित्येक स्रिया या भावनेमुळे आपले जीवन संपवतात. आपल्या घरातल्या स्रीवर बलात्कार झाला, तर आपल्या घराण्याची अब्रू गेली असे मानून त्या स्रीची हत्या केली जाते. आपल्या देशात आणि इतरही अनेक ठिकाणी ही अमानुष प्रथा आहे पाकिस्तानातील सिंध प्रांतात या प्रथेला कारोकारी म्हटले जाते. एखाद्याचा सूड घ्यायचा असेल तर त्याच्या घरातल्या स्रीवर बलात्कार केला जातो.
|
छानच लिहीलेय. दोघांनाही सावरायला वेळ लागणारच. छान जुळवून आणलीयस गोष्ट शेवटपर्यंत. लिहीत रहा.
|
|
|