Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 21, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » सरपंच » Archive through July 21, 2007 « Previous Next »

Ajai
Tuesday, July 17, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडी ग्रामिण पार्श्वभुमी असलेली कथा लिहायचा प्रयत्न करतोय.
या कथेमधे पालघर डहाणु भागात बोलल्या जाणार्‍या आदिवासी बोलिभाषेचा वापर केलाय. त्यातल्यात्यात सम्जतील असे शब्द वापरायचा प्रयत्न केलाय.. जसा वेळ मीळेल तसा पुढचा भाग टाकीन.


Ajai
Tuesday, July 17, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चार सव्वाचारचा सुमार.. आठवड्याचा बाजार आटपुन ठक्या येसटी स्ट्यान्डावर उभा होता. कालच अंत्याशेटनी खर्चि दिलि होती.त्यामुळे खिसा तसा गरम होता. ठक्या अन्त्याशेट्च्या विट्भट्टीवर भटकर. ठक्या आणि शांती दोघेही विट्भट्टीवर कामाला. शेतीकामा पेक्क्षा थोडे बरे पैसे मिळत असल्याने विटभट्टी कामकडे वळ्लेल्या आदिवासी जोडप्यांपैकी येक.
येसटीला तसा तासभर अवकाश होता. आता तासभर वाट पहाण्यापेक्शा मेनरोडवर येखादा ट्रक मिळतो का पाहाव म्हणुन ठक्या स्ट्यान्डाबाहेर आला. तोंडावर धुर सोडुन ट्रक जात होत्या पण कुणी थांबायला तयार नव्हता.
मनातल्या मनात दोनचार शिव्या देण्याशिवाय तो काहिच करू शकत नव्हता. वेळ काढायचा म्हणुन तो धुर काढत बसला. विडिचे झुरके मारता मारता त्याला scorpio येताना लांबुन दिसली. बापु पाटलाची गाडी त्याने लगेच ओळखले त्याच्या गावचा मोठा माणुस.गावची शेतकरी सोसायटी त्याच्याच ताब्यात. पंचायत समिती, कृषी ऊत्पन्न बाजार समितीवर दोनचार पदं पण खिशात होती.पंचक्रोशीत पत असलेला राजकारणी.
बापु पाटलाने गाडी थांबवली.ठक्याला थोडं आश्चर्यच वाटलं.
"काय र ठकाजी, कोढ आलतास?' scorpio चा दरवाजा उघडतं बापु पाटलानी विचारले.
ठक्याला धक्यावर धक्के बसत होते. पहिला धक्का पाटलाने गाडी थांबवली. दुसरा धक्का त्याला चक्क ठकाजी म्हणुन हाक मारली.
"इकड्च बाजारात आलतु"
"चल बस गाडेत..सोडताव तुला गावात"
ठक्याचा स्वत:वर विश्वास बसत नव्हता.
" अर ठेव पिसव्या मंघारचे शिटवर, ना पुढ ये" त्याल गोंधळलेला पाहून बापु पाटील म्हणाला.
जरासा अवघडुनच ठक्या गाडित बसला.
"मंग कोणाकड कामाला हायेस अवंदा?" क्लच सोडता सोडता पाटलाने विचरले.
"अंत्याशेटकड"
गीअर shift करता करता पाटील विषय पण बदलत होता.
.....
"ठकाजी पुढचे महिन्यात मता येत्यान" पाटलाने इलेक्शन जवळं आल्याच सान्गुन मुद्याला हात घातला.
"तुलाच देव मता आम्हि.कोढ शिक्का टेकवाय्चा त्या सान्ग" पाटील मेहेर्बान व्हायचे कारण ठक्याला कळल होतं.
"अवन्दा मी नी रेहायचु उभा"
"मंग तु सान्गशील त्याला देव मता" ठक्याला डोळ्यासमोर पन्नास रुपये आणि बाटली दिसायला लागली होती.
"ठकाजी, तु रेहेतोस का उभा?" समोरचा खड्डा चुकवत पाटलाने विचारले
"कोन मी?" ठक्या dashboard वर आपटता आपटता राहिला.
"मंग काय झाला. तुम्हाला पन चानस दिया पायजं ना"
गावी पोचेपर्यन्त ठक्याला पाटलाने बरोबर घोळात घेतले.
"बायलसला विचार ना सांग माना" बायकोचा सल्ला घ्यायला सांगुन पाटलाने ठक्याला उतरवले.
scorpio दिसेनाशि होईपर्यन्त ठक्या पुतळ्यासारखा उभा होता.



Sanghamitra
Wednesday, July 18, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय interesting सुरूवात!.
हं मग पुढे काय झालं?


Bee
Wednesday, July 18, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, छान झाली आहे सुरवात..

Ajai
Wednesday, July 18, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"यी आपाली कामा नीही.दोन घास सुखान जात्यान पोटात त्याच बस झाला आपल्याना" शांतीने टीपिकल बायको प्रमाणे विरोध केला.
"पन बापु पाटेल ओढा सांगतो त....." पिशवी सोडुन ठक्याने वड्यांचा पुडका शांतेकदे दिला.
"त्याचा काय जातं सांगाय..पैसं काय त्याचा बास देल तुला" शान्ती फ़िस्कारली.
बापु त्याचं कस भल करेल, सगळ खर्च उचलेल, अंत्यशेट्ला ही समजावेल्-ठक्याने हळुहळू तीला सगळं समजावल.
"जा तुल्हा कारायचा त्या कर माना नको सान्गु" त्रासिकपणे का होयीना शान्तिने होकार भरला.
पड्त्या फळाचि आज्ञामानुन ठक्या बापुच्या घरि पोचला. बहुतेक पाटील पण त्याला expect करत होता कारण येव्हड्या उशिरा रत्रि ग्रामसेवक संखे पाटलांबरोबर होता.
"ये ठकाजी बस. संखेसाहेब हा ठकाजी" पाटलाने ओळख करुन दिली.
ठकाजी पाटलासमोर उकिडवा बसला.
"अरं वरत खुर्चेत बसं असा खालतं क्या बसतोस.."
"मंग काय ठरवलास?"
"आथा तु सांगतोस तं तुला निही सांगन का मी?" ठक्याने आपली रजामंदी जारी केली.
"चला संखेसाहेब उद्या ठकाजिचा form भरुन टाकु"
" हा ठिक आहे बापु. पण याच्या जातीचा दाखला आहे का?" पाटलाला हवा तसा राखिव उमेदवार मिळाला पणं ग्रामसेवकाने मधेच हे जातीच्या दाखल्याच खुस्पट काढले.
ठक्याला हे जातीच प्रकरण मधेच का उपटल ते कळत नव्हते.
"संखे हे पेपर कसे उभे कराय्चे हे तुम्हाल नावीन आहे का? लागलं तर राहुलला बरोबर घ्या बरोबर आणि काम पुर करा"
राहुल, पाटलान्चा मुलगा, पाटलांच्या बर्‍याच जबाबदा-र्‍या हल्लि तोच साम्भाळायच. त्यने आणि संखेनी दोन दिवसात दुसरित शाळा सोडल्याच जुना दाखला Affidavit तयार केली आणि ठक्या "ड" राखिव वॉर्डातुन उभा राहीला.
अपुर्ण...


Mahe
Wednesday, July 18, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, खुपच छान सुरुवात केलीय..
पुढचा भाग लवकर टाक..

भाग्यश्री


Ajai
Thursday, July 19, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छाननी पार पडली. ठक्याच्या विरोधात आणि दोन उमेदवार उभे केले गेले होते. आता बापुच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. त्यातुन गावचे सरपंचपदही राख़िव असलयाने मर्जीतला माणुस निवडुन आणणे गरजेचे होते. बाकिच्या ३ जागा बिनविरोध झाल्याने majority चि चिन्ता नव्हती पन ही जागा निवडुन आलि तरच पन्चायत हातात रहाणार होती.
साधी ग्रामपंचयतीची निवड्णुक. पण राहुल आणि बापुने पक्कि मोर्चेबांधणी केली.संखे सरकारि माणुस,पण पडद्याआडुन जमेल तशी मदत तोही करत होता.जसजसा निवडणुकीचा दिवस जवळ येवु लागला तसा प्रचारही रंगु लागला.
कोंबड्या,बाटल्या आणि पैसा पाण्यासरखा वाहत होता.पाटलाने वजन वापरुन तालुक्याची नेतेमंडळीही गावात आणली प्रचाराला.कुणाला नात्याची तर कुणाला उपकारांची आठवण करुन दिलि गेली.या अख्या गदरोळात ठक्या मात्र गोंधळलेलाच होता.उमेदवार म्हणुन तो हात जोडत असला तरी खरी लढाई पाटलाचीच होती
प्रचारच्या शेवटच्या दिवशी तर अगदी नाशिक बाजा बरोबर ठक्याची मिरवणुक काढली.पांढरा झब्बा लेंगा, गळ्यात हार आणि बाजा.ठक्याचा तो अवतार पाहुन शांतीही सुखावली.त्यांचा पाट लागला तेव्हाही तो येव्हडा सजला नव्हता.
संध्याकाळ्पासुन आचारसंहिता लागु झाली.प्रचाराचा धुराळा खालि बसला.उद्याचा दिवस तसा शांततेचा जाणार आणि परवा मतपेटीत ठ्क्याचे भवितव्य आणि पाटलाची प्रतिष्ठा बंद होणार.
अपुर्ण....


Ajai
Thursday, July 19, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मतमोजणि तालुक्याच्या गावी होती. राहुल आणि कंपनी मतमोजणी केंद्रावर सकाळ्पासुन हजर होते. बाकिच्या गावांच्या मतमोजण्याही होत्या त्यामुळे दुपारनंतरच निकाल कळणार होता.
बापु पाटील मात्र घरिच थाम्बला. नाहि म्हटलं तरि बरिच दगदग झालि होती.थोड्या श्रमपरिहारची गरज होतीच.
ठक्या आणि शान्तिही आज विटभट्टीवर हजर झाले. बरेच दिवस खाडा झाला होता. ती कसर भरुन काढायला जरा जास्तच काम कराव लागणार होतं
त्याच्या मनात निकालाची धाकधुक होतिच.त्यामुळे हात चालत नहतेच. सकाळपासुन शंभरवेळा तरि त्याने शान्तेला "काय होल ग? मी जिखन का?" म्हणुन डोकं खाल्ले. दुपारचं जेवण कसबसं पोटात ढकललं.
जसजशी सन्ध्याकाळ जवळ यायला लागली तसतसा ठक्याचा धिर सुटु लागला. त्याला धिर देवुन देवुन शांतीही वैतागली "ज्या होल त्या होल.जिखुन आलास तरि विटापाडायचा सुटायचा निहि आपला. गप काम कर"
हिरमुसला होऊन ठक्या परत कामाला लागला पण चित्त थार्‍यावर नव्हते. राहुल बरोबर तालुक्याला गेलो असतो तर बरं असं वाटुन गेले.
"ठक्या ये ठक्या बापु पाटलानं घरा बोलवलाय तुला." बांधावरुनच येका शेम्बड्या पोराने आवाज दिला. "लगेच बोलवलाय" परत पळताना ते पोरगं बजावायला विसरल नाही.
नाक्कि काय झालय ते कळायला मार्ग नव्हता. चिखलाने भरलेले हातपाय धुवुन तो पाटलाच्या घरि निघाला. रस्त्यात पावलागणिक स्वत्:ला दोष देत तो बापुच्या घरि पोचला.
घरात बरिच गर्दि होती. त्या गोंगाटात ठक्याने दबकतच पाटलाला रामराम केला.
"ये सरपंचा ये" पाटलाने ठक्याला पेढा भरवला.
ठक्याच्या कानावर विश्वास बसत नव्ह्ता. तो नुसता निवडुन आला नव्हता तर पाटिल त्याला सरपंच बनवणार होता.
बहुमत हातात असल्याने ठरवाचे सोपस्कार आठवडाभरात आटोपले की ठ्क्या सरपन्च बनणार ही काळ्या दगडावरची रेख होती. बातमी कधि येकदा शांतीला सान्गतो असं त्याला झालं पण पाटलानेच त्याचा ग्लास भरला.मोहाच्या दारुची सवय असली तरी हि ईन्ग्लीश दारु त्याच काळिज जाळितचच पोटात गेली.
अपुर्ण..


Arun
Thursday, July 19, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त वेग घेतेय रे कथा .......... :-)

Daad
Thursday, July 19, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदीच न रहावल्याने लिहितेय (मध्येच पचकतेय), अजय!
असा भाषेचा बाज, कथेचा ओघ संभाळणं कठीण आहे. छानच चाललय!


Ajai
Friday, July 20, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरपंच झाला तरी ठक्या शांतीच्या आयुष्यात फारसा फरक पडला नाही. हातावर पोट असलेली माणसं. नुसत्या पदाने थोडेच पोट भरणार..
नाही म्हणायला गाव त्याला ठक्या ऐवजी 'सरपंच' म्हणायला लागला.त्यात कुत्सीतपणाचाच भाग जास्त.
सरपंच म्हणुन मीटिंग ला हजर राहाणे, संखे ग्रामसेवक सागेल तिथे अन्गठा तेकवणे येव्हड्यापुरतेच त्याचे सरपंचपण. मीटिंग्मधे "घरकुल योजना" "निराधार योजना" "दलितवस्ती सडक योजना" "कृषी पंढरि" "पाणीयोजना" असे शब्द कानवर पड्त पण नक्कि कुणाला या योजनांचा फायदा होणार हे संखे राहुल आणि बापु ठरवणार,ठक्यामात्र अंगठ्यापुरता.
वर्षभरात संखेची सायकल जाऊन हीरोहोन्डा आली.बहुतेक कामांची कंत्राट राहुललाच मिळायची.त्याचही बरं चालल होत.ठक्या हे सगळ बघत होता काहितरि चुकतेय हे त्याला कळ्त होतं पण तो असाहय्य होता.
येका मीटिंग मधे ग्रामसेवकाने नविन सरकारि योजना जाहिर केली. "स्वाभिमान" योजना. या योजनेत शिफ़ारस करायच्यांची यादि त्याने ठक्यापुढे केली.
"क्याची योजना हाये?" ती यादि बाजुला सारत ठक्याने सन्खेला विचारले.
"ही स्वाभीमान योजना.यात भुमीहिनाना सरकार जमिनीचा तुकडा देणार जेणेकरुन तो स्वाभिमानाने जगु शकेल"
"फार भारि योजना हाये यी कोनाकोनाचि नावा लिव्लयास ते यादेत?"
"पाटलानी बवलेय ती यादी तु फ़क़्त अन्गठा लाव" संखे ठक्याच्या कानाशि लागला.
"तरिपन नावा वाचशील का निही.." ठक्या कधिनव्हे तो आज थोड्या चढ्या आवाजात बोलला.
नाइलाजाने संखेनी यादि वाचायला सुरुवात केली. बहुतेक सगळे पाटलाच्या मर्जीतले.
"मी अन्गठा देयाचु नी" ठक्या ठामपणे म्हणाला.
"पण..." संखे आणि बाकिच्या मेंबरांसाठि हे नविनच होते.
"पण बिन काही नी मी सान्ग्ताव ती नावा लिव" ठक्याने संखेचि यादि टरकावली.
"आखे वर्सात पाहेत आलाव. रस्ता हरिजन पाड्याचे नाववर पन जातो कोठुन तर पाटलाचे शेतावर्श्या,घरकुला मन्जुर गरिबाला पन रेहेतो दुसराच कोनि. अर सरकारि पैसा गरिबापर्‍ह्यात पोचलं का नाहि. पाटलाच लाख उपकार अस्तील आम्चेवर पन याचे पुढ मी सान्गल त्यालाच फायदा मिलाय पाहिज"
ठक्या बराचवेळ पोटतिडिकेने बोलत होता. त्याला थांबवायची कुणातच ताकद नव्हती.त्याचा स्वाभिमान जागा झाला होता आणि यापुढे तो नामधारि सरपंच नसणार होता.

समाप्त



Ladaki
Friday, July 20, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान लिहिलीये कथा... पण अलीकडे असे 'ठक्या' फ़क्त गोष्टीतच शिल्लक राहिलेत असे वाटते... एनीवेज... आम्ही पुढच्या कथेची वाट बघतोय...

Psg
Friday, July 20, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्म्म. सकारात्मक शेवट आवडला.

Rani_2007
Friday, July 20, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली... विशेष करून भाषेचा बाज.

Dhoomshaan
Friday, July 20, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं, अजुन खेडेगावात हिच परिस्थीती आहे.
आणि अजय, ती तु अचूक मांडली आहेस.


Ravisha
Friday, July 20, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेगळा विषय,वेगळी धाटणी जमून आलं आहे अजय सगळं...
पण मला सांग तुला कसा माहिती ह्या भाषेचा बाज?- एक सहज प्रश्न.


Marhatmoli
Friday, July 20, 2007 - 6:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा खुप आवडलि पण शेवट थोडा घाईत झाला अस वाटल. ठक्याचा स्वाभिमान हळुहळु प्रसांगानुसार जागृत व्हायला हवा होता.

Ajai
Saturday, July 21, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ravisha - मी मुळचा पलघरचा.माझि अजुनही तिथे शेति आहे आणि आम्च्याकडे कामाला असलेल्या आदिवासिन्शी त्याच भाषेत बोलाव लागत. त्यामूळे ती बोलिभषा मी अस्खलितपणे बोलु शकतो.
Marathmoli खरय्- मी लिहायला सुरवात केलि तेव्हा positive शेवट डोक्यात नव्हता. त्यामुळे थोडि गडबड
झालिय.
मुळचा शेवट थोडक्यात असा होता- ठक्या हळुहळु नाइलाजने भ्रष्टाचारत सामिल होतो पुढे बरबटत जातो. ५ वर्ष सम्पता सम्पता पाटिल तहसिलदाराकडुन गावला आणखि येक्दोन पाडे जोडुन घेतो आणि त्यामुळे सरपन्च्पदाचे reservation जावुन "open" category मधेय येते. अर्थातच ठक्याला उमेद्वारि न देता next election ticket र्‍अहुलला मिलल्ते आनि ती त्याच्या राजकिय कर्किर्दिचि सुरुवात आणि ठक्याचि शेवट ठरते. हा शेवट जरि खराखुरा वाटला असता तरि लिहायचा कन्टाळा आल्यमुळे छोटासा गोड शेवट केला.
मुळ शेवट डोक्यात ठेवुनच राहुल चे character कथेत plan केले होते.
धन्यवाद.


Zakasrao
Saturday, July 21, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय अजय कथा जमली आहे वाचताना कविता महाजन यांच्या "ब्र" ची आठवण आली.तु जिथे कथा संपवली आहेस तिथुन एक नवीन सुरवात होते खरतर आणि तिथुन पुढचा लढा ब्र मधे मिळतो वाचायला. तिथे ही समस्या फ़क्त महिला सरपंच आणि बाकीचे लोक अशी आहे. रब्बर स्टॅंप सरपंच निवडणे ज्याला काही माहीत नसत आणि त्याला हव तस वागवणे,त्याने विरोध केला तर त्याला वेगवेगळ्या मार्गाने छळणे,ते ही नाहीच जमले तर अविश्वासाचा ठराव आणुन त्याला पदावरुन काढणे असे बरेच प्रकार असतात खरतर. आता ह्या कथेचा भाग २ यायला हरकत नाहिये. :-)

Ajai
Saturday, July 21, 2007 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास गावपातळीवरच्या राजकारणावर भाग काय पुर्ण कादंबरी लिहता येईल पण त्यासाठी लेखकसुद्धा तेव्ह्ढ्याच ताकदिचा हवा. माझ्या तोकड्या लेखणी पलिकडचे काम आहे ते.
तु उल्लेखलेली कथा मिळवुन नाक्की वाचेन





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators