दाद कथा आवडली...पण विदुलाने त्याला आधीच ह्या एकतर्फ़ी प्रेमाबद्दल सांगितलेले असते आनि नायकानेही त्याच्या भूतकाळाबद्दल. त्यावरून वाटते कि दोंघांचाही एकमेकाबद्दल विश्वास होता. तरिही नायकाला एवढी असुरक्षितता का वाटते?..माफ़ करा पण शेवट तेव्हडा रूचला नाही मनाला. कोणि मला सांगेल का कि मध्येच ईग्रजी शब्द कसा लिहायचा?
|
Itsme
| |
| Thursday, May 31, 2007 - 3:20 pm: |
| 
|
सुंदर कथा .. .. ..
|
Cool
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:46 pm: |
| 
|
सुरेख !!!! फार फार आवडली.. खुप खुप शुभेच्छआ, लिहीत रहा
|
Bee
| |
| Friday, June 01, 2007 - 1:45 am: |
| 
|
Rani, u have to keep that word in angle bracket. e.g. to malaa <good boy> mhaNaalaa..
|
दाद, दाद द्याला शब्दच नाहीत अप्रतिम!
|
Dhumketu
| |
| Friday, June 01, 2007 - 6:23 am: |
| 
|
पहिल्यांदा त्या मुस्लीम तरूणाचे आणी कथानायकाचे बोलणे सुरु झाले तेव्हाच तो हाच मुस्लीम तरूण असेल असे वाटले. मुस्लीम आहे हा उल्लेख नंतर आहे... पण तरीही.. ह्याला म्हणतात हिंदी चित्रपटाचा परिणाम... शेरलॉक होम्स ने म्हटलेच आहे की expect the unexpected. पण आता अश्या भेटीगाठी हिंदी चित्रपटांमुळे expected झाल्या आहेत.. चांदनी मध्ये नाही का विनोद खन्नाला ऋषीकपूर भेटतो.. पण तरीही खिळऊन ठेवले कथेने.
|
Bee
| |
| Friday, June 01, 2007 - 6:41 am: |
| 
|
वर धुमकेतू म्हणतो ती एक गोष्ट मलाही चित्रपटासारखीच वाटली. दुसरे असे की चक्क कथानायकाने तिच्या प्रियकराचा खून करावा हे स्विकारणे जरा जड गेले. इतका सणकी माणूस तो कथेत कुठेच वाटत नाही.
|
Alpana
| |
| Friday, June 01, 2007 - 7:39 am: |
| 
|
दाद, hats off to you इतकी ओघवती, सहज भाषा.... कधी कधी वहावत गेल्यासारखी वाटली तरी सुद्धा ह्या सहज पणामुळेच परत परत वाचतेय तुझी कथा...
|
इतका सणकी माणूस तो कथेत कुठेच वाटत नाही हा सणकीपणा नाही. insecurity म्हणु हव तर जी तिच्यावरच्या प्रेमाने आली असेल. मानवी स्वभाव विचित्र हेच खरं!
|
Sati
| |
| Friday, June 01, 2007 - 9:28 am: |
| 
|
दाद, कथा छान लिहीली आहेस. शेवट तितकासा पटला नाही पण असुरक्षिततेची भावना माणसाला काहीही करायला भाग पाडू शकते हे निश्चित! तुझी लिहायची शैली छानच आहे. "स्पर्धा" सुद्धा खूप आवडली. साती
|
Giriraj
| |
| Friday, June 01, 2007 - 9:42 am: |
| 
|
मुळात विदुलाचे पात्र रंगवतांनाच तिच्या नवर्याची व्यक्तिरेखा इतकी बारकाईने रेखाटत नेली आहेस की त्याचे वागणे कुठेही खटकत नही.. मुळात शिक्षणाच्या काळात प्रेम वगैरे भानगडींपासून चार हात लांब राहिलेले जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा खूपच पजेसिव्ह असतात.. मत्सराच्या एका क्षणी त्याने जे केले ते समर्थनिय नसले तरी अनैसर्गिक नाही.. जितक्या अलगदपणे तू कथा शेवटाला नेलीस त्याची नज़ाकत गलिबच्या शायरीइतकीच जीवघेणी म्हणावी लागेल. एका वळणावर नेऊन तू कथेला जो विराम दिलाय आणि खुपश्या गोष्टी वाचकावर सोपवून दिल्या अहेस ते खरंच अप्रतिम! शायरीचा उपयोग तर खूपच सूचक आणि सुंदर! मुळात पुरुषाच्या नज़रेतून चितारलेले विदुलाचे रेखाटन खूपच सुंदर! दाद द्यायला सध्या इतकेच श्बद आहेत!
|
Bee
| |
| Friday, June 01, 2007 - 10:17 am: |
| 
|
मला अस वाटतं की ह्या पुर्वीचे दादचे ललित इतके सुंदर होते की त्यामुळेच ह्या पानावर जरा जास्तच आणि चांगल्याच प्रतिक्रिया आल्यात. हीच कथा जर तिची पहिलीवहिली असती तर ह्या प्रतिक्रिया आल्या असत्या का? मला वाटतं वाचक भारावून गेलेले आहेत. पण ते ह्या कथेमुळे नसून ह्या पुर्वीच्या तिच्या कथांमुळे आणि त्याचे चांगले पडसाद मात्र ह्या कथेवर उमटलेले आहेत. मला फ़क्त कथा लिहिण्याचा ढंग आवडला. काही काही वाक्यांची रचना खूप आवडली. पण कथेला जी एक depth हवी असते आणि ती खरी... वास्तविक वाटावी असा जो विषय हवा असतो ते सर्व इथे हरवलेले आहे. बायको म्हणून विदुलाचे चित्रण फ़ार काही रुचले नाही. तिचे रूप, हळवेपणा ऐवढे रेखाटले म्हणजे 'बायको' कळली का? तरी दादनी ४ वेळा तिला लिहून काढली त्या अर्थी तिला आपल्या लिखाणाची पुर्णपणे जाणिव असेल. दाद आणि इतर वाचक, प्रामाणिक प्रतिक्रिया दिली म्हणून रागवू नका.. दाद, भ्रमरनी वर जे लिहिले आहे तसेच तुलाही वाटते का?
|
Jayavi
| |
| Friday, June 01, 2007 - 10:53 am: |
| 
|
विदू तो मिंड घेते तेव्हा, आपल्याला सोडलेलं धैवताला कळत नाही आणि गळा मिठी पडली याचा षड्जालाही पत्ता नाही. हे म्हणजे कसं? तर आजूबाजूला षडजाचा डोह असावा, धैवताच्या किनार्यावरून नुसतं झोकून द्यावं डोहात तसं.... खळबळ नाही, तरंगही नाही, एकही! एकदम थेट तळंच. आई गं.............शलाकाऽऽऽऽऽऽऽ अगं कसलं जीवघेणं लिहिलं आहेस गं.... !! अपुन तो एकदम फ़िदा तुझ्या भाषावैभवाचा मला नेहेमीच हेवा वाटतो आणि कौतुकही अतिशय सुरेख शब्दात व्यक्त होणं तुला अगदी सहज जमतं. अशीच लिहित रहा.....!!
|
दाद लिहिण्याची शैली जबरदस्त आहे. मस्तच लिहिल आहेस.
|
Dnyanu
| |
| Saturday, June 02, 2007 - 5:03 am: |
| 
|
अतिशय सुंदर... अतिशय सुंदर कथा आहे... खुप आवडली...
|
पण कथेला जी एक depth हवी असते आणि ती खरी... वास्तविक वाटावी असा जो विषय हवा असतो ते सर्व इथे हरवलेले आहे. बायको म्हणून विदुलाचे चित्रण फ़ार काही रुचले नाही. तिचे रूप, हळवेपणा ऐवढे रेखाटले म्हणजे 'बायको' कळली का? <<<< बी, माझ्या मते तरी दादला बाकी काही जमलं नसलं तरी वाचकाना खिळवणं नक्की जमलं आहे. जर एका पुरुषाच्या नजरेतून "बायको" चितारेली तर पहिली गोष्ट म्हणजे रूप आणि हळवेपणा याच येणार ना? विदुला कथानकात आपल्याला कुठेही भेटत नाही. तिची मते भावना आपल्याला समजत नाही. मुळात त्याची गरज सुद्धा नाही. पण तरीही जर कथानायकाच्या charecter चा विचार केलातर त्याचं वागणं बिल्कुल खटकत नाही. ही कथा पूर्णपणे वास्तविक वाटते. (बरंचसं श्रेय भाषेच्या ढंगाला आहे. ) उलट मिळमिळीत भाषेत जर हे वर्णन आलं असतं तर कथानायक इतक्या ताकदीने उभा राहिला असता का? कथानायकाचा सणकीपणा कुठेही मला खटकला नाही. कारण त्या situation मधे कोण कसे वागेल हे ती व्यक्ती स्वत्:सुद्धा सांगू शकत नाही. मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आणि तरीही सख्ख्या विवाहित बहिणीवर बलात्कार करून तिचा खून करणारा माणूस सांगतो "तिने मला जेवायला वाढलं नाही. मला राग आला म्हणून मी असं केलं... " प्रश्न राहिला कथेच्या depth चा. दादला जे म्हणायचं होतं ते वाचकाना समजलं. बास्स... कथेचा तोच महत्वाचा उद्देश (खरंतर कुठल्याही communication चा ) समाप्त झाला.
|
Saee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 11:00 am: |
| 
|
असामी आणि वैभव म्हणतात तेच खरं... speechless !! अभिप्राय देण्याचीही कुवत नाही माझी, इतकी शब्दांची गरिबी आली आहे! धुमकेतू, तु म्हणालास ते खरं असलं ( hint मिळाली होती) तरी इथे कथाबीजापेक्षा पेशकारी जास्त महत्वाची आहे. आपण नाही का एखादा आपल्याला आवडता राग ऐकण्यासाठी वेगवेगळ्या कलाकारांच्या मैफिली ऐकत! आणि एकाच कलाकाराच्या त्याच रागाच्या अनेक मैफिलीही ऐकतो आणि तरीही दर वेळी ती संपूर्णपणे वेगळी अनुभूती असते आपल्यासाठी. राग एक, त्याचे आरोह - अवरोह एक, नियम तेच, प्रत्येकाची शिकण्याचीही प्रक्रिया बर्यापैकी सारखीच असते पण प्रत्येकाची मांडणी ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असतात, किंबहुना त्याच व्यक्तीची वेगवेगळी मांडणी ऐकुन आपण दर वेळी तृप्त होऊन समरसुन दाद देतो, त्या मांडणीसाठी जीव ओवाळून टाकतो!! म्हणजे त्या मांडणीमागे त्या त्या व्यक्तिचा जो विचार झालेला असतो त्याला दाद देत असतो आपण आणि ते विचार मांडण्यासाठी तो राग हे माध्यम असतं! इथेही तोच प्रकार लागू पडतो असं मला वाटतं... बरोबर आहे का माझं म्हणणं? भारावून गेल्यामुळे नीट विचार मांडता आले नाहीत हेही शक्य आहे म्हणुन विचारतेय. बी, इथे कुठे मेघना पेठे रे? जरा साम्य दिसलं की लगेच तुलना हवीच का? आणि हो, ही तिची पहिली कथा असती तरी असेच अभिप्राय आले असते यात शंका नाही. कारण लिखाणात गुणवत्ता आहे.
|
Giriraj
| |
| Wednesday, June 06, 2007 - 12:15 pm: |
| 
|
सईऽऽ,अगदीऽऽ समोऽऽर बसूऽऽन हेऽ सगळऽ ऐकतोय असंऽऽ वाटतंय मला तरी! मज्जा!
|
Dhumketu
| |
| Wednesday, June 06, 2007 - 12:59 pm: |
| 
|
सई, बरोबर... मलाही कथा आवडली.. मुख्यत: दाद ने केलेल्या पेशेकारीसाठी (हा शब्द ही सुचला नसता जर तू लिहीला नसतास तर.)..
|
Saee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 4:26 pm: |
| 
|
गिरी हो sss कळलं sss ... जरा गहिवरले!! धुमकेतू.. yess!
|