Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 18, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आषाढ » कथा कादंबरी » Navee pahaT » Archive through July 18, 2007 « Previous Next »

Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहाटे पहाटे थंडी फ़ारशी नसुनही बोचरी हवा मात्र खिडकीवाटे आत येत होती.त्यामुळे रिचाची झोपमोड झाली. पायाजवळ पडलेली चादर खेचुन,गुरफ़टुन परत झोपली. अर्धवट जागी अर्धवट झोपेत ती काही वेळ पडुन राहिली. झोप लागेल म्हणुन वाट पहात.पण झोप लागण्या ऐवजी हळुहळु तीला जाग मात्र येउ लागली. लोळुन कंटाळा आला तशी ती उठलीच. शेजारी सुदेश अगदी गाढ झोपला होता.झोपेत एखाद्या लहान निरागस मुलागत भासला तिला तो.त्याच्या अंगावरचे बाजुला सरकलेले पाघरुण नीत करुन तिने अलगद त्याच्या केसांतुन हात फ़िरवला. आणि त्याची झोपमोड होउ नये म्हणुन आवाज न करता हळूच दार उघडुन बाहेर आली.
घड्याळाकडे सवयीने नजर टाकली तिने.पावणे पाच झाले होते. फ़ारच लवकर उठली होती ती.फ़्रेश होउन ती टाईमपास करण्यासाठी तिच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे बाल्कनित टांगलेल्या झोक्यात येउन बसली.शाल पांघरुन शरिराची मुटकुळी करुन बोचर्‍या हवेत असे बसुन छान विचारांत हरवायला आवडे तिला.
बाहेर अजुन अन्धार होता बराच. पण म्युनिसिपाल्टीच्या दिव्यांचा
संमिश्र उजेडही पसरला होता.


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुनच एखादा दुधवाला सायकलचा खड्म खड्म आवाज करत जात होता. पेपर वाटणारी पोरे पेपरचे गठ्ठे घेउन जात होती. मधेच एखादे कुत्रे दुसर्‍या कुत्र्यावर उगीचच भुंकत होते. लवकर कमावर निघालेला एखादा चाकरमानीही द्रुष्टीस पडत होता. मोठमोठ्या बिल्डींग मधली,काडेपेट्यां सारखी दिसणारी बरीच घरेही अजुन पहाटेच्या गोड साखर झोपेत होती. तरी बाहेरचे हे व्यवहार सवयीने पार पाडले जात होते. या झोपलेल्या आणि जागलेल्या जगाच्या मधे ती मात्र एखाद्या तटस्था प्रमाणे बसुन हे सर्व अनुभवत होती.
तिला चहाची तलफ़ आली.ब्रुश करुन चहाचा वाफ़ाळता कप घेउन ती परत येउन बसली. आणि चवीचवीने चहाचे घोट घेत घेत ती चवीचवीने आपल्या तीन वर्षांच्या संसारचा आढावा घेउ लागली.सगळीकदे अगदी सुखच सुख विखुरलेले दिसले तिला. या अश्या सुखद आठवणींत बर्‍याचदा ती एकटी असली की शिरत असे.या आठवणींनी चिंब न्हाउन समाधानाने परत बाहेरच्या जगात स्वत: ला झोकुन देत असे.
आजही ती त्या आठवणींत हरवुन गेली. सुदेशने तिला मागणी घातली तो दिवस आठवायला तर खुप आवडे तिला.


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काॅ लेज च्या त्यांच्या खास ग्रुप मधे सुदेशही होता.मैत्रीत,हसण्या खिदळण्यात,अभ्यासात दिवस छान चालले होते. वर्ष केव्हा संपत होते कळतही नव्हते.
आधी तिला सुदेश बद्दल तसे काही जाणवलेही नाही.पण मग एक दिवस अनुने तिची छेड काढली. झाले असे होते की आदल्या दिवशी सर्व पिक्चरला जाणार होते.तिला घरगुती समारंभाला जायचे असल्याने ती जाणार नव्हती.आणि आज काॅ लेजला येताच अनुने तिला पकडले.
"काय गं तु पिक्चरला नाही आलीस म्हणुन त्या बिचार्‍याचा पण पिक्चर बुडवलास ना? "
" कोण हा बिचारा आणि मी कशाला त्याला पिक्चर बुडवायला सांगु?"
"अहाहा काय पण वेड पांघरुन पेडगावला जाणं चाललंय तू आली नाहीस म्हणुन बिचार्‍या सुदेशचाही पिक्चर बुडाला ना !"
" सुदेश आला नाही पिक्चरला? पण तू त्याचा अरोप माझ्यावर का म्हणुन लावतेस? असेल त्याला दुसरे काही काम,नसेल आला म्हणुन.... "
ओ मेरी भोली भाली लैला तू पिक्चरला नाही येणार कळल्यावर तुझा मजनू कशाला येइल मग? " आता मात्र तिने रागाने अनुच्या पाठीत धपाटा घातला.
" काय बरळतेयस मुर्खासारखी तुझं काय डोकं फ़िरलय? सुदेश आपला किती चांगला मित्र आहे."
तशी पाठ चोळतच,थोडी दूर होत अनु ओरडली,
" अयाई गं! मारतेस काय? जे दिसते ते मी सान्गितले. हे बरे आहे, लैला मजनू तुम्ही,मार खायचा आम्ही."
" आता जास्त बडबडलीस तर अजुन मारीन. "
" अच्छा? खुशाल मार.पण त्याने काही सत्य बदलणार नाही. तू बावळट आहेस. तो इतका मरतोय तुझ्यावर आणि तुला काहीच कल्पना नाही? की नाटकं करतेहेस आमच्या समोर ?"
रागाने ती अनुल मारायला लागली तशी अनु तिला चिडवत दूर पळाली. रिचा रागात बडबडत होती...
" थांब सैतान कुठली! सापड माझ्या हाती,मग मात्र तुझी सुटका नाही........"
" तशीही तुझ्या हाती सापडल्यावर कुणाची सुटका होणं शक्य नाही. ' मागुन आवाज आला तशी ती गर्रकन वळली.


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समोर सुदेश उभा होता. ती एकदम त्याच्यावरच ओरडली.
" तू ही तिचीच बाजु घेतोस.... " परंतु अचानक गप्प बसली त्याच्याकडे पहाता पहाता. आज प्रथमच तिला त्याच्या नजरेतील वेगळेपण लक्षात आले होते. तिला काय करावे ते न सुचुन ती तशीच चुळबुळत उभी राहिली. त्याने तिचा हात पकडुन बाजुच्याच झाडाखाली नेऊन बसवले व तोही तिच्या बाजुस बसला.
" रिचा,मी ऐकलय तुमचे सर्व बोलणे. "
" बघ ना, ती अनु काहीतरीच बडबडत होती..... " ती कशीबशी म्हणाली त्याची नजर चुकवत.
" काहीतरीच नाही रिचा,खरं तेच बोलत होती अनु. बरं झालं,त्यामुळे मी आज तुझ्याशी बोलायची हिम्मत करु शकतोय.. तू येणार नाही कळल्यावर काल मीही नाही गेलो पिक्चरला. तुझी सोबत नसेल तर पडद्यावरची ती चित्रं बघण्यात काय अर्थ? त्यापेक्षा घरीच थांबलो मी तुझा वीचार करित.तुझ्याशिवाय कुठेही नाही जाऊ शकणार मी आता. तुझ्या शिवाय जगणं शुन्य वाटते. मला तू खुप आवडतेससं समजू नकोस की तुझ्या सौंदर्यावर भुलुन मी हे वर वर बोलतोय. तुझ्यातली जी 'तू' आहेस ना? तिच्यावर करतोय मी प्रेम. लव यू रिचा. रिचा,माझ्याशी लग्न करशील? "
अगदी आश्चर्याने तिने त्याच्याकडे पाहिले. एव्हढ्या अनपेक्षित पणे तो चक्क मागणी घालेल असं तिला अजीबात वटले नव्हते.ती गप्पच होती. तोच म्हणाला,
" हरकत नाही तु वीचार करुन उत्तर दे.मी तुझ्यावर प्रेम करत असलो तरी तुझ्या मनात काय आहे ते महत्वाचे. पण मी मात्र पूर्ण विचार करुनच तुला विचारलय.तू होकार दिलास तरी आपले हे शेवटचे वर्ष पूर्ण करुन स्वता:च्या पायावर उभे राहुन मगच आपण लग्न करुया. ये आता मी तुझ्याशिवाय नाही राहु शकणार..... "
ती तशीच शांत बसली होती.तिला काहीच सुचत नव्हते. त्याने तिचं अवघडलेपण जाणले. तिला एकान्तात स्वता:ला सावरता यावे म्हणुन तो उठला व निघून गेला.


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो गेला तरी ती बराच वेळ तशीच बधीर बसुन होती.य अनपेक्षीत धक्क्याने ती गोंधळली होती तशीच सुखावली पण होती. त्या नशेतच तरंगतच ती घरी आली.
........................................
हळू हळू जेव्हा तिच्याही लक्षात आले की,ती पण त्याच्या प्रेमात पडलीय,तेव्हा मात्र तिने वेळ न घालवता त्याला सांगुन टाकले.
तिच्या वाढदिवशी तिनेच ही गोड गिफ़्ट दिली त्याला.
मधली वर्षे एकमेकांच्या सहवासात,फ़्रेंड्स काॅलेज परीक्षा कसे गेले कळलेच नाही..
दोघेही नोकरीला लागले नि पहिल्या मुहुर्तावर लग्न आटोपले.
दीवस कसे मजेत,सुखात भरभरुन चालले होते.
कर्क्कश्य पणे दारावरची बेल वाजली.तशी ती तंद्रीतून बाहेर आली.
..........................................
आजही तिचा वाढदिवस होता. आणि सुदेशने दरवर्षी प्रमाणे या वेळीही जय्यत तयारी केली असणार,म्हणुन ती स्वत:शीच हसत त्याला उठवायला गेली.
क्रमश्:


Bee
Tuesday, July 17, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली लिहिते आहेस चेतना..

Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी.... थक्स :-)
पण जरा मोठी आहे कथा,वेळ लागतोय लिहायला... :-)


Daad
Tuesday, July 17, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, छान रंग भरतेयस. मजेत, तब्येतीत येऊदे!

Ana_meera
Tuesday, July 17, 2007 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली आहे कथा. २-३ भाग की daily soap ?


Aamya
Tuesday, July 17, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेताना सुरवात तर भलतीच चांगली शे. चालु दे आसच.

Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद, बी,अनघा.... ठांकु.... :-)
थंक्यू आले वाटते लिहिता थॅंक्यू... :-)
तुमच्या प्रोत्साहनाने लिहिते लवकर...
म्हणजे अनघा म्हणते तसा डेली सोप नाही होणार.... :-)
सर्वर चा प्राॅब्लेम येतोय मला...
म्हणुन थोडे थोडे लिहुन पोस्ट करतेय...


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती त्याला उठवायला गेली,तर बेड रिकामा.तिने बाथरुम मधे पाहिले तिथेही नव्हता.इतक्यात मागुन त्याची मिठी पडली.तिच्या कानात हळुच शब्द आले...
" हपी बर्थडे डीयर, वढदिवसाच्या खुप,खुप,खुप,खुप,खुप,... "
खुप खुप ची गाडी संपतच नव्हती.तशी ती म्हणाली,
" पुरे पुरे, खुप खुप ची गाडी थांबणार कधी? "
" माझं मन भरल्यावर. मला तुला खुप खुप.. "
" झालं परत सुरु? '
" अच्छा बाबा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !"
" थंक्यू चल सोड आता. चहा ठेवलाय गसवर.. "
"ऊं हुं असं थन्क्यू नाही चालणार. माझं नेहमीचं किसवालं थंक्यू दे. "
" बिल्कुल नाही. "
" मग मी पण नाही सोडणार. रहा अशीच माझ्या मिठीत. मला बरंच आहे म्हणा."
" अगं आई गं! " ती जोरात ओरडली. तसे दचकुन तिला सोडत तो म्हणाला,
" काय गं,काय झालं? " तशी किचनकडे पळत ती म्हणाली,
" काही नाही,तुला ठेंगा. " तो पण तिच्या मागे येऊ लागला तसं दारातच तिने त्याला ढकलले.
" आधी आवर पाहू, उशीर होतोय. मी नाष्टा लावते तोवर. " बाथरुम कडे जात तो ही हसत म्हणाला,
" अच्छा बघुन घेइन रात्री. " मान उडवुन हसतच ती पण किचनमधे गेली.


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीप्रमाणे आजचा पूर्ण दिवस ते बाहेरच भटकणार होते. जेवण,समुद्रावर भटकणे,संध्याकाळचा शो,नंतर परत डीनर... भरगच्च बेत.
ती त्याने आणलेली गर्द जांभळ्या रंगाची साडी नेसली. त्याने स्वत: तिच्या केसांत गजरा माळला आणि पेढा भरवत परत एकदा विश केलं.
त्याचं आवरलं तरी रिचाची आवरा आवर सुरुच होती. शेवटी वैतागुन तो गाडीत जाउन बसला आणि जोरजोरात हाॅर्न वाजवायला लागला. तशी लगबगीने धावत, ओरडतच रिचा गाडीत येउन बसली.
" काय डोकं फ़िरलय का तुझं सुदेश सर्व सोसायटी डोक्यावर घेतोहेस हाॅर्न वाजवुन."
" मग काय करणार? त्याशिवाय तू लवकर येतच नाहीस. आणि जोपर्यंत तू येउन अशी माझ्या जवळ बसत नाहीस तो पर्यंत माझा जीव कसा खालीवर होतो बघ. ' तो गमतीनं म्हणाला.
" चल जास्त फ़ेकु नकोस. '
" फ़ेकत नाहीये हे बघ,हा असा माझ्या ह्रुदयावर हात ठेव. बघ वरखाली होतय की नाही? " तिचा हात आपल्या छातीवर ठेवत तो म्हणाला.,
" आॅ पण हे काय? तू जवळ आल्यावर आणि असा हात ठेवल्यावर ह्रुदय तर बंद पडेल असं वाटतय..... " त्याचा हात झटकतच ती म्हणाली,
" शीऽऽ काहीतरी अभद्र बोलु नकोस. आणि आता ही स्तुती सुमनेही जरा गुंडाळून ठेवा तुमच्या ह्रुदयात किंवा खिशात अणि निघा. आता नाही का होत उशीर? '
" चला अरेरे इतकी स्तुती सुमने वाहिली ती वायाच गेली म्हणायची? गोड हसु नाही मिळलं बदल्यात. मघाशी पेड्ग्याने तोंड गोद न करता..."
तसे डोळे वतारतच रिचाने त्याच्या तोंडावर बोट ठेवले व म्हणाली,
" आता चलतोस की उतरुन जाऊ मी परत? जसे काही नवीन लग्न झालय आसाच वागतोहेस. "
" अगं अजुन तीनच तर वर्षे झालीहेय. त्यामुळे लग्न जुनं व्हायला तीनावर एक शुन्य ठेवावे लागेल आणि तेव्हा सुध्दा तू मलाइतकीच नवी नवी वातशील."
" झालं सर्व बोलुन? तुझं प्रेम्पुराण संपलं असेल तर आपण निघुया? " ती लटक्या रागात बोलली.
" जशी आपली मर्जी ." म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली.
.


Chetnaa
Tuesday, July 17, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होटेल मधे जेवण करुन दोघेही बीच वर पोहचले. फ़िरता फ़िरता दोघही पुर्वीचे दिवस आठवुन रोमांचीत होत होते. काॅलेजची मजा लग्न झाल्यावरची ही सुखाच्या लाटेवरची भुरर्कन उडुन गेलेली तीन वर्षे, एकमेकांच्या प्रेमात, लटक्या रुसव्यात कशी संपली कळले देखील नव्हते.
.................
पिक्चर रात्री साडेनऊ वाजता सुटला. परत जेवण वगैरे करुन ते सावकाश निघाले. भटकण्याच्या नादात ते शहरात आले होते. आता त्यांना उपनगरात परतायचे होते. दिवसभराच्याअ गंमतीचा आढावा घेत ते चालले होते आरामात.
.....................
पुढे मात्र रस्ता सामसुम वाटत होता.पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत इकडुन तिकडे पळत होत्या.दूरवर काही दुकाने पेटलेली दिसत होती. अचानक हे सर्व काय सुरु झालय त्यांना कळेना. तेवढ्यात एक पोलिसांची जीप त्यांच्या जवळ येउन थांबली. त्यांनी सुदेशला ताबडतोब गाडी मागे वळवायला सांगितले. त्या भागात अचानक संध्याकाळी क्षुल्लक कारणावरुन दंगल उसळली होती.त्यामुळे तिथे संचार बंदी लागु करण्यात आली होती. दंगलखोरांची धरपकड सुरु होती. पण तेही लपुन लपुन हल्ले करित होते आणि गायब होत होते.सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती.
क्रमश्:


Ravisha
Tuesday, July 17, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा चेतना,विनोदी साहित्यातून प्रवेश करुन आता कथा-कादंबरी मध्ये सुद्धा जम बसला आहे...छान छान!!!

Chetnaa
Wednesday, July 18, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद,रविशा...
करते प्रयत्न तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने... :-)


R_joshi
Wednesday, July 18, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना कथा खुपच छानच आहे:-) पुढचा भाग लवकरच येवु दे.

Manogat
Wednesday, July 18, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना,
मस्त लिहिली आहेस कथा.. पुढचा भाग लवकर येऊ देत...


Chetnaa
Wednesday, July 18, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपल, शिल्पा धन्यवाद :-)
उरलेली कथा टाकतेच लवकर,कालपासुन सर्वर बंद होता..


Chetnaa
Wednesday, July 18, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुदेशने गाडी मागे वळवली व दुसर्‍या रस्त्याने काढली. थोडा लाॅँगकट पडत होता.. परंतु घरी पोहचण्याचा दुसरा उपाय नव्हता. त्याने गाडी तर काढली पण हा दुसरा रस्ता थोडा खराब व अंधाराही होता. शिवाय एरियाही दंगली जवळचाच होता. सर्व प्रकाराने रिया तर अगदी घाबरुनच गेली होती.
" सुदेश,आता काय करायचं रे? रस्ता बघ कसा भयानक वाटतोय. दंगली मुळे जळालेली घरे,दुकाने इथुनही दिसताहेत बघ. आपण उगीचच आलो या रस्त्याने. मला तर खुप भिती वाटतेय. "
मनातुन सुदेशही हबकला होता. पण वरकरणी तसे न दाखवता तो म्हणाला,
" छे तुझं आपलं काहीतरीच अगं रात्रीची वेळ असल्याने वाटत असेल तसे. आता दहा पंधरा मिनिटांत हा रस्ता पार करु आणि आपल्या परत आपल्या नेहमिच्या रस्त्याला लागु. "
" ते ठिक आहे रे इतर वेळी काही वाटत नाही. पण दंगल चालु असताना,सर्व रस्ता असा सामसुम असताना मला खुप भिती वाटतेय. नेहमिची रहदारी असती तर थोडा दिलासा तरी वाटला असता. किती छान गेला होता आजचा दिवस. आता तर सगळा मूडच गेलाय माझा. जीव नुसता उडतोय भीतीने. कशाला ही लोकं दंगली करतात? का सुखानं, सरळ मार्गानं जगु देत नाहीत लोकांना? "
" हे बघ या प्रश्नांची उत्तरे आपल्या जवळ नाहीत. आणि आपल्या सारख्या सामान्य लोकांनी जास्त लक्ष घालुही नये. आणि त्याचा काही उपयोग ही नसतो. आता थोड्याच वेळात आपण आपल्या नेहमिच्या रस्त्यावर पोहचू आणि सेफ़ होउ. उगीच टेंशन घेऊ नकोस. "
" कसं रे बोलवतं तुला असं? आपल्या भोवती हे असे घडत असताना इतक्या अलिप्तपणे कसा बोलु शकतोस तू? आपापल्या घरात जाउन दारे खिडक्या लाउन आत बसलो म्हणजे झालो का आपण सुरक्षित? आणि उद्या हे लोण प्रत्येक घरापर्यंत पोहचले तर कुठे शोधणार सेफ़ जाग. आणि आपल्या सारखी सामान्य माणसं अलिप्त राहीली ना? तर ती वेळही दूर नाही. "
" हे बघ हे सर्व दुसर्‍याला बोलायला किंवा चर्चा करण्या पुरतेच चघळतात लोकं असे विशय. प्रत्यक्ष समाजात जगताना प्रत्यक्ष उडी घ्यायला नाही येत फ़ारसे कुणी पुढे. अपवाद असतीलही, पण शक्यतो सर्व आपली सुरक्षितता प्रथम पहातात. बाकी हे सर्व दंगली लावणारे जाणोत वा मिटवणारे जाणोत. आमच्या संरक्षणाची धुरा उचलणारे स्वता: मात्र चढत्या श्रेणीच्या सुरक्षा व्यवस्थेत गुरफ़टून बसतात, मग कोण थांबवणार हे सर्व? जाउ दे आपण सेफ़ली घरी पोहचलो म्हणजे झाले. "
एवढ्यात अचानक समोरुन दोन तीन जण काळोखातुन प्रकट झाले व हातातील सुरे व काठ्या परजित अचानक त्यांच्या रस्त्यात आले.
क्रमश्:





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators