Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 15, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 15, 2007 « Previous Next »

Mayurlankeshwar
Wednesday, May 09, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद..खरंच... एकाहून एक अप्रतिम...
'कुणाची तरी संध्याकाळ सजते' हे वाक्यच कविता आहे!! एवढ्या रंगबेरंगी कविता वाचून
मला ग्रेसच्या काही ओळी इथे द्याव्याश्या वाटताहेत..

क्षितीज जसे दिसते
तशी म्हणावीत गाणी
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी

गाय जशी हंबरते
तसेच व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांजप्रवाही
अलगद भरोनी यावे.

मस्त लिहिताय सगळेच.... चालू देत.. :-)


Lampan
Wednesday, May 09, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज ..
"
निःशब्द सुगंधी भास<"> मस्तंच

Shree_tirthe
Wednesday, May 09, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोली

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे नाते जुळतात
नाही म्हणता-म्हणता मनातले
गुपितं उलगडतात

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे जग विसरतात
विसरून जगाला सार्‍या
स्वत:चे जग घडवतात

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे माणसं माणसांच्या मनात राहतात
निराश झालेल्या मनाला देखील
सर्वजण आधार देतात

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे अहंकार्‍यांचे अहंकार पडतात
मनात वसलेल्या माणसांचे
संस्कार घडतात

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे माणूस शब्द बनून राहतो
त्या "शब्दांसाठीच" शब्दांपलीकडचा
ईथे खेळ चालतो

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे मुक्या माणसाचे शब्द बोलतात
लंगड्या माणसाचे शब्द चालतात
प्रत्येकाचे अस्तित्व शब्द बनून राहतात

मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे माणूस शब्दांसाठी जगतो
अन वाह!!! व्वा!!! करत शब्दांवरच मरतो

मायबोली एक असं व्यासपीठ...

--- श्री


Chinki
Thursday, May 10, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"भय इथले सन्पत नाही ... " हि कविता कोणी लिहिलि आहे कोणी सान्गु शकेल का?

Bhramar_vihar
Thursday, May 10, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्के, ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांची कविता आहे ही!

Shyamli
Thursday, May 10, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकांताला आपण सापडू नये
हे मनाशी पक्क ठरवलेल......>>>
गार्गी खुपच आवडली तुझी कविता आणि शेवट तर कहर


Chinki
Thursday, May 10, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद भ्रमरा(रोजच्या भाषेत"भुन्ग्या")..
धन्यवाद भ्रमरा(रोजच्या भाषेत"भुन्ग्या")..


Manogat
Thursday, May 10, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री!
खुपच छान लिहिली आहे कविता.


Astitva
Thursday, May 10, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणि जगु आणि बी ला पाहिल आहे का?


Ultima
Thursday, May 10, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक सिलीकाॅन व्हली नावाची कविता ऐकली होती. कुणाकडे पुर्ण आहे का?

Gargi
Thursday, May 10, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, श्यामली धन्यवाद!
अरे..कीती सुंदर कविता झाल्या आहेत सगळ्यांच्या.... नीरज,माणिक श्यामली, वैशाली....
सतीश, 'रान' मस्तच!


Gargi
Thursday, May 10, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पून्हा

आज अपुल्या अपुल्यातच
चल पुन्हा गुतूंन पाहू
पुन्हा एकदा हाती माझ्या
हात तुझा गुफूंण पाहू
ती जवळीक, ओढ अधीर......
तो सहवास, उजळून पाहू
चल पुन्हा, तू मला अन्
मी तुला जवळून पाहू


Shree_tirthe
Friday, May 11, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मनोगत. आभारी आहे.
- श्री


Mi_vikas
Friday, May 11, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक गीत खूप दिवसांनी....

खूप काही हरवलेलं
दुख उरि धरु नको तू...
खूप काही हरवलेल

वादळाची रात्र शमली
दवांदवांतून पहाट फ़ुलली
सृश्टीचे ते रूप मनोरम
नयनी तुझ्या अवतरलं
खूप काही हरवलेलं...

कोवळे हे एक नाते
जोडता आता मनांचे
घेता हाती हात तुझा मी
अंग अंग मोहरलं
खूप काही हरवलेलं...

सांग ना मझ्या सखे ग
अबोल का झाली अशी तु
एइकन्यास स्वर तुझे दीवाणे
रोम रोम आतुरलं
खूप काही हरवलेल...



Menikhil
Friday, May 11, 2007 - 8:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्येक दिवस झाले...तुझी फक्त स्वप्नच येतात
प्रजक्ताचा सडा पडावा...तशी पहाटे पहाटे पडतात
सोनसकाळच्या कोवळ्या उन्हात....सोनेरी होउन जातत
पण कितीही वाटल तरी...तुझी स्वप्ने...स्वप्नेच रहातात

कितिदा समजवावे य वेड्य मनाला?
कितिदा आवर घालवे ह्या सोसट्य वार्‍यला?
कारणे असन्ख्य काढावी तुझी स्वप्न पहायला
का एकही कारण नसावे तू समोर यायला?


Ganesh_kulkarni
Sunday, May 13, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री,
"मायबोली एक असं व्यासपीठ
जिथे मुक्या माणसाचे शब्द बोलतात
लंगड्या माणसाचे शब्द चालतात
प्रत्येकाचे अस्तित्व शब्द बनून राहतात "
खुपच छान!
गणेश(समीप).


Ajjuka
Sunday, May 13, 2007 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठरलंय माझं एकदा आकाशाला पोचायचं
कसलीच कुठलीच मर्यादा
आड येणार नाही असं हरपायचं..
ठरलंय माझं!
कुठेच थांबायचं नाही
कशात अडकायचं नाही
गुंतला पदर तर
पदर भिरकवायचा पण जायचं
ठरलय माझं!
काळ्या कांबीचा देह
मेणासारखा वितळतानाही
हात सोडवून घ्यायचा आणि जायचं
ठरलंय माझं
शहाणंसुरतंपण जपायचं नाही
खरंतर काहीच जपायचं नाही
ना मन ना देह
वाट्टेल तितकं वाहून जायचं
सगळ्याच्या पलिकडे उडून जायचं
पण आकाशाला पोचायचंच..
पोचायचंच
..........
खरंच!
ठरलंय माझं



Bee
Monday, May 14, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निखिल, खूप छान आहे कविता. विषय जरी जुना असला तरी ही कविता वाचाविशी वाटते इतकी छान लिहिलीस तू..

अज्जुका, कविता छान आहे पण तुझ्या कविता इतक्या काही स्वकेंद्रीत नसतात त्यामुळे वाचताना आपण अज्जुकाची कविता वाचतो आहे असे मुळीच वाटले नाही..


Menikhil
Monday, May 14, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक दिवस अचानक....

त्या दिवशी तर बॉस कमालच झाली
मी चहा पीत असताना ती समोर दिसली
नजरानजर होताच वाटल ती थोडीशी हसली
मग मी ही न पाहिल्यागत करून मान माझी फिरवली

वाराही त्या दिवशी जरा खट्याळ झाला होता
कुरळ्या बटान्ना तीच्या वर वर उडवत होता
ओढणीला तिच्या वेटोळे घालत होता
आणि तिला बिचारीला सावरता सावरत नव्हता

"वारा काय मस्त सुटलाय?" म्हटल जाउन बोलाव
कोण? कुठली? नाव काय? म्हटल जाउन पुसाव
टीम लीड नी पण का ह्याच वेळी पचकाव?
अन महत्वाच काम म्हणून केबिन मधे न्याव?

असो....

पुन्हा ती मला केन्टीन मधे भेटली
योगायोगाने ती जेवयला मझ्यच समोर बसली
पण ती बसताच समोर....टीम माझी उठली
अन दैवानी माझी पुन्हा अशी फिरकी घेतली

पुन्हा आजच भेटेल ह्याची मला खात्री वाटली
जीव ओतून वाट पहायची नको ती सवय लागली
पण आजवर ती पुन्हा मल कधीहि ना दिसली
अन रेशमाची का काय म्हणतात ती गाठ बान्धण्या आधीच सुटली


Bhramar_vihar
Tuesday, May 15, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे रे, निखिल :-(. बस, ट्रेन और लडकी.... हे लक्षात ठेव :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators